शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

साताºयात पिवळं वादळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 22:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रामोशी समाजबांधव अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करत आहेत. शासनाकडे वारंवार मागणी करून दुर्लक्ष केले जाते, असा आरोप करत न्याय हक्कासाठी रामोशी समाजातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले. त्यांनी हातात घेतलेल्या पिवळ्या झेंड्यामुळे साताºयात जणू भगवं वादळच संचारलं होतं.मोर्चात खासदार उदयनराजे भोसलेही ...

ठळक मुद्दे♦ हजारो रामोशी समाजबांधव सहभागी♦ सर्वसामान्यांच्या व्यथा सोडवू : उदयनराजे♦आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.♦तत्सम जमातींचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रामोशी समाजबांधव अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करत आहेत. शासनाकडे वारंवार मागणी करून दुर्लक्ष केले जाते, असा आरोप करत न्याय हक्कासाठी रामोशी समाजातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले. त्यांनी हातात घेतलेल्या पिवळ्या झेंड्यामुळे साताºयात जणू भगवं वादळच संचारलं होतं.मोर्चात खासदार उदयनराजे भोसलेही सहभागी झाले होते. ‘सर्वसामान्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू,’ अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिली.जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालयातून साजरी करावी. त्यांचे छायाचित्रे सर्व कार्यालयांना उपलब्ध करून देण्याबाबत परिपत्रक काढावे. धनदांडग्यांनी बळकावलेल्या व इनाम वर्ग अ, ब च्या वतनी जमिनी रामोशी समाजाला परत कराव्यात. भिवडी येथे क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी निधीची तरतूद करावी. समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. बेरड, रामोशी व त्यांच्या तत्सम जमातींचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा.कृतिसमितीचा मोर्चाआंदोलनकर्त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इंग्रजांविरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले बंड पुकारणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती ७ सप्टेंबर २०१६ रोजी महाराष्ट्र बेडर, बेडर रामोशी समाज कृती समितीच्या वतीने राजभवन भिवडी स्मारक येथे झाली. परंतु या राष्ट्रपुरुषाच्या महान कार्याचा व क्रांतिकारी रामोशी समाजाचा या शासनाला विसर पडला आहे. निवेदन, माहिती अनेक वर्षे देऊनही कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळेच रामोशी समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या वंचित आहे. त्यामुळे बेडर, रामोशी समाज कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येत आहे.