शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साबळेवाडीची फुलं चमकली मुंबईत!

By admin | Updated: October 13, 2015 00:21 IST

सेंद्रिय शेतीची कमाल : पन्नास गुंठ्यात मिळविले अडीच लाखांचे विक्रमी उत्पन्न

नवरात्रोत्सवात झेंडूला विशेष महत्त्व असते. साबळेवाडी, ता. सातारा येथील शेतकरी दत्तात्रय जाधव यांनी नगदी पिकांकडे मोर्चा वळविला आणि विक्रमी उत्पन्न घेतले. पन्नास गुंठ्यांमध्ये जाधव यांनी तीन टन झेंडूचे उत्पन्न मिळविले आहे. विशेष म्हणजे, त्यांची ही सगळी फुले दसऱ्याच्या आधी मुंबईच्या बाजारपेठेत दाखल होत आहेत.सातारा तालुक्यातील साबळेवाडी हे छोटेसं गाव. या गावातील दत्तात्रय जाधव यांना प्रयोगशील शेती करण्यामध्ये भलताच रस आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते कायम तयार असतात. यावर्षी त्यांनी झेंडूची शेती करण्याचे नियोजित केले. त्यानुसार त्यांनी पन्नास गुंठ्यांत ‘अ‍ॅरोगोल्ड आणि लाल भगवती’ या दोन जातींच्या फुलांच्या रोपांची लागण केली. सेंद्रिय खतांचा वापर करण्याचा पुरस्कार करणारे जाधव यांनी हाच नियम झेंडू शेतातही लावला. त्यामुळे फुलांची नैसर्गिक वाढ झाली आणि अन्य फुलांच्या तुलनेत ही फुले अधिक तजेलदार आणि उठावदार झाली. पन्नास गुंठ्यांमध्ये जाधव यांनी सुमारे तीन टन फुलांचे उत्पादन घेतले आहे. कुटुंबीयांबरोबर शेती करणाऱ्या जाधव यांच्या फुलांना ऐंशी रुपये किलोचा भाव मिळाला आहे. त्या हिशेबाने पन्नास गुंठ्यांत त्यांनी अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे.जाधव यांनी साडेसात हजार रुपयांची रोपे रोपवाटिकेतून आणली. त्यामध्ये चार हजार ‘अ‍ॅरोगोल्ड’ जातीची आणि साडेतीन हजार लाल भगवती जातीच्या रोपांच्या लागण केली. दसरा आणि दिवाळी या दोन्ही सणांमध्ये या फुलांची तोडणी येईल, या बेताने अडीच महिन्यांपूर्वी यांनी रोपाची लागण केली. सुमारे बारा महिला व पुरुषांच्या मदतीने या फुलांची तोडणी केली जाते. सुमारे पन्नास हजारांची गुंतवूणक करून अडीच लाखांचे उत्पन्न घेऊन जाधव यांनी परिसरातील शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे.सातारा तालुक्यातील शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणावर नगदी पिकांकडे वळू लागले आहेत. कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे.कष्टाचं चिज झालं..सेंद्रिय शेती करण्याकडे मी कायम भर दिला आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करणे मला आवडते. पिवळे अ‍ॅरोगोल्ड आणि लाल भगवती यांचे विक्रमी उत्पन्न यंदा मी घेतले आहे. उत्कृष्ट प्रतीचे बियाणे आणि सेंद्रिय खतांमुळे फुलांची परतवारी चांगली मिळाली. त्यामुळे ही फुले दसऱ्याच्या दोन दिवस आधी मुंबईच्या बाजारपेठेत जाणार आहेत. - दत्तात्रय जाधव, साबळेवाडी, ता. सातारा.साई सावंत