शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
5
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
6
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
7
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
8
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
9
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
11
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
12
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
13
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
14
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
15
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
16
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
17
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
18
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
19
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...

साताऱ्याचा लढा सुरूच राहणार!

By admin | Updated: June 4, 2017 01:11 IST

बळिराजा शेतकरी संघटना ठाम : उद्याच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये मुलाबाळांसह जनावरे घेऊन रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : ‘मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना आश्वासनांचे गाजर दाखविले. शेतकऱ्यांच्या मागण्यांची सरकारकडून मोडतोड करण्यात आलेली आहे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयाला बळिराजा शेतकरी संघटना ठामपणे विरोध करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यातील शेतकरी ५ जून रोजी महाराष्ट्र बंद करणारच. वेळप्रसंगी शेतकरी मुलाबाळांसह जनावरांनाही सोबत घेऊन रस्त्यावर उतरतील,’ असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.कऱ्हाड येथे शनिवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, साजीद मुल्ला, विश्वास जाधव आदिंसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.पंजाबराव पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मागण्या शंभर टक्के पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठराविक शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. संप मागे घेतला असल्याची खोटी अफवा सर्वत्र पसरली. त्यामुळे संपाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या संपात फुट पाडणाऱ्या सरकारचा बळीराजा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप पुढे सुरूच राहणार आहे.’सचिन नलवडे म्हणाले, ‘गेल्या तीन ते चार वर्षांत राज्यात दुष्काळी परिस्थिती होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी किसान क्रांती मोर्चाची स्थापना करण्यात आली. त्याअनुषंगाने स्वाभीमानी शेतकरी संघटना व बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे गावोगावी बैठकाही घेण्यात आल्या. संप यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारीही करण्यात आली. त्यानुसार संप चांगल्या रितीने सुरू होता. मात्र, काही संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीत संघटनेत फुट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, आता कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी मागे हटू नये कारण शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी व बळीराजा शेतकरी संघटनेने सुरू केलेले हे आंदोलन आता संघटनेचे राहिले नसून ते शेतकऱ्यांचे झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या जोपर्यंत पुर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन पुढे सुरूच ठेवावे.’भांडत बसण्यापेक्षा लढा !शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले आहे. मात्र, दुसरीकडे खासदार राजू शेट्टी व शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील हे एकमेकांवर टीका करीत बसले आहे. सध्या एकमेकांशी भांडणे करीत बसण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. त्यांनी भांडत बसण्यापेक्षा संपाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे व बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सांगितले. शनिवार संपाचासर्व भाजी मंडई ओसफळभाज्यांचे दर कडाडलेदुधाची कोंडीटोलनाक्यावर प्रचंड बंदोबस्तसंपाबाबत संभ्रमावस्था