शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

घरात पाणी वाचवा.. रस्त्यावर मात्र उधळा !

By admin | Updated: April 26, 2016 00:25 IST

जलवाहिन्यांची गळती सुरूच : साताऱ्यातील रस्त्यांवर ऐन उन्हाळ्यातही लाखो लिटर पाण्याचा पाट; खुदाईमुळे चांगल्या रस्त्यांना अवकळा

सातारा : जिल्ह्यामध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पूर्वेकडच्या माण, खटाव, फलटण, कोरेगाव भागांसह पश्चिम भागातही पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले. जिल्ह्यात एका बाजूला असे विदारक चित्र असताना सातारा शहरात मात्र, अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. काही केल्या गळती थांबत नसल्याचे या गळत्यांच करायचं काय? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.लष्कर पाणीपुरवठा केंद्र, सातारा अंतर्गत विसावा जलशुद्धीकरण केंद्र येथे लागलेल्या गळतीचे काम शनिवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून तातडीने दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यामुळे शहर आणि परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात ठेवण्यात आला. शनिवारी केबीपी कॉलेज, सदर बझार येथे पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेले. सदर बझारमध्ये पाणीपुरवठा बंद न केल्यामुळे पाईपलाईन फुटल्याने अर्धा तास हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेले. या ठिकाणी असे प्रकार दररोज घडत असून, पाण्याचा अपव्यय होत आहे.जीवन प्राधिकरणच्या वतीने शहरात ठिकठिकाणी फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. अनेक ठिकाणी लागलेल्या गळतीमुळे हे काम अधिकच किचकट होऊन बसले आहे. अनेकदा गळती काढूनही पुन्हा गळती लागत असल्याने प्राधिकरणसह नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सातारा शहरात गळती काढण्यासाठी रस्त्यात खुदाई केली जात आहे. खुदाई केल्यानंतर त्या जागी पुन्हा डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी) रस्त्याचा जीव घेऊन कनेक्शन सुरू !खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचा निधी सातारा शहरातील रस्त्यांच्या कामासाठी मंजूर करून आणला. मात्र, त्यांच्याच नावाने शहरात राजकारण करणाऱ्या मंडळींना त्याचे सोयरसुतक राहिले नसल्याचे चित्र आहे. शहरामध्ये नव्याने रस्ते तयार करण्यात आले तेव्हा एकही नवीन कनेक्शन न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच रस्ते खोदणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पालिका पदाधिकारी सांगत होते; पण याच निर्णयाचा त्यांना विसर पडल्याचे दिसते. कारण शहरामध्ये नवीन रस्ते खोदून नळकनेक्शन देण्याचा सपाटा सुरू आहे. नगरसेवकांच्याच आशीर्वादाने ही कनेक्शन्स दिली जात असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.सुधारित पाणी योजना की वानराचे शेपूट शहरामध्ये गेल्या चार वर्षांपासून सुधारित पाणी योजनेचे काम सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामाची मुदतही संपून गेली आहे. रस्ते खुदाई, अपुरा पाणीपुरवठा अशा समस्यांना रोजच्या रोज सामोरे जात सातारकर कंटाळून जात आहेत. ही सुधारित पाणी योजना आहे की वानराचे वाढत जाणारे शेपूट, असा संताप सातारकर व्यक्त करीत आहे.