शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाकडून भक्तांची सत्त्वपरीक्षा!

By admin | Updated: December 30, 2014 23:24 IST

घाटरस्ता धोकादायक : भरघोस मतांचा आशीर्वाद देणारी घुमाईदेवी दुर्लक्षित

पिंपोडे बुद्रुक : श्री घुमाईदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या कामात वनविभाग आडकाठी आणत आहे. घाट रस्त्याला संरक्षक कठडे नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण करून संरक्षक कठडे बांधावेत, अशी भाविकांची मागणी आहे. हे देवस्थान जागृत असल्याने निवडणुका आल्यावर सर्वच उमेदवार व राजकरणी विजयाचे साकडे घालण्यासाठी देवीच्या दर्शनाला जातात. मात्र, अनेकांना या रस्त्याच्या दुरवस्थेचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.कोरेगाव तालुक्यातील प्रमुख व जागृत देवस्थान म्हणून श्री घुमाईदेवीची ओळख आहे. दरीतील देवीच्या भव्य व आकर्षक मंदिराला चहूबाजूंनी डोंगरानी वेढलेले आहे. याठिकाणी दर मंगळवार आणि शुक्रवारी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. तसेच प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला देवदर्शनासाठी गर्दी होते. पिंपोड्यापासून हे देवस्थान चार किलोमिटरवर आहे. त्यामुळे बहुतांश भाविक दुचाकी, चारचाकी वाहनातुन दर्शनासाठी जातात. गावापासून भावेनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट झाल्याने पूर्ण रस्ता उखडला आहे. त्यामुळे खड्यात रस्ता ्रकी रस्त्यात खड्डे हेच कळत नाही. भावेनगर गावापासून ते देवीच्या स्वागत कमानीपर्यंत सुमारे अर्धा किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. मात्र तेथून पुढे एक मिलोमिटरचा कच्चा घाटरस्ता आहे. या रस्त्यावर सर्वत्र अस्ताव्यस्त खडी पसरली आहे. तीव्र उतार व वेडीवाकडी वळणे यामुहे हा रस्ता धोकादायक बनला आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक कठडे नसल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. देवदर्शन निर्धोक होण्याकरिता या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करून घाटात संरक्षक कठडे बांधावेत अशी भक्तांची मागणी आहे. (वार्ताहर)पिंपोडे बुद्रुक गावापासून देवीच्या मंदिरापर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला आहे. घाट रस्ता डांबरीकरण करुन घाटात संरक्षक कठडे बांधणे गरजेचे आहे. घाटातून भाविकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. - संतोष सूळसरपंच, भावेनगर केवळ दिवसाच घेता येते दर्शनघुमाईदेविची यात्रा कोजागिरी पोर्णिमेस भरते. यात्रेसाठी भाविक राज्यभरातून मोठ्या प्रमाणात येतात. मात्र घाट रस्ता धोकादायक असल्यामुळे व मंदिर खोल दरीत असल्यामुळे डोंगर माथ्यावर वाहनतळ उभारून तेथून खाली दरीत पायी चालत जावे लागते. याठिकाणी वीजेची सोय नसल्यामुळे संध्याकाळी दर्शनासाठी जाण्यासाठी अडचणीचे होते. त्यामुळे भाविकांना देवीचे दर्शन दिवसा घेवून लगेचच परतीचा प्रवास करावा लागतो. मात्र या समस्येकडे लक्ष यायला कोणालाही वेळ नसल्याचे दिसून येते.