शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

केरळच्या पूरग्रस्तांसाठी सातारकर गाळतायत घाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:00 IST

रहिमतपूर : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकर धावून गेले आहेत. कन्नूर या गावात संत निरंकारी मंडळाच्या सेवा दलाचे १०७ सदस्य गाळ काढणे व साफसफाईचे काम करताना घाम गाळत आहेत.संत निरंकारी मंडळाच्या प्रमुख सुधीक्षा महाराज यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा झोनमधील सेवादल जवान केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. केरळ येथील कन्नूर या ...

रहिमतपूर : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकर धावून गेले आहेत. कन्नूर या गावात संत निरंकारी मंडळाच्या सेवा दलाचे १०७ सदस्य गाळ काढणे व साफसफाईचे काम करताना घाम गाळत आहेत.संत निरंकारी मंडळाच्या प्रमुख सुधीक्षा महाराज यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा झोनमधील सेवादल जवान केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. केरळ येथील कन्नूर या गावात सेवाकार्य सुरू असून, ११ सप्टेंबरपर्यंत हे काम सुरू राहणार आहे, अशी माहिती सातारा झोनचे प्रमुख नंदकुमार झांबरे यांनी दिली.केरळमध्ये पुरामुळे खूप मोठी हानी झाली आहे; परंतु पूर ओसरल्यानंतर ठिकठिकाणी कचऱ्याचे व गाळाचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी खरी आवश्यकता आहे ती मनुष्यबळाची. हे ओळखून निरंकारी मंडळाच्या प्रमुख सुधीक्षा माताजी यांनी सेवादल व चॅरिटेबल फाउंडेशनच्या जवानांना केरळमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून सेवा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातून १०७ सेवादलाचे सदस्य सेवाकार्य करत आहेत. निरंकारी मंडळाच्या माध्यमातून आवश्यक्यता लागेल तिथे मनुष्यबळ पुरवले जात आहे. प्रत्येक टीमला दहा दिवसांसाठी कामाचे नियोजन करण्यात आले आहे. परत दुसºया विभागातील सेवादलाची टीम पुढील काम करणार आहे.इमारतीजवळ तीन फुटांपेक्षा जास्त गाळ...देशभरातून हजारो सेवा दलाचे जवान केरळमध्ये दाखल होत आहेत. यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस दलामधील अधिकाºयाचाही समावेश आहे. हे सेवा दलाचे जवान केरळमध्ये नेमून दिलेल्या ठिकाणी कचरा साफ करण्याचे काम करीत आहेत. प्रत्येक गावात गाळ व कचरा सफाईचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे. तसेच काही गावांमध्ये इमारतीमध्ये जवळपास तीन फुटांपेक्षा जास्त गाळ साचला आहे. तो बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. रस्ते पूर्ण वाहून गेले आहेत. ते दुरुस्तीचेही काम सुरू आहे. मानसिक व आर्थिक धक्क्यातून अजून केरळवासीय सावरले नाहीत. रोगराई पसरू नये, यासाठीही दक्षता घेतली जात आहे.