शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या ‘विना हरकत’ नंतरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:43 IST

सातारा : कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून ...

सातारा : कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून ना हरकत दिल्यानंतरच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ज्या गावांमध्ये शाळा सुरू करायची आहे, त्या गावात गेल्या एका महिन्यात एकही कोविड रूग्ण आढळून आला नाही पाहिजे, ही अटही घालण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्हीटी दर नियंत्रणात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे टिपणी सादर केली आहे. यावर जिल्हाधिकारी काय निर्णय देतात, शाळा सुरू करण्यासाठी काय निकष देतात, जिल्ह्यातील कोविडमुक्त गावांची एकत्रित माहिती घेण्याबरोबरच मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.

चौकट :

समितीच्या परवानगीची प्रतीक्षा

जिल्ह्यात सध्या कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीने परवानगी दिली तर व पालकांनी ना हरकत दिल्यानंतरच शाळा सुरू होणार आहेत. जिल्ह्यात किती गावे कोरोनामुक्त आहेत, याचेही सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप एकाही गावातून शाळा सुरू करण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.

शाळेत पाठविण्याची पालकांना धास्तीच

शासनाने कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार तयारीही सुरू केली आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालक म्हणून ना हरकत देऊन देखील, पण तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची असताना त्यांना शाळेत पाठवण्याची आमची मानसिकता नाही. शाळेत जाऊन काही त्रास झालाच तर ही धास्ती मनात कायम असणार आहे.

- प्रविणा फडतरे, पालक, कोरेगाव

कोविडचा धोका अद्यापही शंभर टक्के टळलेला नाही. लहान मुले गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतील. कोविडचे समूळ उच्चाटन करेपर्यंत शाळा सुरू करण्याचा घाट घातला आणि त्यात मुले बाधित निघाली तर ते विपरीत संकट ठरेल.

- विकास जाधव, संगमनगर, पालक

कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचे शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सर्वेक्षण करून ग्रामपंचायत आणि पालकांचे विनाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले की लगेचच आवश्यक काळजी घेऊन शाळा सुरू करण्यासाठी आम्ही तयार आहोत. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून मार्गदर्शक सूचना घेण्यात येणार आहेत.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी

जिल्ह्यातील एकूण शाळा : ३८८१

शासकीय : २६९३

पालिका : ५२

... शाळा तयार

जिल्हा प्रशासनाने गावांमध्ये सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना दिल्यानंतर मगच ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे. त्यानंतर पालकांचीही एनओसी असलेल्या गावांमध्ये शाळा सुरू होतील.