शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

शोध नव्या व्यवस्थापनाचा--आनेवाडी टोल नाक्यावर हक्क सांगणाºया ‘मॅक्रोलाईन’ कंपनीचं मूळ सुपने-तांबवेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:59 IST

कºहाड : आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापन बदलाचा वाद आता टोकाला पोहोचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापन बदलाचा वाद आता टोकाला पोहोचला आहे. गुरुवारी तर दोन्ही राजे आमने सामने ठाकलेत. मूळच्या अशोका कंपनीकडून हा व्यवस्थापनाचा ठेका कोल्हापूरच्या मॅक्रोलाईन कंपनीकडे सोपवायच्या प्रक्रियेवरून उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे समर्थकांमध्ये राडाही झालाय; पण साताºयाच्या या राजेंच्या वादाला कºहाडची फोडणी बसल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

महामार्गावरील टोलनाके आता राजकारणासाठी आपल्या वरदहस्ताखाली चालावेत, असे प्रत्येक राजकारण्याला वाटू लागले आहे. आनेवाडी-खेडशिवापूर टोलनाकाही त्याला अपवाद नाही. गेल्या काही वर्षांपासून सोलापूरच्या अशोका कंपनीकडे याच्या व्यवस्थापनाचा ठेका होता. मात्र, प्रत्यक्षात खासदार उदयनराजे भोसले समर्थक हा टोल चालवित होते.

हा व्यवस्थापनाचा ठेका नव्याने कोल्हापूरच्या मॅक्रोलाईन कंपनीने घेतला आहे. गुरुवार, दि. ५ रोजी पहिल्या ठेक्याची मुदत संपून तो नव्या कंपनीकडे हस्तांतरीत करायचा होता. मात्र, तत्पूर्वीच खासदार उदयनराजे भोसले समर्थकांसह टोलनाक्यावर गेले. व्यवस्थापन बदलाला विरोध दर्शवित त्यांनी सर्व वाहने मोफत सोडायला लावली.दरम्यान, नव्याने ठेका घेतलेली मॅक्रोलाईन ही कंपनी कोल्हापूरची आहे म्हणे. त्याचे पदाधिकारी गुरुवारी रात्री साताºयाच्या सुरुचिवर बसले होते.

मॅक्रोलाईनच्या माध्यमातून हा ठेका संजय पाटील यांना मिळाल्याचे बोलले जाते. त्यामुळे साताºयात उदयनराजेंना चेकमेट देत टोलनाक्याचा ठेका घेणारे हे संजय पाटील आहेत तरी कोण, याबाबत अनेकांची उत्सुकता ताणली गेली. तर सध्या मुंबईस्थित असणारे हे संजय पाटील मूळचे कºहाड तालुक्यातील सुपने-तांबवे गावचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुपने-तांबवे गावचे हे पाटील नेमके कोण, ते कुठे राहतात, त्यांचे गावाकडे कोण राहते, अशा चर्चा शुक्रवारी कºहाड परिसरामध्ये दिवसभर सुरू होत्या.संजय पाटील यांचे मूळगाव सुपने-तांबवे असले तरी गेल्या काही वर्षांपासून त्यांचे जास्तीत जास्त वास्तव्य मुंबईत असते. अलीकडे त्यांचे गावाकडे फारसे येणे जाणेही नसल्याचे या परिसरातील ग्रामस्थ सांगतात.आशीर्वाद कुणाचा?आनेवाडी टोलनाका व्यवस्थापनात बदलाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला या संजय पाटलांना फलटणकरांचा आशीर्वाद असल्याची चर्चा झाली. साताºयाचे ‘बाबा महाराज’ही त्यांच्या पाठीशी असल्याचे समोर आले आहे. या पाटलांचीअनेक मोठ्या राजकीय नेत्यांसोबत ऊठबस असल्याचेही सांगितले जाते.दिवाळीनंतर फुटणार बदलाचा बार!सध्या सातारा राजधानीतील वातावरण चांगलेच पेटल्याचे दिसते. आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन बदल हे त्यामागचे कारण आहे. मात्र, दोन राजेंतील या संघर्षामुळे याला वेगळीच धार आली आहे. परिणामी, तुर्तास तरी व्यवस्थापन बदलण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे सांगितले जातेय. दिवाळीनंतर बदलाचा बार आणि फटाकेही फुटणार असल्याची चर्चा तरुण कार्यकर्त्यांच्यात आहे.