शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याची बाजारपेठ रात्री नऊनंतरही खुलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:09 IST

सातारा : कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बाजारपेठेवर पुुन्हा एकदा वेळेचे बंधन घातले आहे. नव्या नियमावलीनुसार ...

सातारा : कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बाजारपेठेवर पुुन्हा एकदा वेळेचे बंधन घातले आहे. नव्या नियमावलीनुसार बाजारपेठ सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, साताऱ्यात रात्री नऊनंतरही बहुतांश दुकाने सुरू ठेवली जात आहेत. कोरोनाचे दुकानदार व विक्रेत्यांना तसूभरही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

राज्यासह सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा एकदा ठोस पावले उचलण्यात आली आहेत. जिल्ह्यातील निवासी वगळता इतर सर्व पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रम तसेच विवाह सोहळ्यातील नागरिकांच्या उपस्थितीवरही निर्बंध घालण्यात आले आहे. याचबरोबरच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बाजारपेठेवरही वेळेचे बंधन घातले असून, सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बाजारपेठ सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, शहरातील बहुतांश व्यापारी, दुकानदार, खाद्यपदार्थांच्या गाड्या, टपºया तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जुमानला जात नाही.

रात्री नऊनंतरही शहरातील बसस्थानक परिसर, पोवई नाका, राजपथ, राजवाडा, मोती चौक, खणआळी, ५०१ पाटी, रविवार पेठ आदी ठिकाणची अनेक दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली जातात. काही दुकाने तर बाहेरून बंद व आतून मात्र सुरू असतात. ग्राहक आल्यास दुकानाचे शटर उघडले जाते व ग्राहक गेला की शटर बंद होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात असताना नागरिकांसह दुकानदार व व्यापाऱ्यांना याचे कोणतेच गांभीर्य नाही. शासन नियमांचे पालन न केल्यास प्रशासनापुढे लॉकडाऊनशिवाय कोणताच पर्याय उरणार नाही, या गोष्टीचा सातारकरांनी विचार करायला हवा.

(चौकट)

पालिका कारवाई करणार कधी?

सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे यासाठी दुकानात एका वेळी केवळ पाच नागरिकांना प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, शहरातील एकाही दुकानदार व व्यापाऱ्यांकडून या आदेशाचे पालन केले जात नाही. सोशल डिस्टन्सचा सातत्याने फज्जा उडत असून, ही बाब कोरोनावाढीसाठी कारणीभूूत ठरू शकते. नागरिकांसह दुकानदारांवर अंकुश लावण्यासाठी आता पालिका प्रशासनानेच दंडात्मक कारवाई सुरू करणे गरजेचे बनले आहे.

फोटो : जावेद खान

लोगो : रिॲलिटी चेक