शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

केरळच्या पूरग्रस्तांसाठी सातारकर गाळतायत घाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:00 IST

रहिमतपूर : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकर धावून गेले आहेत. कन्नूर या गावात संत निरंकारी मंडळाच्या सेवा दलाचे १०७ सदस्य गाळ काढणे व साफसफाईचे काम करताना घाम गाळत आहेत.संत निरंकारी मंडळाच्या प्रमुख सुधीक्षा महाराज यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा झोनमधील सेवादल जवान केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. केरळ येथील कन्नूर या ...

रहिमतपूर : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकर धावून गेले आहेत. कन्नूर या गावात संत निरंकारी मंडळाच्या सेवा दलाचे १०७ सदस्य गाळ काढणे व साफसफाईचे काम करताना घाम गाळत आहेत.संत निरंकारी मंडळाच्या प्रमुख सुधीक्षा महाराज यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा झोनमधील सेवादल जवान केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. केरळ येथील कन्नूर या गावात सेवाकार्य सुरू असून, ११ सप्टेंबरपर्यंत हे काम सुरू राहणार आहे, अशी माहिती सातारा झोनचे प्रमुख नंदकुमार झांबरे यांनी दिली.केरळमध्ये पुरामुळे खूप मोठी हानी झाली आहे; परंतु पूर ओसरल्यानंतर ठिकठिकाणी कचऱ्याचे व गाळाचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी खरी आवश्यकता आहे ती मनुष्यबळाची. हे ओळखून निरंकारी मंडळाच्या प्रमुख सुधीक्षा माताजी यांनी सेवादल व चॅरिटेबल फाउंडेशनच्या जवानांना केरळमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून सेवा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातून १०७ सेवादलाचे सदस्य सेवाकार्य करत आहेत. निरंकारी मंडळाच्या माध्यमातून आवश्यक्यता लागेल तिथे मनुष्यबळ पुरवले जात आहे. प्रत्येक टीमला दहा दिवसांसाठी कामाचे नियोजन करण्यात आले आहे. परत दुसºया विभागातील सेवादलाची टीम पुढील काम करणार आहे.इमारतीजवळ तीन फुटांपेक्षा जास्त गाळ...देशभरातून हजारो सेवा दलाचे जवान केरळमध्ये दाखल होत आहेत. यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस दलामधील अधिकाºयाचाही समावेश आहे. हे सेवा दलाचे जवान केरळमध्ये नेमून दिलेल्या ठिकाणी कचरा साफ करण्याचे काम करीत आहेत. प्रत्येक गावात गाळ व कचरा सफाईचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे. तसेच काही गावांमध्ये इमारतीमध्ये जवळपास तीन फुटांपेक्षा जास्त गाळ साचला आहे. तो बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. रस्ते पूर्ण वाहून गेले आहेत. ते दुरुस्तीचेही काम सुरू आहे. मानसिक व आर्थिक धक्क्यातून अजून केरळवासीय सावरले नाहीत. रोगराई पसरू नये, यासाठीही दक्षता घेतली जात आहे.