शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मराठी साहित्य संमेलनांवर सातारी सारस्वतांचा प्रभाव!

By admin | Updated: September 12, 2015 00:10 IST

इतिहासाला उजाळा : ११ सातारकरांनी पटकावले अध्यक्षपद

सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर याआधी ११ सातारकर सारस्वतांनी आपली मोहोर उमटवली आहे. गतवर्षी अरुण गोडबोले यांनी या पदासाठी लढत दिली होती, आताही अध्यक्षपदाच्या रिंगणात कवी श्रीनिवास वारुंजीकर हे सातारकर लढणार आहेत. १९०५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रघुनाथ पांडुरंग करंदीकर (सातारा) हे होते. नरसिंह चिंतामन केळकर हे बडोदे येथे १९२१ मध्ये झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष होते. औंधचे राजे भगवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी हे इंदोर येथे १९३५ झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले होते. चाफळचे यशवंत दिनकर पेंढारकर हे १९५० मध्ये मुंबई संमेलनाचे अध्यक्ष होते. पालीचे श्रीकृष्ण केशव क्षीरसागर यांनी १९५९ च्या मिरज संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.पूर्वी सातारा जिल्ह्यात असणाऱ्या माडगुळे गावचे गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) १९७३ मध्ये यवतमाळ संमेलनाचे अध्यक्ष होते. माडगुळे गावचेच दुसरे सुपुत्र व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे १९८३ मध्ये अंबेजोगाई संमेलनाचे अध्यक्ष होते.आटपाडीचे शंकरराव रामचंद्र खरात हे १९८४ मध्ये झालेल्या जळगाव संमेलनाचे अध्यक्ष होते. रहिमतपूरचे वसंत शंकर कानेटकर यांनी १९८८ मध्ये ठाणे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. सातारा शहरातील ना. सं. इनामदार यांनी १९९७ च्या नगर संमेलनाचे तर कऱ्हाडचे कवी वसंत वामन बापट यांनी १९९९ च्या मुंबई संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. दरम्यान, गतवर्षी सातारचे साहित्यिक अरुण गोडबोले यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती; पण त्यात त्यांना यश आले नव्हते. यावर्षीही सातारचे श्रीनिवास वारुंजीकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. (प्रतिनिधी)वारुंजीकरांचा फेसबुकद्वारे प्रचारअध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचाराची मोहीम श्रीनिवास वारुंजीकर यांनी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचाही आधार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी प्रथम फेसबुकवर पेजही तयार करण्यात आले असून, त्यावर वारुंजीकर यांनी आपली उमेदवारीमागील प्राथमिक भूमिकाही मांडली आहे.