शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठेवला : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 16:46 IST

सातारा : ‘जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करुन सातारा जिल्हा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडवावा. तसेच साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठेवला आहे,’ असे गौरवोगद्गार पालकमंत्री विजय शिवतारे यांनी काढले.

ठळक मुद्देस्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण 

सातारा : ‘जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करुन सातारा जिल्हा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडवावा. तसेच साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठेवला आहे,’ असे गौरवोगद्गार पालकमंत्री विजय शिवतारे यांनी काढले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी पोलिस, गृह रक्षक दलाची मानवंदना स्वीकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख,  निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘सह्याद्रीच्या दºयाखोºयाचा लाभ घऊन सह्याद्रीच्या पट्यात येणाºया भागात मोठ्या प्रमाणात धरणांची निर्मिती केली आहे. त्यामुळे राज्यातीलच नव्हे किंबहुना देशातील सर्वाधिक धरण असलेला जिल्हा म्हणून साताºयाने नावलौकीक मिळविला आहे.

दुष्काळी भागातही पाणी पोहोचवून जनतेच्या शेतात पाण्याचे पाट देऊन  इथल्या जमिनी सुजलाम सुफलाम करण्याचे काम शासनाने केले आहे. जिल्ह्यातील जनतेने या पुनर्वसनासाठी मोलाची साथ दिली त्यातूनच राज्यात सर्वाधिक यशस्वी पुनर्वसन जिल्ह्यात झाले आहे.

कृष्णा, तारळी, धोम बलकवडी, उरमोडी, मोरणा (गुरेघर), वांग, उत्तरमांड, आंधळी, नागेवाडी, महींद, कवठे-कवळे, वसना, वांगणा, पांगारे या प्रकल्पातून १ लाख ३९ हजार २३९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. यातून २ लाख ५८ हजार २२९ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पांमुळे बाधित होणाºया प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ८२ गावठाणांमध्ये होणार असून आता पर्यंत ५७ गावठाणातील नागरी सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत.  

  राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी अतिशय नियोजनबध्द अशी लोकांचा सहभाग असलेली जलयुक्त शिवार अभियान ही योजना सुरु करण्यात आली आहे असे सांगून पालकमंत्री शिवतारे पुढे म्हणाले, त्याचे दृश्य परिणाम सातारा जिल्ह्यात पहायला मिळत आहेत.

२०१६- १७ ला २१० गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली असून ६,७९७ कामे करावयाची होती. यापैकी ३,७८४ कामे पूर्ण झाली असून ७२७ कामे प्रगतीपथावर आहेत.  २०१६- १७ मध्ये  ४४ गावे जलयुक्त झाली आहेत.