शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

श्वानांच्या आकस्मित मृत्यूने सातारकर हबकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:45 IST

सातारा : सातारा शहरातील भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना आळूचा खड्डा परिसरात चार श्वानांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने ...

सातारा : सातारा शहरातील भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना आळूचा खड्डा परिसरात चार श्वानांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने सातारकर हबकले. पालिकेकडून या श्वानांची तातडीने विल्हेवाट लावण्यात आली असली तरी या श्वानांचा विषारी पदार्थ खाल्ल्याने मृत्यू झाला की त्यांना कोणी मारले? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

सातारा शहरात भटक्या श्वानांचा विषय नेहमीच चर्चेचा ठरत आलेला आहे. गल्लोगल्ली श्वानांची संख्या वाढल्याने नागरिक तसेच वाहनधारक अक्षरशः हैराण झाले आहेत. या श्वानांचा पालिकेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून वारंवार करण्यात आली आहे. या मागणीची दखल घेत पालिकेकडून येत्या काही दिवसात भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे.

दरम्यान, राजवाडाजवळील आळूचा खड्डा परिसरात अचानक तीन श्वान मृत्यूमुखी होऊन पडल्याची माहिती पालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश अष्टेकर यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाऱ्यांच्या मदतीने या श्वानांना डंपरमधून सोनगाव डेपोत नेण्यात आले. येथे रात्री उशिरा या श्वानांना दफन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा याचठिकाणी एक श्वान मृत्यूमुखी पडल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. या श्वानालाही डेपोत दफन करण्यात आले. सातारा शहरात भटक्या श्वानांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. या श्वानांनी काहीतरी खाल्ले असावे अथवा कोणीतरी त्यांना विषारी पदार्थ खायला दिला असावा, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

(चौकट)

‘त्या’ अफवेने उडवली अधिकाऱ्यांची झोप

आळूचा खड्डा परिसरात तब्बल ४० श्वान मृत्यूमुखी पडल्याची माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावरदेखील हे वृत्त वेगाने पसरले. आरोग्य विभागाला जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा अधिकारी व कर्मचाऱ्यांची अक्षरशः झोपच उडाली. प्रत्यक्षात चार श्वानांचा मृत्यू झाला असताना कोणीतरी ४० श्वान मृत्यूमुखी पडल्याची अफवा पसरविल्याने आरोग्य विभागाला याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला.