शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
4
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
5
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
6
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
7
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
8
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
9
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
10
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
11
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
12
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
13
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
14
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
15
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
16
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
17
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
18
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
19
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!

साताऱ्यात उड्डाणपुलाचा सापळा गंजला!

By admin | Updated: June 24, 2017 13:13 IST

समस्याग्रस्त महामार्ग : महामार्ग प्राधिकरण, ठेकेदारांचे पूर्णपणे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २४ : पुणे-बंगलोर महामार्गावर येथील वाढे (ता. सातारा) चौकात उड्डाणपुलाचे काम काही वर्षांपासून रखडलेले आहे. उड्डाणपुलाच्या पिलरला असणाऱ्या सळया गंजण्याच्या मार्गावर आहेत. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदारांनी या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष केले असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सातारा-लोणंद राज्य मार्ग राष्ट्रीय महामागार्ला वाढे फाटा येथून छेदून पुढे जातो. या रस्त्यावर नेहमी मोठी वर्दळ असते. पंढरपूर-लोणंद-बारामतीच्या दिशेने जाणाऱ्या या मार्गावर वाहनांची नेहमीच मोठी गर्दी असते. उड्डाणपुलाअभावी या चौकात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहनांची कोंडी तर नित्याचीच असते. वाढे, आरळे, शिवथर, मालगाव या गावांतून साताऱ्यात नित्याच्या कामाला येणाऱ्या वाहनधारकांची तसेच शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी आहे. या लोकांना जीव मुठीत घेऊनच महामार्ग ओलांडावा लागत आहे. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून महामार्गाच्या चार पदरीकरणाचे काम झाले, तेव्हा वाढे फाट्यावर उड्डाणपूल करावा, अशी मागणी होत होती; परंतु या मागणीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले. बॉम्बे रेस्टारंट चौकात एकच उड्डाणपूल तेव्हा बनविण्यात आला. सहा पदरीकरणाच्या कामातही ही चूक राहू शकते, असे प्रसारमाध्यमांनी दाखवून दिल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग आली. सहा पदरीकरणाच्या कामात वाढे फाट्यावर उड्डाणपूल उभारण्याचे काम घेण्यात आले. मात्र, या पुलाच्या कामाचा भोग अद्याप संपलेला नाही. पुलाचे पिलर्स ठराविक उंचीपर्यंत उभारण्यात आले आहेत; परंतु पुढील काम ठप्प आहे. या पिलर्सचे गज उघडे असून त्यावर गंज चढला आहे. त्यांची देखभालही केली जात नसल्याचे पुढे येत असून काही दिवसांत हे पिलर्स कोसळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या पुलाचे काम का रखडले आहे, हा एकच प्रश्न अनेकांना सतावत आहे. याबाबत लोकमतने खोलात जाऊन माहिती घेतली असता महामागार्चे बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रा या कंपनीने पुलाच्या उभारणीचे काम पोट ठेकेदाराकडे दिले होते. कंपन्यांतील वादामुळे पहिल्या पोटठेकेदाराने काम सोडले. त्याजागी रिलायन्सने दुसऱ्याच पोट ठेकेदाराकडे हे काम दिले. जितके काम झाले आहे, त्याचे बिल गोलमाल करुन पहिल्या ठेकेदाराला दिले असल्याचे पुढे येत आहे. दुसऱ्या बाजूला वीज कंपनीच्या लाईन शिफ्टिंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्याकडेला असणाऱ्या वीजेच्या डीपींना जागा कुठे द्यायची, हा पेच प्रशासनाला अजून सुटलेला नाही. या पेचामुळे उड्डाणपुलाच्या सापळ्याला आकार येईना, असे सध्याचे चित्र आहे. महामार्गावर वाढे चौकात उड्डाणपुलाचे काम रखडल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. शाहूपुरी वाहतूक शाखेचे दोन पोलिस याठिकाणी दिवस-रात्र तैनात असतात. वाहतूक कोंडीची समस्या तसेच अपघात होऊ नये, यासाठी या पोलिसांना रोजच कसरत करावी लागताना पाहायला मिळते. पोलिस नसतील तर वाहनचालकांच्या मारामाऱ्याही होतात.

खेडकरांनी मोठी वाहने न्यायची कशी?

खेड गावात जाण्यासाठी बायपास मार्ग काढला आहे. मात्र त्याची उंची इतकी कमी आहे की त्यातून केवळ चार चाकी वाहनेच जाऊ शकतात. ट्रक, बस अशी मोठी वाहने त्यातून जाऊच शकत नाहीत. खेड येथील स्थानिकांनी घेतलेली वाहनेही त्यांच्या घरापर्यंत कशी नेणार? हा प्रश्न त्यांना पडला आहे.

समस्याच समस्या

- लोखंडी जाळ्यांच्या चोऱ्या- अँगलचे नट काढलेले - भंगार चोरांचा सुळसुळाट- गटारांची अस्वच्छता- गटारावरील झाकणेही चोरीला