शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागात चिंतेच्या ढगात शेतकऱ्यांचा वावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:08 IST

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत असल्याने पेरण्यांना उरक आला आहे. तर पूर्व दुष्काळी भागात आजही अनेक शेतकरी पेरणीस धजावले नाहीत. त्यामुळे जुलै संपत आलातरी जिल्ह्यातील पेरणी १०० टक्के झालेली नाही. आतापर्यंत ८३.१९ टक्के पेरणी झाली आहे. माण, खटावमध्ये निश्चित केलेल्या क्षेत्राच्या जवळपास पेरणी ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत असल्याने पेरण्यांना उरक आला आहे. तर पूर्व दुष्काळी भागात आजही अनेक शेतकरी पेरणीस धजावले नाहीत. त्यामुळे जुलै संपत आलातरी जिल्ह्यातील पेरणी १०० टक्के झालेली नाही. आतापर्यंत ८३.१९ टक्के पेरणी झाली आहे. माण, खटावमध्ये निश्चित केलेल्या क्षेत्राच्या जवळपास पेरणी आली आहे. पूर्वेकडे पाऊस नसल्याने शेतकºयांत चिंतेचे ढग आहेत. तर जिल्ह्यात सर्वात अधिक पेरणी ही सोयाबीनचीच झाली आहे.जिल्ह्यात गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाचे आगमन झाले असून, पूर्व भागात ऊन पडत असताना पश्चिम भागात मात्र जोरदार पाऊस कोसळत आहे. माण तालुक्यात आतापर्यंत ११० तर कोयनानगर येथे ३३०० मिलीमीटर पाऊस पडला आहे. पूर्व भागात पावसाच्या दडीमुळे चिंता लागली असून, पश्चिम भागात पेरणी, भात लावणीच्या कामाला वेग आला आहे.पश्चिम भागात आनंदाचे वातावरण असून, भाताच्या लावणीला वेग आला आहे. भुईमूग, इतर कडधान्ये यांची पेरणी सुरू आहे. तर पूर्व भागात कशीबशी ८० टक्क्यांच्यावर पेरणी गेलेली आहे. जिल्ह्यात यावर्षी भाताचे सर्वसाधारण क्षेत्र ५०८०५ हेक्टर निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी २०९३० हेक्टरवर लागण झाली आहे. ही टक्केवारी ४१.२० टक्के इतकी आहे. ज्वारीचे क्षेत्र २६९४५ हेक्टर असून, २१४८१ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारीची ७९.७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीचे पीक प्रामुख्याने कोरेगाव, माण, खटाव, फलटण आणि खंडाळा तालुक्यात घेण्यात येते. ४९५३१ हेक्टरपैकी ४४३७५ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली आहे. निश्चित केलेल्या क्षेत्रापैकी अद्यापही १० टक्के क्षेत्र बाजरीचे पेरणीविना पडून आहे. जिल्ह्यात मका क्षेत्राची ९७.९४ टक्के, नाचणी ४३.६० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तसेच इतर तृणधान्य, कडधान्यांची पेरणी सुरू असून, त्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर आहे.पूर्व भागात अद्यापही म्हणावा तसा असा पाऊस झालेला नाही. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकºयांत मात्र चिंतेचे ढग दाटून आले आहेत. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर खरीप हंगामातील पेरणी केली. त्यानंतर पिकांची उगवणही चांगली झाली. त्यामुळे आता पिकांना पाण्याची आवश्यकता आहे.सोयाबीन पेरणी १०० टक्क्यांवर; सूर्यफूल सर्वात कमीसोयाबीन पिकाचे क्षेत्र ५३७५० हेक्टर निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी ५८७५० हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झालेली आहे. हे प्रमाण १०८.५६ टक्के इतके आहे. सातारा आणि वाई तालुक्यात सर्वसाधारणक्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. तर जिल्ह्यात सूर्यफुलाची लागण सर्वात कमी झालेली आहे. ५८१ हेक्टरपैकी ८२ हेक्टरवरच लागण झालेली आहे. याची टक्केवारी १४.११ टक्के इतकीच आहे. मुगाचीही १५६.९३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सर्वात अधिक आहे.