शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सातारकर दिवसाला १३ मोबाईल हरवतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:37 IST

सातारा: शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याचे प्रकार वाढले असून, दिवसाला जवळपास १३ मोबाईल हरवत असल्याचे समोर आले आहे. यातील ...

सातारा: शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याचे प्रकार वाढले असून, दिवसाला जवळपास १३ मोबाईल हरवत असल्याचे समोर आले आहे. यातील काही जणांचे मोबाईल चोरीसही जात आहेत. मात्र, बहुतांशवेळा पोलीस गहाळ रजिस्टरला याची नोंद करत असल्यामुळे ही मोबाईल हरविण्याची आकडेवारी कमी दिसून येत आहे.

शहरात मोबाईल चोरीच्या घटनाही अलीकडे वाढत आहेत. दोन वर्षांपूर्वी शहरात मोबाईल चोरणाऱ्या टोळीने अक्षरश: धुडगूस घातला होता. रविवारपेठ भाजी मंडईमध्ये बाजाराच्या दिवशी तब्बल २० ते २५ मोबाईल चोरीस जात होते. शहर पोलिसांनी ही टोळी उदध्वस्त केली होती. त्यानंतर मात्र, काही दिवस मोबाईल चोरीस जाण्याचे प्रकार थांबले होते. परंतु पुन्हा या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. शहरात सातत्याने कुठे ना कुठे मोबाईल हरविण्याचे प्रकार घडत आहेत. परंतु पोलीस ठाण्यात आल्यानंतर क्राईम रेट वाढेल म्हणून पोलीस गहाळ रजिस्टरला याची नोंद करत असल्याचे पहायला मिळते. शहरात जवळपास दिवसाला १३ मोबाईल हरवत आहेत. महागडे मोबाईल चोरीस गेल्यानंतरच तक्रारदार पुढे येत आहेत. पण कमी किमतीचे मोबाईल चोरीस गेल्यानंतर अनेकजण मोबाईल पुन्हा आढळून येईल, याची आशा सोडून देतात.

२०२० मध्ये दाखल झालेल्या तक्रारी

जानेवारी १४

फेब्रुवारी ७

मार्च ८

एप्रिल ८

मे ९

जून ४

जुलै ३

ऑगस्ट ८

सप्टेंबर ९

ऑक्टोबर ५

नोव्हेंबर ९

डिसेंबर ४

चौकट : मंडईत जाताय...मोबाईल सांभाळा

मोबाईल चोरट्यांसाठी गर्दीचे सोयीचे ठिकाण म्हणजे भाजी मंडई. या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे चोरट्यांकडून याचा गैरफायदा उठवला जातो. भाजी खरेदी करत असताना वरच्या खिशातील मोबाईल हातोहात लांबविला जातो. तर भाजी घेताना खाली वाकल्यानंतर चुकून वरच्या खिशातील मोबाईल खाली पडतो. त्यावेळी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच महिलांच्या पर्समध्येही यावेळी मोबाईल असतो. भाजी खरेदीच्या नादात पर्सची चेन काढून मोबाईल चोरीस गेल्याचे यापूर्वी प्रकार घडले आहेत. त्यामुळे महिलांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.

चौकट : हरवले ५३..सापडले ३४

वर्षभरात चोरीस गेलेल्या मोबाईलची संख्या ५३ आहे. मात्र, यातील ३४ मोबाईलचा पोलिसांना शोध लागला आहे. अनेकवेळा मोबाईल चोरीस गेल्यानंतर तक्रारदार पुन्हा पोलीस ठाण्यात चौकशी करत नाहीत. त्यामुळे पोलिसांचा तपासही पेंडिंग राहतो. एखाद्या गुन्ह्यात मोबाईलचा गैरवापर होऊ नये म्हणून काहीजण तक्रार देतात. पुन्हा मोबाईल सापडेल, यासाठी मात्र, तक्रार देत नाहीत. हेच चोरट्यांच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसून येत आहे.

चौकट : मोबाईलमुळे गुन्हा उघडकीस येतो..पण मोबाईल सापडत नाही

एखादा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अनेकदा पोलीस मोबाईलचा वापर करतात. मोबाईलच्या लोकेशनवरून पोलीस गुन्हेगारांचा माग काढतात. पण एखाद्याचा मोबाईल चोरीस गेल्यानंतर गुन्हेगारांपर्यंत पोलीस का पोहोचत नाहीत, असा प्रश्न साहजिकच नागरिकांना पडत आहे. गुन्हा घडल्यानंतर पोलीस गांभीर्याने पाहतात पण मोबाईल हरविल्याच्या घटना किरकोळ समजून पोलीस याकडे दुर्लक्ष करतात.