शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

सातारकर दिवसाला १३ मोबाईल हरवतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:37 IST

सातारा: शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याचे प्रकार वाढले असून, दिवसाला जवळपास १३ मोबाईल हरवत असल्याचे समोर आले आहे. यातील ...

सातारा: शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याचे प्रकार वाढले असून, दिवसाला जवळपास १३ मोबाईल हरवत असल्याचे समोर आले आहे. यातील काही जणांचे मोबाईल चोरीसही जात आहेत. मात्र, बहुतांशवेळा पोलीस गहाळ रजिस्टरला याची नोंद करत असल्यामुळे ही मोबाईल हरविण्याची आकडेवारी कमी दिसून येत आहे.

शहरात मोबाईल चोरीच्या घटनाही अलीकडे वाढत आहेत. दोन वर्षांपूर्वी शहरात मोबाईल चोरणाऱ्या टोळीने अक्षरश: धुडगूस घातला होता. रविवारपेठ भाजी मंडईमध्ये बाजाराच्या दिवशी तब्बल २० ते २५ मोबाईल चोरीस जात होते. शहर पोलिसांनी ही टोळी उदध्वस्त केली होती. त्यानंतर मात्र, काही दिवस मोबाईल चोरीस जाण्याचे प्रकार थांबले होते. परंतु पुन्हा या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. शहरात सातत्याने कुठे ना कुठे मोबाईल हरविण्याचे प्रकार घडत आहेत. परंतु पोलीस ठाण्यात आल्यानंतर क्राईम रेट वाढेल म्हणून पोलीस गहाळ रजिस्टरला याची नोंद करत असल्याचे पहायला मिळते. शहरात जवळपास दिवसाला १३ मोबाईल हरवत आहेत. महागडे मोबाईल चोरीस गेल्यानंतरच तक्रारदार पुढे येत आहेत. पण कमी किमतीचे मोबाईल चोरीस गेल्यानंतर अनेकजण मोबाईल पुन्हा आढळून येईल, याची आशा सोडून देतात.

२०२० मध्ये दाखल झालेल्या तक्रारी

जानेवारी १४

फेब्रुवारी ७

मार्च ८

एप्रिल ८

मे ९

जून ४

जुलै ३

ऑगस्ट ८

सप्टेंबर ९

ऑक्टोबर ५

नोव्हेंबर ९

डिसेंबर ४

चौकट : मंडईत जाताय...मोबाईल सांभाळा

मोबाईल चोरट्यांसाठी गर्दीचे सोयीचे ठिकाण म्हणजे भाजी मंडई. या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे चोरट्यांकडून याचा गैरफायदा उठवला जातो. भाजी खरेदी करत असताना वरच्या खिशातील मोबाईल हातोहात लांबविला जातो. तर भाजी घेताना खाली वाकल्यानंतर चुकून वरच्या खिशातील मोबाईल खाली पडतो. त्यावेळी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच महिलांच्या पर्समध्येही यावेळी मोबाईल असतो. भाजी खरेदीच्या नादात पर्सची चेन काढून मोबाईल चोरीस गेल्याचे यापूर्वी प्रकार घडले आहेत. त्यामुळे महिलांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.

चौकट : हरवले ५३..सापडले ३४

वर्षभरात चोरीस गेलेल्या मोबाईलची संख्या ५३ आहे. मात्र, यातील ३४ मोबाईलचा पोलिसांना शोध लागला आहे. अनेकवेळा मोबाईल चोरीस गेल्यानंतर तक्रारदार पुन्हा पोलीस ठाण्यात चौकशी करत नाहीत. त्यामुळे पोलिसांचा तपासही पेंडिंग राहतो. एखाद्या गुन्ह्यात मोबाईलचा गैरवापर होऊ नये म्हणून काहीजण तक्रार देतात. पुन्हा मोबाईल सापडेल, यासाठी मात्र, तक्रार देत नाहीत. हेच चोरट्यांच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसून येत आहे.

चौकट : मोबाईलमुळे गुन्हा उघडकीस येतो..पण मोबाईल सापडत नाही

एखादा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अनेकदा पोलीस मोबाईलचा वापर करतात. मोबाईलच्या लोकेशनवरून पोलीस गुन्हेगारांचा माग काढतात. पण एखाद्याचा मोबाईल चोरीस गेल्यानंतर गुन्हेगारांपर्यंत पोलीस का पोहोचत नाहीत, असा प्रश्न साहजिकच नागरिकांना पडत आहे. गुन्हा घडल्यानंतर पोलीस गांभीर्याने पाहतात पण मोबाईल हरविल्याच्या घटना किरकोळ समजून पोलीस याकडे दुर्लक्ष करतात.