शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

श्वानांच्या आकस्मित मृत्यूने सातारकर हबकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:45 IST

सातारा : सातारा शहरातील भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना आळूचा खड्डा परिसरात चार श्वानांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने ...

सातारा : सातारा शहरातील भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना आळूचा खड्डा परिसरात चार श्वानांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने सातारकर हबकले. पालिकेकडून या श्वानांची तातडीने विल्हेवाट लावण्यात आली असली तरी या श्वानांचा विषारी पदार्थ खाल्ल्याने मृत्यू झाला की त्यांना कोणी मारले? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

सातारा शहरात भटक्या श्वानांचा विषय नेहमीच चर्चेचा ठरत आलेला आहे. गल्लोगल्ली श्वानांची संख्या वाढल्याने नागरिक तसेच वाहनधारक अक्षरशः हैराण झाले आहेत. या श्वानांचा पालिकेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून वारंवार करण्यात आली आहे. या मागणीची दखल घेत पालिकेकडून येत्या काही दिवसात भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे.

दरम्यान, राजवाडाजवळील आळूचा खड्डा परिसरात अचानक तीन श्वान मृत्यूमुखी होऊन पडल्याची माहिती पालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश अष्टेकर यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाऱ्यांच्या मदतीने या श्वानांना डंपरमधून सोनगाव डेपोत नेण्यात आले. येथे रात्री उशिरा या श्वानांना दफन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा याचठिकाणी एक श्वान मृत्यूमुखी पडल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. या श्वानालाही डेपोत दफन करण्यात आले. सातारा शहरात भटक्या श्वानांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. या श्वानांनी काहीतरी खाल्ले असावे अथवा कोणीतरी त्यांना विषारी पदार्थ खायला दिला असावा, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

(चौकट)

‘त्या’ अफवेने उडवली अधिकाऱ्यांची झोप

आळूचा खड्डा परिसरात तब्बल ४० श्वान मृत्यूमुखी पडल्याची माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावरदेखील हे वृत्त वेगाने पसरले. आरोग्य विभागाला जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा अधिकारी व कर्मचाऱ्यांची अक्षरशः झोपच उडाली. प्रत्यक्षात चार श्वानांचा मृत्यू झाला असताना कोणीतरी ४० श्वान मृत्यूमुखी पडल्याची अफवा पसरविल्याने आरोग्य विभागाला याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला.