शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठेवला : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 16:46 IST

सातारा : ‘जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करुन सातारा जिल्हा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडवावा. तसेच साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठेवला आहे,’ असे गौरवोगद्गार पालकमंत्री विजय शिवतारे यांनी काढले.

ठळक मुद्देस्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण 

सातारा : ‘जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करुन सातारा जिल्हा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडवावा. तसेच साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठेवला आहे,’ असे गौरवोगद्गार पालकमंत्री विजय शिवतारे यांनी काढले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी पोलिस, गृह रक्षक दलाची मानवंदना स्वीकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख,  निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘सह्याद्रीच्या दºयाखोºयाचा लाभ घऊन सह्याद्रीच्या पट्यात येणाºया भागात मोठ्या प्रमाणात धरणांची निर्मिती केली आहे. त्यामुळे राज्यातीलच नव्हे किंबहुना देशातील सर्वाधिक धरण असलेला जिल्हा म्हणून साताºयाने नावलौकीक मिळविला आहे.

दुष्काळी भागातही पाणी पोहोचवून जनतेच्या शेतात पाण्याचे पाट देऊन  इथल्या जमिनी सुजलाम सुफलाम करण्याचे काम शासनाने केले आहे. जिल्ह्यातील जनतेने या पुनर्वसनासाठी मोलाची साथ दिली त्यातूनच राज्यात सर्वाधिक यशस्वी पुनर्वसन जिल्ह्यात झाले आहे.

कृष्णा, तारळी, धोम बलकवडी, उरमोडी, मोरणा (गुरेघर), वांग, उत्तरमांड, आंधळी, नागेवाडी, महींद, कवठे-कवळे, वसना, वांगणा, पांगारे या प्रकल्पातून १ लाख ३९ हजार २३९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. यातून २ लाख ५८ हजार २२९ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पांमुळे बाधित होणाºया प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ८२ गावठाणांमध्ये होणार असून आता पर्यंत ५७ गावठाणातील नागरी सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत.  

  राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी अतिशय नियोजनबध्द अशी लोकांचा सहभाग असलेली जलयुक्त शिवार अभियान ही योजना सुरु करण्यात आली आहे असे सांगून पालकमंत्री शिवतारे पुढे म्हणाले, त्याचे दृश्य परिणाम सातारा जिल्ह्यात पहायला मिळत आहेत.

२०१६- १७ ला २१० गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली असून ६,७९७ कामे करावयाची होती. यापैकी ३,७८४ कामे पूर्ण झाली असून ७२७ कामे प्रगतीपथावर आहेत.  २०१६- १७ मध्ये  ४४ गावे जलयुक्त झाली आहेत.