शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

साताऱ्यात उड्डाणपुलाचा सापळा गंजला!

By admin | Updated: June 24, 2017 13:13 IST

समस्याग्रस्त महामार्ग : महामार्ग प्राधिकरण, ठेकेदारांचे पूर्णपणे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २४ : पुणे-बंगलोर महामार्गावर येथील वाढे (ता. सातारा) चौकात उड्डाणपुलाचे काम काही वर्षांपासून रखडलेले आहे. उड्डाणपुलाच्या पिलरला असणाऱ्या सळया गंजण्याच्या मार्गावर आहेत. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदारांनी या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष केले असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सातारा-लोणंद राज्य मार्ग राष्ट्रीय महामागार्ला वाढे फाटा येथून छेदून पुढे जातो. या रस्त्यावर नेहमी मोठी वर्दळ असते. पंढरपूर-लोणंद-बारामतीच्या दिशेने जाणाऱ्या या मार्गावर वाहनांची नेहमीच मोठी गर्दी असते. उड्डाणपुलाअभावी या चौकात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहनांची कोंडी तर नित्याचीच असते. वाढे, आरळे, शिवथर, मालगाव या गावांतून साताऱ्यात नित्याच्या कामाला येणाऱ्या वाहनधारकांची तसेच शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी आहे. या लोकांना जीव मुठीत घेऊनच महामार्ग ओलांडावा लागत आहे. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून महामार्गाच्या चार पदरीकरणाचे काम झाले, तेव्हा वाढे फाट्यावर उड्डाणपूल करावा, अशी मागणी होत होती; परंतु या मागणीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले. बॉम्बे रेस्टारंट चौकात एकच उड्डाणपूल तेव्हा बनविण्यात आला. सहा पदरीकरणाच्या कामातही ही चूक राहू शकते, असे प्रसारमाध्यमांनी दाखवून दिल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग आली. सहा पदरीकरणाच्या कामात वाढे फाट्यावर उड्डाणपूल उभारण्याचे काम घेण्यात आले. मात्र, या पुलाच्या कामाचा भोग अद्याप संपलेला नाही. पुलाचे पिलर्स ठराविक उंचीपर्यंत उभारण्यात आले आहेत; परंतु पुढील काम ठप्प आहे. या पिलर्सचे गज उघडे असून त्यावर गंज चढला आहे. त्यांची देखभालही केली जात नसल्याचे पुढे येत असून काही दिवसांत हे पिलर्स कोसळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या पुलाचे काम का रखडले आहे, हा एकच प्रश्न अनेकांना सतावत आहे. याबाबत लोकमतने खोलात जाऊन माहिती घेतली असता महामागार्चे बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रा या कंपनीने पुलाच्या उभारणीचे काम पोट ठेकेदाराकडे दिले होते. कंपन्यांतील वादामुळे पहिल्या पोटठेकेदाराने काम सोडले. त्याजागी रिलायन्सने दुसऱ्याच पोट ठेकेदाराकडे हे काम दिले. जितके काम झाले आहे, त्याचे बिल गोलमाल करुन पहिल्या ठेकेदाराला दिले असल्याचे पुढे येत आहे. दुसऱ्या बाजूला वीज कंपनीच्या लाईन शिफ्टिंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्याकडेला असणाऱ्या वीजेच्या डीपींना जागा कुठे द्यायची, हा पेच प्रशासनाला अजून सुटलेला नाही. या पेचामुळे उड्डाणपुलाच्या सापळ्याला आकार येईना, असे सध्याचे चित्र आहे. महामार्गावर वाढे चौकात उड्डाणपुलाचे काम रखडल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. शाहूपुरी वाहतूक शाखेचे दोन पोलिस याठिकाणी दिवस-रात्र तैनात असतात. वाहतूक कोंडीची समस्या तसेच अपघात होऊ नये, यासाठी या पोलिसांना रोजच कसरत करावी लागताना पाहायला मिळते. पोलिस नसतील तर वाहनचालकांच्या मारामाऱ्याही होतात.

खेडकरांनी मोठी वाहने न्यायची कशी?

खेड गावात जाण्यासाठी बायपास मार्ग काढला आहे. मात्र त्याची उंची इतकी कमी आहे की त्यातून केवळ चार चाकी वाहनेच जाऊ शकतात. ट्रक, बस अशी मोठी वाहने त्यातून जाऊच शकत नाहीत. खेड येथील स्थानिकांनी घेतलेली वाहनेही त्यांच्या घरापर्यंत कशी नेणार? हा प्रश्न त्यांना पडला आहे.

समस्याच समस्या

- लोखंडी जाळ्यांच्या चोऱ्या- अँगलचे नट काढलेले - भंगार चोरांचा सुळसुळाट- गटारांची अस्वच्छता- गटारावरील झाकणेही चोरीला