शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

साताºयात पिवळं वादळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 22:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रामोशी समाजबांधव अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करत आहेत. शासनाकडे वारंवार मागणी करून दुर्लक्ष केले जाते, असा आरोप करत न्याय हक्कासाठी रामोशी समाजातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले. त्यांनी हातात घेतलेल्या पिवळ्या झेंड्यामुळे साताºयात जणू भगवं वादळच संचारलं होतं.मोर्चात खासदार उदयनराजे भोसलेही ...

ठळक मुद्दे♦ हजारो रामोशी समाजबांधव सहभागी♦ सर्वसामान्यांच्या व्यथा सोडवू : उदयनराजे♦आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.♦तत्सम जमातींचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रामोशी समाजबांधव अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करत आहेत. शासनाकडे वारंवार मागणी करून दुर्लक्ष केले जाते, असा आरोप करत न्याय हक्कासाठी रामोशी समाजातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले. त्यांनी हातात घेतलेल्या पिवळ्या झेंड्यामुळे साताºयात जणू भगवं वादळच संचारलं होतं.मोर्चात खासदार उदयनराजे भोसलेही सहभागी झाले होते. ‘सर्वसामान्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू,’ अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिली.जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालयातून साजरी करावी. त्यांचे छायाचित्रे सर्व कार्यालयांना उपलब्ध करून देण्याबाबत परिपत्रक काढावे. धनदांडग्यांनी बळकावलेल्या व इनाम वर्ग अ, ब च्या वतनी जमिनी रामोशी समाजाला परत कराव्यात. भिवडी येथे क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी निधीची तरतूद करावी. समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. बेरड, रामोशी व त्यांच्या तत्सम जमातींचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा.कृतिसमितीचा मोर्चाआंदोलनकर्त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इंग्रजांविरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले बंड पुकारणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती ७ सप्टेंबर २०१६ रोजी महाराष्ट्र बेडर, बेडर रामोशी समाज कृती समितीच्या वतीने राजभवन भिवडी स्मारक येथे झाली. परंतु या राष्ट्रपुरुषाच्या महान कार्याचा व क्रांतिकारी रामोशी समाजाचा या शासनाला विसर पडला आहे. निवेदन, माहिती अनेक वर्षे देऊनही कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळेच रामोशी समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या वंचित आहे. त्यामुळे बेडर, रामोशी समाज कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येत आहे.