शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

‘सातारी बाजीरावां’मुळे ‘फिल्मी मस्तानी’ त्रस्त!

By admin | Updated: October 9, 2015 23:39 IST

वाईत चित्रीकरणाचा सेट : साताऱ्यामधील गुंडांच्या दंडेलशाहीमुळे फिल्म निर्माता ‘पॅकअप’च्या तयारीत

पांडुरंग भिलारे -- वाई  -चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीचा ‘हॅपनिंग स्पॉट’ अशी ओळख असणाऱ्या वाई तालुक्यात आता गुंडगिरी बोकाळली आहे. गुरूवारी साताऱ्यातील काही गुंडांनी दमदाटी करत बाजीराव मस्तानीच्या सेटवर दंडेलशाही करण्याचा प्रयत्न केला. यापुवीर्ही अशा घटना घडल्याने चित्रीकरणाची पंढरी असणारा वाई तालुका बदनाम होत असून स्थानिकांसह तालुक्यातील व्यवसायिकांचे लांखो रूपयांचे नुकसान होत आहे. दसवडी ता. वाई येथे गेले काही दिवसापासून बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. गुरुवारी साताऱ्यातील काही गुुंडांनी चित्रपटाचा निमार्ता व दिग्दर्शक यांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला. चित्रकरणात सहभागी असणारे वाई व परिसरातील युवकांनी विरोध केल्याने मोठा अनर्थ टळला. सहयाद्रीच्या कुशीत वसलेला वाई शहर व परिसर हा अतिशय निसर्गरम्य आहे. वाईला दक्षिण काशी संबोधले जाते त्यामुळे कृष्णा नदीवर असणारे सात घाट, महागणपती मंदीर, मेणवलीचा वाडा, घाट , धोम धरण तसेच पश्चिम भागातील नयनरम्य परिसर यामुळे सर्व भाषामधील चित्रपट निर्मात्यांना या परिसराची नेहमीच भुरळ पडत आलेली आहे. गेल्या अनेक वषार्पासून या परिसरात विविध चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे. त्यामध्ये मृत्युदंड, गंगाजल, जिस देश मे गंगा रहता है, स्वदेश , दंबग, चैनई एक्सप्रेस, असे अनेक हिंदी, मराठी , तमिळी, भोजपुरी भोषेतील चित्रपट तसेच हिंदी, मराठी मालीका जाहिरातींचे चित्रीकरण झाल्याने हा परिसर चित्रपट सृष्टीसाठी चित्रिकरणांचे महत्वाचे ठिकाण चित्रपट नगरी म्हणून नावारूपास आला होता. विविध चित्रिकरणांमुळे शहरातील हॉटेल्स-लॉज, वहानधारक, कॅटर्स, विविध गांवाच्या ग्रामपंचायतींना मिळणारा महसूल तसेच स्थानिक नागरीकांना मिळत असणारा रोजगार हा मोठया प्रमाणात उपलब्ध होत असे.मात्र, काही लोकांच्या वैयक्तीक स्वाथार्साठी चित्रीकरणाला वेठीस धरण्यात आले. त्यामुळे या परिसराचे नाव बदनाम झाले व या गुंडप्रवृत्तीच्या लोंकाना कटांळून चित्रपट सृष्टीने गेले काही दिवस या परिसरात चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेतला. वाई शहरासह परिसरातील लोंकाचा हातचा रोजगार जावून व्यवसायिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. अनेक खंडानतंर वाईच्या पश्चिम भागात बाजीराव मस्तानी सारख्या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण आले होते. ते काही गुंडप्रवृत्तीच्या लोंकामुळे बंद पडणार असल्याची चर्चा परिसरात आहे. चित्रपट निर्मात्याची या चित्रीकरणाचा सेट दुस-या ठिकाणी हलविण्याची मानसिकता झाली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून वाई तालुक्यासाठी बदनामी कारक आहे. तरी जिल्हा पोलिस प्रशासन , लोकप्रतिनिधींनी वेळीच गुंडप्रवृत्तींना आवर न घातल्यास वाई तालुक्यातील चित्रीकरण कायमचे बंद होण्याच्या मार्गावर आहे. चित्रीकरणाला संरक्षण देण्याची गरजवाई व परिसरात मोठया प्रमाणावर होणारे चित्रीकरण काही मुठभर लोकांच्या वैयक्तीक स्वाथार्मुळे बंद पडण्याच्या मार्गावर असून स्थानिक नागरीकासह व्यवसायिकांचे लाखों रूपयांचे नुकसान होत आहे तरी पोलिस प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तालुक्यात येणा-या चित्रीकरणाला संरक्षण देण्यात यावे असे मत स्थानिक व्यवसायिकांनी बोलून दाखविले.राजकीय पक्ष, संघटनांच्या नावाने गुंडगिरी या परिसरात अनेक वेळा चित्रीकरणाच्या वेळी चित्रीकरणासाठी लागणारे सर्वप्रकारचे ठेके मिळणे, पैशाची मागणी विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या नावाखाली मागणी केली जात आहे.वाई शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी यापूर्वी चित्रपटांचे चित्रीकरणातून स्थानिकांना रोजगार मिळतो. चित्रीकरण पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.- संतोष तांबे, सरपंच, मेणवली.