शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भारतीय संस्कृतीचा सार्थ अभिमान आहे - स्कॉट कफोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:40 IST

वाई : अनेक देशांना भेटी दिल्या व अमेरिकेत स्थायिक असलो, तरी भारतीय संस्कृती व जीवनपद्धती मला अतिशय प्रिय ...

वाई : अनेक देशांना भेटी दिल्या व अमेरिकेत स्थायिक असलो, तरी भारतीय संस्कृती व जीवनपद्धती मला अतिशय प्रिय आहे व याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन स्कॉट कफोरा यांनी केले.

येथील जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई येथील भूगोल विभाग, अंतर्गत दर्जा हमी कक्ष व महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भूगोलशास्त्रातील बदलते प्रवाह’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष मदन भोसले, संचालक सुरेश यादव, भूगोलशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी. एम. गोफणे, कार्यकारिणी सदस्य डॉ. डी. जी. गाताडे, संस्थेचे सचिव डॉ. जयवंतराव चौधरी, खजिनदार प्रा. नारायणराव चौधरी, प्रा. प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव, परिषदेचे समन्वयक व भूगोलशास्त्र विभागप्रमुख डॉ. विनोद वीर व सहसमन्वयक डॉ. शिवाजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कफोरा पुढे म्हणाले, मी नोकरी सोडली व ‘अवनी’ या अशासकीय संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करीत आहे. कोणतीही शासकीय मदत न घेता उपेक्षित व वंचित वर्ग, तसेच महिला व बाल कामगारांच्या सबलीकरणासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणी हे आपल्या जीवनाचे सूत्र आहे. सामाजिक कार्य करताना अनेक व्यक्ती आपल्याला आर्थिक सहकार्य करतात. पैशापेक्षा ही मदत करणाऱ्या व्यक्ती, ही आपली खरी संपत्ती आहे. अमेरिकेत राहूनही आपण खादीची कपडे परिधान करीत असतो व महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रेरित विविध शैक्षणिक संस्थांमध्ये काम करीत असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. मानवहितासाठी भूगोलासह सर्वच अभ्यासक्षेत्रे समाजासाठी उपयुक्त ठरली पाहिजेत, असेही ते म्हणाले.

मदन भोसले म्हणाले, आजच्या भूगोलशास्त्र परिषदेने केवळ भूगोलातील नवीन प्रवाहांची ओळख करून दिली असे नव्हे, तर जीवनातील नावीन्यता, साधेपणा त्याचीही माहिती करून दिली आहे. महात्मा गांधीजींचे विचार हे जगाला तारणारे आहेत व त्याची आज मोठ्या प्रमाणावर गरज आहे.

संस्थेचे सचिव डॉ. जयवंतराव चौधरी, परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी. एम. गोफणे, डॉ. डी. जी. गाताडे, प्र. प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव, डॉ. प्रवीण सप्तर्षी, अभ्यागत प्राध्यापक यांनी शास्त्रीय अभ्यास करून आपली मते व निष्कर्ष निर्भीडपणे समाजासमोर मांडणे गरजेचे असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. अंबादास सकट व प्रा. अरिफा शेख यांनी केले. प्रास्ताविक डॉ. विनोद वीर यांनी केले, तर डॉ. किरण सोनटक्के यांनी आभार मानले.