शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वाईच्या रस्त्याला साताऱ्याचं प्लास्टिक

By admin | Updated: May 29, 2017 23:07 IST

वाईच्या रस्त्याला साताऱ्याचं प्लास्टिक

लोकमत न्यूज नेटवर्कपसरणी : चकाचक डांबरी सडक तयार असते... काही दिवसांत पावसाळा सुरू होतो... पावसाच्या पाण्याने थोडे डांबर निघते... पुढे खड्डा वाढत जातो.. तर अनेकदा पहिल्याच पावसात रस्ता वाहूनही जातो. रस्त्यावर खर्ची केलेले लाखो रुपये पाण्यात जाऊ नयेत म्हणून सुरुर ते वहागाव दरम्यान प्लास्टिक कोटेड रस्त्याचा प्रयोग करण्यात आला. यासाठी चक्क साताऱ्यातून गोळा झालेले प्लास्टिक वापरण्यात आले.मानवनिर्मित पर्यावरणाचे प्रदुषण कमी करण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून विघटन न होणाऱ्या प्लास्टिकचे करायचे काय? हा प्रश्न कित्येक वर्षांपासून सतावत आहे. ते कुजत नसल्याने पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. पृथ्वीचे तापमानही दिवसेंदिवस वाढत आहे. याला अनेक वर्षे जमिनीत पडलेले प्लास्टिकही जबाबदार असू शकते. यावरच मात करण्याचा प्रयोग वाई तालुक्यात राबविण्यात आला. वाईच्या बांधकाम विभागाने जिल्ह्यात प्रथमच सुरूर ते वहागाव हा दोन किलोमीटरचा प्लास्टिक कोटेड रस्ता तयार करुन नवा अध्याय रचला. सुरूर ते वहागाव या रस्त्यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून २०१५ ते २०१६ च्या अर्थसंकल्पात चाळीस लाखांचा निधी मंजूर केला होता. भारतीय रस्ते काँग्रेसच्या मानांकनाप्रमाणे प्रती किलोमीटर डांबरी कारपेटला पाच टन डांबर लागते. या रस्त्यासाठी लागणाऱ्या डांबराच्या वजनाच्या आठ टक्के टाकाऊ प्लास्टिकचे पाच मिलीमिटरपेक्षा लहान तुकडे करुन डांबराच्या मिक्सिंग प्लॉन्टमध्ये खडी, डांबर गरम करुन प्लास्टिक कोटेड रस्त्याचे काम करण्यात आले आहे.प्लास्टिक वापरामुळे डांबरी रस्त्यात पाणी मुरतच नसल्याने रस्ता खराब होण्याचा प्रश्नच येत नाही. व सध्या पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्लास्टिकचे काही प्रमाणात निर्मूलन होण्यास मदतही होणार आहे. रस्त्याच्या निर्मितीत अधीक्षक अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता संजय सोनावणे, वाईच्या बांधकाम विभागाचे के. पी. मिरजकर आणि संजय शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. साताऱ्यातील प्लास्टिक कामीसुरुर-वहागाव या रस्त्यासाठी साधारणत: नऊशे किलो टाकाऊ प्लास्टिक तुकड्यांचा वापर केला. सातारा शहरातून प्लास्टिक भंगार गोळा करणाऱ्यांकडून टाकाऊ प्लास्टिकचा डांबरीकरणासाठी वापर करण्यात आला. यामध्ये प्लास्टिकच्या पातळ पिशव्या, सलाईन बाटल्या यांचाही वापर करण्यात आला. त्यांचे तुकडे करुन ठरवून दिलेल्या प्रमाणात वापर करण्यात आला. यामुळे रस्त्ये निर्मितीच्या खर्चातही बचत होणार आहे, अशी माहिती के. पी. मिरजकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.