शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सातारकरांना पावभाजी अन् वडापाव लागणार तिखट !

By admin | Updated: January 18, 2017 00:12 IST

बेकरी युनियनचा निर्णय : मैदा महागल्याने लादीपावमध्ये ३० टक्के दरवाढ; खाद्य विक्रेत्यांनाही बसणार फटका

सातारा : गेल्या एक वर्षापासून बेकरीला लागणारा मैदा तीस टक्क्याने महाग झाल्याने सातारा शहरातील बेकरी चालकांनी लादीपावच्या दरातही २५ ते ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पावभाजी, वडापाव अन् मिसळपाव आदी खाद्यपदार्थांच्या दरातही लवकरच वाढ होऊ शकत असल्याने सातारकरांना हे पदार्थ तिखट लागू शकणार आहेत. सुमारे साडेचार वर्षांपूर्वी सातारा शहर लादीपाव बेकरी युनियनने २० टक्के दरवाढ केली होती. त्यानंतर नुकतीच युनियनच्या सर्व सभासदांची बैठक होऊन यात मैदा, साखर, तेल अन् डिझेल आदींच्या महागाईचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर २५ रुपयांची रेग्युलर लादी आता ३० रुपये करण्यात आली आहे. तसेच ३० रुपयांची मोठी लादी ४० रुपये होणार आहे. ही दरवाढ शुक्रवार, दि. २० जानेवारीपासून होत आहे, असेही युनियनने म्हटले आहे. मुंबईनंतर वडापावची सर्वाधिक क्रेझ साताऱ्यात असून, लादीपावच्या भाववाढीनंतरही वडापावच्या दरात वाढ होणार नाही, असे अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे. मात्र, वडापावचा आकार छोटा होऊ नये, हीच सातारकरांची इच्छा आहे. (प्रतिनिधी)सातारा शहरात जवळपास २२ लादीपाव बनविणाऱ्या बेकरी असून, एका बेकरीत सरासरी ३०० ते ४०० लादीपाव रोज तयार होतात. याचा अर्थ रोज सातारा शहरात नऊ हजार लादीपाव बाजारात हातोहात खपले जातात. विशेष म्हणजे एका लादीत चोवीस पाव असतात. म्हणजे रोज सव्वादोन लाख पाव सातारकर खातात.