शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सातारकरांना समजेना पाण्याचं महत्त्व !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:34 IST

सचिन काकडे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : माण, खटाव तालुक्यांतील अनेक गावे पाण्यासाठी संघर्ष करीत असताना सातारा शहरात मात्र ...

सचिन काकडे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : माण, खटाव तालुक्यांतील अनेक गावे पाण्यासाठी संघर्ष करीत असताना सातारा शहरात मात्र या उलट चित्र दिसू लागले आहे. शहरवासीयांना पालिकेकडून मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे; परंतु अनेक नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय केला जात आहे. बहुतांश नळांना तोट्याच नसल्याने पाण्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होतआहे.सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळ तर पश्चिमेकडे सुकाळ असा विरोधाभास आजही पाहावयास मिळतो. पश्चिमेकडील सातारा, वाई, जावळी, महाबळेश्वर, पाटण हे पर्जन्यवृष्टीचे तालुके म्हणून ओळखले जातात. तर पूर्वेकडील माण, खटाव, कोरेगाव, फलटण या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पश्चिमेकडील कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी या धरणांमुळे दुष्काळी भागाचा पाणीप्रश्न काहीअंशी मार्गी लागतो.उन्हाळा सुरू झाल्यापासून माण, खटाव तालुक्यांतील जनतेची पाण्यासाठीची धडपड सुरू झाली आहे. मात्र, पश्चिमेकडे या उलट चित्र दिसू लागले आहे. सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांना पहाटे, सकाळी व सायंकाळी अशा तीन टप्प्यांत पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याऐवजी नागरिकांकडून याचा अपव्यय केला जात आहे. इमारतींवर असलेल्या पाण्याच्या टाक्यात तुडुंब भरून वाहत असल्याचे चित्र नेहमीच नरजेस पडत आहे. अनेक नळांना तोट्याच नसल्याने पाण्याची नासाडी होत आहे. नळ सुरू ठेवून कपडे धुणे, गाड्या धुणे, दुकानांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी शिंपडणे अशा माध्यमातून नागरिक पाण्याची नासाडी करू लागले आहेत.पालिकेच्या वतीने यापूर्वी तोट्या नसलेले नळ कनेक्शन बंद करण्यात आले होते. परंतु अलीकडे ही कारवाई पूर्णपणे बंद झाली आहे. अनेक नळांना तोट्या नसल्याने पाण्याची नासाडी होत असताना पालिकेचेही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. पालिकेने ही बाब गांभीर्याने घ्यावी, तोट्या नसलेल्या नळ कनेक्शनवर कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.पाणी बचतीसाठी आपण हे करू शकतो..नळाखाली कपडे, भांडी धुणे टाळावे.अंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीत पाणी घ्यावे.कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन दैनंदिन वापर टाळावा.आपली वाहने धुण्यासाठी पाईपने वाहते पाणी वापरू नका.नळांना एरिएटर बसवून घ्या. त्यानेही भरपूर पाणी वाचते.परसबागेत पाण्यासाठी छोट्या बाटल्यांचा उपयोग करावा.