शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

साताऱ्याच्या खंडणीबहाद्दरांचा बंदोबस्त करणार

By admin | Updated: January 30, 2015 23:18 IST

विजय शिवतारे : बिल्डरांना दिलेल्या उत्खननाच्या नोटीसा परत घेणार

सातारा : ‘सातारा शहराच्या विकासामध्ये बिल्डर, उद्योजक व व्यापारी यांचे योगदान महत्त्वाचे आहे. नियमबद्ध काम करणाऱ्या बिल्डरांना उत्खननासाठी लाखो रुपयांचा दंड केल्याचा अजब प्रकार साताऱ्यातच मी पाहिला आहे. नियमात काम करणाऱ्या बिल्डरांना उत्खननासाठी बजावण्यात आलेली नोटीस जिल्हाधिकाऱ्यांना परत घेण्याची सूचना देण्यात येणार आहेत. तसेच बिल्डर, डेव्हलपर व उद्योजकांना त्रास देणाऱ्या खंडणीबहाद्दरांचा बंदोबस्त करणार आहे,’ असे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. येथील के्रडाई सातारा शाखा व बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया सातारा शाखेच्यावतीने पालकमंत्री शिवतारे यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी शिवतारे बोलत होते.के्रडाई सातारा शाखा व बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया सातारा शाखेच्यावतीने क्रिडाई शाखेचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, उपाध्यक्ष कमलेश पिसाळ यांनी शिवतारे यांचे स्वागत केले.पालकमंत्री शिवतारे यांनी विविध विषयांवर सखोल चर्चा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘सातारा शहर व परिसरातील बिल्डर, डेव्हलपर, उद्योजक व व्यापारीवर्ग यांना खंडणीबहाद्दरांचा त्रास होत असून या खंडणी बहाद्दरांचा ताबडतोब बंदोबस्त करणार आहे. त्यासाठी येत्या काही दिवसात बिल्डर, डेव्हलपर, उद्योजक, व्यावसयिक यांची एकत्रित बैठक जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत आयोजित करणार आहे. यामध्ये खंडणीबहाद्दरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणार आहे.महाराष्ट्रातील अनेक छोट्या शहरांचा वेगाने विकास होत असून सातारा जिल्ह्याचा येत्या काही काळात आधुनिक सातारा असा चेहरा समोर आणण्यासाठी सातारा शहर व जिल्ह्यात विविध उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विकासामध्ये सर्वात मोठा बिल्डर, डेव्हलपर यांचा वाटा आहे, असेही त्यांनी सांगितले.’यावेळी आ. शंभूराज देसाई, श्रीधर कंग्राळकर, कमलेश पिसाळ, सुधीर शिंदे, सुधीर घार्गे, बाळासाहेब ठक्कर, अभिजित पाटील, सुधीर ठोके, मंगेश वाडेकर, जितेंद्र भोसले, सलीम कच्छी, राहुल वखारिया, पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘लोकमत’चे कौतुक...‘लोकमत’ने साताऱ्याच्या बिल्डरांना येणाऱ्या अडचणीविषयी सातत्याने लेखन केले होते.‘लोकमत’च्या या भूमिकेचे यावेळी बिल्डरांनी शिवतारे यांच्यासमोर कौतुक केले. ‘सातारा शहराचा विकास करण्यासाठी शहराची हद्द वाढ होणे गरजेचे असून मुख्यमंत्र्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावणार आहे. त्याप्रमाणे सातारा शहरात डेव्हलपमेंट प्लॅन लागू करणे गरजेचे असून यासंबंधातील आर. पी. कमिटीची नव्याने स्थापना करून या समितीमध्ये बिल्डर, आर्किटेक्ट व व्यापारी यांचे प्रतिनिधी नेमणार आहे. यासाठी के्रडाई व बिल्डर्स असोसिएशनने शहराचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने करता येईल यासाठी आराखडा तयार करावा,’असे आवाहन शिवतारे यांनी केले.