शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

भर पुरातही साताऱ्याची पाणी योजना अखंडित सुरू -: संजय गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:49 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणी योजना कृष्णा नदीवर आहे. पश्चिम भागात मोठा पाऊस झाल्यानं कृष्णा नदीला पूर आला होता. आम्ही उपाययोजना राबविली. - संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

ठळक मुद्देशुद्ध पाणी पुरवठ्यासाठी आग्रही

सागर गुजर।यंदाच्या पावसाने भलताच कहर केला. जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पूर आला. नदीकाठच्या पाणी योजना पुराच्या पाण्याखाली गेल्या. आजच्या घडीला अनेक योजनांमध्ये गाळ साठला आहे; परंतु सातारा शहराचा पूर्वभाग तसेच आजूबाजूच्या उपनगरांना पाणीपुरवठा करणारी कृष्णा नदीवरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणी योजना अखंडितपणे सुरू राहिली. प्राधिकरणचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्त अभियंत्यांनी दूरदृष्टी दाखवून पावसाळ्यात युद्धपातळीवर उपायोजना आखल्याने हे शक्य झाले.

प्रश्न : पूर परिस्थितीत काय उपाय केले?उत्तर : साताºयाची पाणी योजना ही माहुली येथील कृष्णा नदीवर आहे. यंदा नदीला मोठा पूर आला होता. पंपिंग हाऊसमध्ये पाणी गेले असते तर अनेक दिवस ही योजना बंद पडली असती; परंतु आम्ही पंपिंग हाऊसला धोका निर्माण होऊ नये, यासाठी तसेच पंपिंग हाऊसमध्ये पाणी शिरू नये, याची आधीच खबरदारी घेतली होती.

प्रश्न : पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण काय?उत्तर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ग्राहकांकडून दरवर्षी सहा ते सात कोटी रुपयांची पाणीपट्टी वसुली होत होती. मी आल्यानंतर वसुलीवर भर दिला. विशेषत: थकबाकी वसुली केली. गतवर्षी तब्बल ११ कोटींचा वसूल करून आम्ही तो शासनाच्या तिजोरीत भरला आहे. विकासकामांसाठी पैसे महत्त्वाचे असतात. थकित रकमा वसूल झाल्याने आम्ही जलसंपदाचे बिल भरू शकलो.

प्रश्न : जलसंपदाची देणी दिली का?उत्तर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणी योजना ही नदीवर आहे. योजनेसाठी पाणी वापरत असल्याने त्याची पाणीपट्टी जलसंपदा विभागाला भरावी लागते. सन २००६ ते २०१९ या कालावधीतील थकलेली १ कोटी ४५ लाखांची वसुली आम्ही भरली आहे. एका रुपयाचाही देणे राहिलेले नाही. शासकीय कार्यालयांकडील थकबाकी वसूल केल्याने हे शक्य झाले आहे.‘इंजिनिअर डे’ च्या निमित्ताने सत्कारमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सातारा कार्यालयात कार्यकारी अभियंता म्हणून काम करणाºया संजय गायकवाड यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. नेहमीच्या कामासोबतच शासकीय महसूल मोठ्या प्रमाणावर जमा करून जलसंपदा विभागाची असलेली थकबाकी ही त्यांनी पूर्ण भरल्याने ‘इंजिनिअर्स डे’ च्या निमित्ताने पुण्यात त्यांचा विशेष सत्कार झाला.थकबाकी वसुलीप्राधिकरणाच्या माध्यमातून सातारा शहराचा पूर्वभाग शहरालगतची मोठी उपनगरे तसेच काही ग्रामपंचायतींच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जातो. यात शासकीय इमारतींचाही समावेश आहे. ही वसुली करण्यावर भर दिला. शासकीय कार्यालतयांकडे अनेक दिवसांची थकबाकी होती. ती वसूल करण्यावर भर दिला. त्यात यशही आले. आता थकबाकी राहिली आही.

टॅग्स :water transportजलवाहतूकSatara areaसातारा परिसर