शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

‘यूपीएससी’त सातारी पताका

By admin | Updated: June 13, 2014 02:03 IST

कऱ्हाड-लोणंद : अभय येडगे, मयूर गोवेकर यांचे उज्ज्वल यश

मसूर/लोणंद : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत कऱ्हाड तालुक्यातील अभयचीवाडी येथील अमोल जगन्नाथ येडगे व लोणंद येथील मयूर रतिलाल गोवेकर यांनी उज्ज्वल यश संपादन करत सातारच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला आहे. अमोल येडगे याने देशात २५४ वा तर मयूर गोवेकर याने देशात ३४७ वा क्रमांक मिळवून भारतीय प्रशासकीय सेवेत स्थान मिळवले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या या परीक्षेसाठी देशभरातील सुमारे ४ लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. अमोलने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टाटा टेक्नॉलॉजी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला होता. अभ्यासाच्या तयारीसाठी अमोल काही दिवस दिल्लीतही होता. अमोल येडगे याने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण यशवंतनगर येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात पूर्ण केले. अकरावी व बारावीचे शिक्षण कऱ्हाडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात घेतले. दहावी तसेच बारावीच्या परीक्षेतही अमोलने गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. २0११ साली पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले इलेक्ट्रॉनिक्समधील पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टाटा टेक्नॉलॉजी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून अमोलने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. परीक्षेच्या तयारीसाठी अमोलने स्वयंअध्ययन व ग्रुप डिस्कशनवर अधिक भर दिला. अभ्यासाच्या तयारीसाठी अमोल काही दिवस दिल्लीतही होता. अमोल येडगेचे मूळगाव अभयचीवाडी असून, त्याचे आईवडील शेती करतात. मुळातच हुशार असल्यामुळे अमोल पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी चुलते रघुनाथ येडगे यांच्याकडे यशवंतनगर येथे राहत होता. रघुनाथ येडगे सह्याद्री साखर कारखान्यात नोकरी करतात. अमोल केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची माहिती मिळताच यशवंतनगर तसेच अभयचीवाडी येथील ग्रामस्थांनी जल्लोष केला. मयूर गोवेकर याचे मूळ गाव फलटण तालुक्यातील कोरेगाव. गोवेकर कुटुंबीय सध्या लोणंद येथे राहत आहेत. त्याचे आई-वडील शिक्षक आहेत. आई खाशीबाई या साखरवाडी येथे तर वडील रतिलाल गावेकर हे देऊर येथे ज्ञानदानाचे काम करत आहेत. मयूरचे प्राथमिक शिक्षण लोणंद येथे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सातारा येथील सयाजीराव विद्यालय व यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज येथे झाले. त्यानंतर पुणे येथून त्याने बी. टेक.ची पदवी घेतली. भारतीय प्रशासन सेवेत जाण्याचं स्वप्न असल्याने त्याने तयारी सुरू केली होती. सीईटी परीक्षेतही तो कोल्हापूर विभागात प्रथम आला होता. (वार्ताहर)