शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

सातारकरांची यंदाची कोजागिरी टेरेसवरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 16:24 IST

निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या सातारकरांची कोजागिरी पौर्णिमा गेल्या अनेक वर्षांपासून यवतेश्वर परिसरात ठरलेली असायची. यंदा घाट बंद असल्यामुळे अनेकांनी कोजागिरी टेरेसवरच करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देयवतेश्वर घाट बंदचा परिणामकास पठाराकडे जाणारा रस्ता महिन्यासाठी बंद यवतेश्वर परिसरात कोजागिरी पौर्णिमा साजरी करणाºयांची अडचण

सातारा, 4 : निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या सातारकरांची कोजागिरी पौर्णिमा गेल्या अनेक वर्षांपासून यवतेश्वर परिसरात ठरलेली असायची. यंदा घाट बंद असल्यामुळे अनेकांनी कोजागिरी टेरेसवरच करण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक वारसा स्थळ असणाºया कास पठाराकडे जाणारा रस्ता यवतेश्वर घाटात खचला. त्यामुळे हा रस्ता पुढील एक महिन्यासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे फुलांचे सौंदर्य बघायला जाणाºयांबरोबरच कोजागिरी पौर्णिमा साजरी करणाºयांचीही अडचण झाली आहे.

सातारा-कास रस्त्यावर साताºयापासून चार किलोमीटर अंतर असणाºया यवतेश्वर घाटात तब्बल चाळीस मीटर लांब व पाच मीटर रुंदीचा रस्ता मधोमध खचला आहे.  खोल दरी तयार झाल्याने पर्यटक, वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. 

पावसाळ्यात दरड कोसळणे, संरक्षक कठडे ढासळणे ही नित्याचीच बाब बनली आहे. या घटनांची यवतेश्वर घाटाबरोबरच नेहमीचे प्रवासी, वाहन चालक व पर्यटकांना सवयच झाली आहे. परंतु, अकस्मात मधोमध रस्ता खचून कोसळणे ही घटना पाहून  पर्यटक, वाहनचालक आवाकच झाले.

कास पठारावर फुलांचा हंगाम जोरात सुरू असून, पिवळ्या रंगाचे मिकी माऊस फुलांचे गालिचे दर्शन देऊ लागले आहेत. ऐन फुलांच्या हंगामात अशी घटना घडल्याने पठारावर जाण्याची वाट बिकट वाटू लागली आहे. पंधरा दिवसांनंतर हंगाम संपू शकतो. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी पसरलेली आहे.