शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठेवला : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 16:46 IST

सातारा : ‘जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करुन सातारा जिल्हा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडवावा. तसेच साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठेवला आहे,’ असे गौरवोगद्गार पालकमंत्री विजय शिवतारे यांनी काढले.

ठळक मुद्देस्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण 

सातारा : ‘जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करुन सातारा जिल्हा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडवावा. तसेच साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठेवला आहे,’ असे गौरवोगद्गार पालकमंत्री विजय शिवतारे यांनी काढले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी पोलिस, गृह रक्षक दलाची मानवंदना स्वीकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख,  निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘सह्याद्रीच्या दºयाखोºयाचा लाभ घऊन सह्याद्रीच्या पट्यात येणाºया भागात मोठ्या प्रमाणात धरणांची निर्मिती केली आहे. त्यामुळे राज्यातीलच नव्हे किंबहुना देशातील सर्वाधिक धरण असलेला जिल्हा म्हणून साताºयाने नावलौकीक मिळविला आहे.

दुष्काळी भागातही पाणी पोहोचवून जनतेच्या शेतात पाण्याचे पाट देऊन  इथल्या जमिनी सुजलाम सुफलाम करण्याचे काम शासनाने केले आहे. जिल्ह्यातील जनतेने या पुनर्वसनासाठी मोलाची साथ दिली त्यातूनच राज्यात सर्वाधिक यशस्वी पुनर्वसन जिल्ह्यात झाले आहे.

कृष्णा, तारळी, धोम बलकवडी, उरमोडी, मोरणा (गुरेघर), वांग, उत्तरमांड, आंधळी, नागेवाडी, महींद, कवठे-कवळे, वसना, वांगणा, पांगारे या प्रकल्पातून १ लाख ३९ हजार २३९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. यातून २ लाख ५८ हजार २२९ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पांमुळे बाधित होणाºया प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ८२ गावठाणांमध्ये होणार असून आता पर्यंत ५७ गावठाणातील नागरी सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत.  

  राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी अतिशय नियोजनबध्द अशी लोकांचा सहभाग असलेली जलयुक्त शिवार अभियान ही योजना सुरु करण्यात आली आहे असे सांगून पालकमंत्री शिवतारे पुढे म्हणाले, त्याचे दृश्य परिणाम सातारा जिल्ह्यात पहायला मिळत आहेत.

२०१६- १७ ला २१० गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली असून ६,७९७ कामे करावयाची होती. यापैकी ३,७८४ कामे पूर्ण झाली असून ७२७ कामे प्रगतीपथावर आहेत.  २०१६- १७ मध्ये  ४४ गावे जलयुक्त झाली आहेत.