शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

दुष्काळी भागात चिंतेच्या ढगात शेतकऱ्यांचा वावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:08 IST

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत असल्याने पेरण्यांना उरक आला आहे. तर पूर्व दुष्काळी भागात आजही अनेक शेतकरी पेरणीस धजावले नाहीत. त्यामुळे जुलै संपत आलातरी जिल्ह्यातील पेरणी १०० टक्के झालेली नाही. आतापर्यंत ८३.१९ टक्के पेरणी झाली आहे. माण, खटावमध्ये निश्चित केलेल्या क्षेत्राच्या जवळपास पेरणी ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत असल्याने पेरण्यांना उरक आला आहे. तर पूर्व दुष्काळी भागात आजही अनेक शेतकरी पेरणीस धजावले नाहीत. त्यामुळे जुलै संपत आलातरी जिल्ह्यातील पेरणी १०० टक्के झालेली नाही. आतापर्यंत ८३.१९ टक्के पेरणी झाली आहे. माण, खटावमध्ये निश्चित केलेल्या क्षेत्राच्या जवळपास पेरणी आली आहे. पूर्वेकडे पाऊस नसल्याने शेतकºयांत चिंतेचे ढग आहेत. तर जिल्ह्यात सर्वात अधिक पेरणी ही सोयाबीनचीच झाली आहे.जिल्ह्यात गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाचे आगमन झाले असून, पूर्व भागात ऊन पडत असताना पश्चिम भागात मात्र जोरदार पाऊस कोसळत आहे. माण तालुक्यात आतापर्यंत ११० तर कोयनानगर येथे ३३०० मिलीमीटर पाऊस पडला आहे. पूर्व भागात पावसाच्या दडीमुळे चिंता लागली असून, पश्चिम भागात पेरणी, भात लावणीच्या कामाला वेग आला आहे.पश्चिम भागात आनंदाचे वातावरण असून, भाताच्या लावणीला वेग आला आहे. भुईमूग, इतर कडधान्ये यांची पेरणी सुरू आहे. तर पूर्व भागात कशीबशी ८० टक्क्यांच्यावर पेरणी गेलेली आहे. जिल्ह्यात यावर्षी भाताचे सर्वसाधारण क्षेत्र ५०८०५ हेक्टर निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी २०९३० हेक्टरवर लागण झाली आहे. ही टक्केवारी ४१.२० टक्के इतकी आहे. ज्वारीचे क्षेत्र २६९४५ हेक्टर असून, २१४८१ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारीची ७९.७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीचे पीक प्रामुख्याने कोरेगाव, माण, खटाव, फलटण आणि खंडाळा तालुक्यात घेण्यात येते. ४९५३१ हेक्टरपैकी ४४३७५ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली आहे. निश्चित केलेल्या क्षेत्रापैकी अद्यापही १० टक्के क्षेत्र बाजरीचे पेरणीविना पडून आहे. जिल्ह्यात मका क्षेत्राची ९७.९४ टक्के, नाचणी ४३.६० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तसेच इतर तृणधान्य, कडधान्यांची पेरणी सुरू असून, त्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर आहे.पूर्व भागात अद्यापही म्हणावा तसा असा पाऊस झालेला नाही. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकºयांत मात्र चिंतेचे ढग दाटून आले आहेत. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर खरीप हंगामातील पेरणी केली. त्यानंतर पिकांची उगवणही चांगली झाली. त्यामुळे आता पिकांना पाण्याची आवश्यकता आहे.सोयाबीन पेरणी १०० टक्क्यांवर; सूर्यफूल सर्वात कमीसोयाबीन पिकाचे क्षेत्र ५३७५० हेक्टर निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी ५८७५० हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झालेली आहे. हे प्रमाण १०८.५६ टक्के इतके आहे. सातारा आणि वाई तालुक्यात सर्वसाधारणक्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. तर जिल्ह्यात सूर्यफुलाची लागण सर्वात कमी झालेली आहे. ५८१ हेक्टरपैकी ८२ हेक्टरवरच लागण झालेली आहे. याची टक्केवारी १४.११ टक्के इतकीच आहे. मुगाचीही १५६.९३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सर्वात अधिक आहे.