शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

साबळेवाडीची फुलं चमकली मुंबईत!

By admin | Updated: October 13, 2015 00:21 IST

सेंद्रिय शेतीची कमाल : पन्नास गुंठ्यात मिळविले अडीच लाखांचे विक्रमी उत्पन्न

नवरात्रोत्सवात झेंडूला विशेष महत्त्व असते. साबळेवाडी, ता. सातारा येथील शेतकरी दत्तात्रय जाधव यांनी नगदी पिकांकडे मोर्चा वळविला आणि विक्रमी उत्पन्न घेतले. पन्नास गुंठ्यांमध्ये जाधव यांनी तीन टन झेंडूचे उत्पन्न मिळविले आहे. विशेष म्हणजे, त्यांची ही सगळी फुले दसऱ्याच्या आधी मुंबईच्या बाजारपेठेत दाखल होत आहेत.सातारा तालुक्यातील साबळेवाडी हे छोटेसं गाव. या गावातील दत्तात्रय जाधव यांना प्रयोगशील शेती करण्यामध्ये भलताच रस आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते कायम तयार असतात. यावर्षी त्यांनी झेंडूची शेती करण्याचे नियोजित केले. त्यानुसार त्यांनी पन्नास गुंठ्यांत ‘अ‍ॅरोगोल्ड आणि लाल भगवती’ या दोन जातींच्या फुलांच्या रोपांची लागण केली. सेंद्रिय खतांचा वापर करण्याचा पुरस्कार करणारे जाधव यांनी हाच नियम झेंडू शेतातही लावला. त्यामुळे फुलांची नैसर्गिक वाढ झाली आणि अन्य फुलांच्या तुलनेत ही फुले अधिक तजेलदार आणि उठावदार झाली. पन्नास गुंठ्यांमध्ये जाधव यांनी सुमारे तीन टन फुलांचे उत्पादन घेतले आहे. कुटुंबीयांबरोबर शेती करणाऱ्या जाधव यांच्या फुलांना ऐंशी रुपये किलोचा भाव मिळाला आहे. त्या हिशेबाने पन्नास गुंठ्यांत त्यांनी अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे.जाधव यांनी साडेसात हजार रुपयांची रोपे रोपवाटिकेतून आणली. त्यामध्ये चार हजार ‘अ‍ॅरोगोल्ड’ जातीची आणि साडेतीन हजार लाल भगवती जातीच्या रोपांच्या लागण केली. दसरा आणि दिवाळी या दोन्ही सणांमध्ये या फुलांची तोडणी येईल, या बेताने अडीच महिन्यांपूर्वी यांनी रोपाची लागण केली. सुमारे बारा महिला व पुरुषांच्या मदतीने या फुलांची तोडणी केली जाते. सुमारे पन्नास हजारांची गुंतवूणक करून अडीच लाखांचे उत्पन्न घेऊन जाधव यांनी परिसरातील शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे.सातारा तालुक्यातील शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणावर नगदी पिकांकडे वळू लागले आहेत. कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे.कष्टाचं चिज झालं..सेंद्रिय शेती करण्याकडे मी कायम भर दिला आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करणे मला आवडते. पिवळे अ‍ॅरोगोल्ड आणि लाल भगवती यांचे विक्रमी उत्पन्न यंदा मी घेतले आहे. उत्कृष्ट प्रतीचे बियाणे आणि सेंद्रिय खतांमुळे फुलांची परतवारी चांगली मिळाली. त्यामुळे ही फुले दसऱ्याच्या दोन दिवस आधी मुंबईच्या बाजारपेठेत जाणार आहेत. - दत्तात्रय जाधव, साबळेवाडी, ता. सातारा.साई सावंत