शहरं
Join us  
Trending Stories
1
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
2
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
3
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
4
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
5
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
6
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
7
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
8
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
9
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
10
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
11
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
13
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
14
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
15
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
16
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
17
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
18
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
19
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
20
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव

शोध नव्या व्यवस्थापनाचा--आनेवाडी टोल नाक्यावर हक्क सांगणाºया ‘मॅक्रोलाईन’ कंपनीचं मूळ सुपने-तांबवेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:59 IST

कºहाड : आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापन बदलाचा वाद आता टोकाला पोहोचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापन बदलाचा वाद आता टोकाला पोहोचला आहे. गुरुवारी तर दोन्ही राजे आमने सामने ठाकलेत. मूळच्या अशोका कंपनीकडून हा व्यवस्थापनाचा ठेका कोल्हापूरच्या मॅक्रोलाईन कंपनीकडे सोपवायच्या प्रक्रियेवरून उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे समर्थकांमध्ये राडाही झालाय; पण साताºयाच्या या राजेंच्या वादाला कºहाडची फोडणी बसल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

महामार्गावरील टोलनाके आता राजकारणासाठी आपल्या वरदहस्ताखाली चालावेत, असे प्रत्येक राजकारण्याला वाटू लागले आहे. आनेवाडी-खेडशिवापूर टोलनाकाही त्याला अपवाद नाही. गेल्या काही वर्षांपासून सोलापूरच्या अशोका कंपनीकडे याच्या व्यवस्थापनाचा ठेका होता. मात्र, प्रत्यक्षात खासदार उदयनराजे भोसले समर्थक हा टोल चालवित होते.

हा व्यवस्थापनाचा ठेका नव्याने कोल्हापूरच्या मॅक्रोलाईन कंपनीने घेतला आहे. गुरुवार, दि. ५ रोजी पहिल्या ठेक्याची मुदत संपून तो नव्या कंपनीकडे हस्तांतरीत करायचा होता. मात्र, तत्पूर्वीच खासदार उदयनराजे भोसले समर्थकांसह टोलनाक्यावर गेले. व्यवस्थापन बदलाला विरोध दर्शवित त्यांनी सर्व वाहने मोफत सोडायला लावली.दरम्यान, नव्याने ठेका घेतलेली मॅक्रोलाईन ही कंपनी कोल्हापूरची आहे म्हणे. त्याचे पदाधिकारी गुरुवारी रात्री साताºयाच्या सुरुचिवर बसले होते.

मॅक्रोलाईनच्या माध्यमातून हा ठेका संजय पाटील यांना मिळाल्याचे बोलले जाते. त्यामुळे साताºयात उदयनराजेंना चेकमेट देत टोलनाक्याचा ठेका घेणारे हे संजय पाटील आहेत तरी कोण, याबाबत अनेकांची उत्सुकता ताणली गेली. तर सध्या मुंबईस्थित असणारे हे संजय पाटील मूळचे कºहाड तालुक्यातील सुपने-तांबवे गावचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुपने-तांबवे गावचे हे पाटील नेमके कोण, ते कुठे राहतात, त्यांचे गावाकडे कोण राहते, अशा चर्चा शुक्रवारी कºहाड परिसरामध्ये दिवसभर सुरू होत्या.संजय पाटील यांचे मूळगाव सुपने-तांबवे असले तरी गेल्या काही वर्षांपासून त्यांचे जास्तीत जास्त वास्तव्य मुंबईत असते. अलीकडे त्यांचे गावाकडे फारसे येणे जाणेही नसल्याचे या परिसरातील ग्रामस्थ सांगतात.आशीर्वाद कुणाचा?आनेवाडी टोलनाका व्यवस्थापनात बदलाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला या संजय पाटलांना फलटणकरांचा आशीर्वाद असल्याची चर्चा झाली. साताºयाचे ‘बाबा महाराज’ही त्यांच्या पाठीशी असल्याचे समोर आले आहे. या पाटलांचीअनेक मोठ्या राजकीय नेत्यांसोबत ऊठबस असल्याचेही सांगितले जाते.दिवाळीनंतर फुटणार बदलाचा बार!सध्या सातारा राजधानीतील वातावरण चांगलेच पेटल्याचे दिसते. आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन बदल हे त्यामागचे कारण आहे. मात्र, दोन राजेंतील या संघर्षामुळे याला वेगळीच धार आली आहे. परिणामी, तुर्तास तरी व्यवस्थापन बदलण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे सांगितले जातेय. दिवाळीनंतर बदलाचा बार आणि फटाकेही फुटणार असल्याची चर्चा तरुण कार्यकर्त्यांच्यात आहे.