शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

सातारकरांच्या डोक्यावर ‘नारळी संकट’

By admin | Updated: October 6, 2014 22:38 IST

ऐकावं तेवढं नवल : नारळ काढणारे मिळत नसल्यामुळे अवस्था; ‘सातारी पाटी’ चमकली !

सातारा : आधुनिक जगात सर्वांनाच सुरक्षित नोकरी आणि व्यवसाय पाहिजे आहे. त्यामुळे सामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शहरात नारळाच्या झाडावर चढणारा माणूस मिळत नसल्यामुळे सातारकरांची पंचाईत झाली आहे. शहरात अनेकांच्या घरासमोर नारळाचे एखादे तरी झाड असतेच. वर्षभर नारळाची सोय आणि फांद्यापासून खराटा तयार होत असल्याने या झाडाचे अस्तित्व आजही घरांच्या आवारात टिकून आहे. काही झाडे तीस-चाळीस वर्षांपासून डौलाने उभी आहेत. उंचच उंच वाढलेल्या या झाडांच्या फांद्या आणि सुकलेले नारळ झाडधारकांच्या डोक्याला ताप ठरू लागले आहेत. येथील बुधवार पेठेत राहणाऱ्या जाधव कुटुंबीयांच्या घराशेजारीच एक दवाखाना आहे. अनेक रुग्णांची वर्दळ येथे असते. गत सप्ताहात एका रुग्णाच्या शेजारी हा नारळ पडला. अचानक पडलेल्या या नारळामुळे रुग्ण घाबरला. ही घटना लक्षात घेऊन जाधव कुटुंबीयांनी आपल्या गेटबाहेर एक सूचना फलकच लावला. त्यामुळे आता झाडाशेजारी कोणी उभे राहत नाही. पावसाळ्यानंतर किमान महिनाभर नारळाच्या झाडावर कोणी चढत नाही. त्यामुळे अजून काही दिवस तर जाधवांच्या घराबाहेरील हा फलक असाच झळकत राहणार आहे. (प्रतिनिधी)शेवाळ्याचा अडसरशहरात नारळाच्या झाडावर चढणाऱ्या लोकांची वानवा आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक हे काम करत असल्यामुळे त्यांची वेळ मिळणेही मुश्किल झाले आहे. जे लोक हे काम करतात, त्यांची वेळ एक महिन्यानंतरची मिळते. त्यातही पावसाळ्यानंतर एक महिना हे काम करणारे लोक झाडावर शेवाळं असल्यामुळे वर चढत नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करता पुढे आणखी किमान एक महिना तरी सातारकरांच्या डोक्यावरील हे ‘नारळी संकट’ असेच घोंगावणार आहे.