शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

साताऱ्याची बाजारपेठ रात्री नऊनंतरही खुलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:09 IST

सातारा : कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बाजारपेठेवर पुुन्हा एकदा वेळेचे बंधन घातले आहे. नव्या नियमावलीनुसार ...

सातारा : कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बाजारपेठेवर पुुन्हा एकदा वेळेचे बंधन घातले आहे. नव्या नियमावलीनुसार बाजारपेठ सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, साताऱ्यात रात्री नऊनंतरही बहुतांश दुकाने सुरू ठेवली जात आहेत. कोरोनाचे दुकानदार व विक्रेत्यांना तसूभरही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

राज्यासह सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा एकदा ठोस पावले उचलण्यात आली आहेत. जिल्ह्यातील निवासी वगळता इतर सर्व पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रम तसेच विवाह सोहळ्यातील नागरिकांच्या उपस्थितीवरही निर्बंध घालण्यात आले आहे. याचबरोबरच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बाजारपेठेवरही वेळेचे बंधन घातले असून, सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बाजारपेठ सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, शहरातील बहुतांश व्यापारी, दुकानदार, खाद्यपदार्थांच्या गाड्या, टपºया तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जुमानला जात नाही.

रात्री नऊनंतरही शहरातील बसस्थानक परिसर, पोवई नाका, राजपथ, राजवाडा, मोती चौक, खणआळी, ५०१ पाटी, रविवार पेठ आदी ठिकाणची अनेक दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली जातात. काही दुकाने तर बाहेरून बंद व आतून मात्र सुरू असतात. ग्राहक आल्यास दुकानाचे शटर उघडले जाते व ग्राहक गेला की शटर बंद होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात असताना नागरिकांसह दुकानदार व व्यापाऱ्यांना याचे कोणतेच गांभीर्य नाही. शासन नियमांचे पालन न केल्यास प्रशासनापुढे लॉकडाऊनशिवाय कोणताच पर्याय उरणार नाही, या गोष्टीचा सातारकरांनी विचार करायला हवा.

(चौकट)

पालिका कारवाई करणार कधी?

सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे यासाठी दुकानात एका वेळी केवळ पाच नागरिकांना प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, शहरातील एकाही दुकानदार व व्यापाऱ्यांकडून या आदेशाचे पालन केले जात नाही. सोशल डिस्टन्सचा सातत्याने फज्जा उडत असून, ही बाब कोरोनावाढीसाठी कारणीभूूत ठरू शकते. नागरिकांसह दुकानदारांवर अंकुश लावण्यासाठी आता पालिका प्रशासनानेच दंडात्मक कारवाई सुरू करणे गरजेचे बनले आहे.

फोटो : जावेद खान

लोगो : रिॲलिटी चेक