शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कडक निर्बंधांमुळे साताऱ्यात भरला बाजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:38 IST

सातारा : लॉकडाऊन असूनही जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे मंगळवारपासून कडक लॉकडाऊन असणार आहे. दुकाने, ...

सातारा : लॉकडाऊन असूनही जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे मंगळवारपासून कडक लॉकडाऊन असणार आहे. दुकाने, भाजीपाला पूर्ण बंद असणार आहे. तर पंपावरही अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. त्यामुळे रविवारी साताऱ्यात खरेदीसाठी अनेक ठिकाणी गर्दी दिसून आली. काहींनी भाज्या खरेदी केल्या तर किराणा दुकानदारांना अनेकांनी चिठ्ठी देऊन नंतर साहित्य नेले. तसेच पंपावरही अनेकांनी वाहनांच्या टाक्या फुल्ल केल्याचे दिसून आले.

सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट अधिक तीव्र होत चालली आहे. दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्याचप्रमाणात मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडाही वाढत चालला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या दीड लाखाच्या उंबरठ्यावर असून आतापर्यंत ३४२५ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दीड महिन्यापासून लॉकडाऊन आहे. सुरुवातीला काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर बाधित संख्या कमी होत नसल्याने आणखी काही निर्बंध घातले. या निर्बंधांना महिना होत आला तरी अजूनही बाधित कमी होत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २४ मेच्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लागू केले आहेत.

या नवीन निर्बंधामुळे एक जूनपर्यंत व्यापारी तसेच इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. उपाहारगृहे, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, बाजार, भाजी व फळ मार्केट, मंडई, फेरीवाले, वाईन शॉप, देशी दारू दुकाने, मांस विक्री दुकाने, कृषी बाजार समिती अंतर्गत सर्व व्यवहार, बेकरी, वाहन दुरुस्ती, रिझर्व्ह बँकेने विहित केलेल्या सेवा, वित्तीय बाजार, बांधकामे आणि राज्य परिवहन महामंडळाची जिल्हांतर्गत वाहतूक सेवाही पूर्ण बंद राहणार आहे. फक्त रुग्णालये, निदान केंद्र, औषध कंपन्या व दुकाने सुरू राहतील. तसेच दूध संकलन केंद्र सकाळी ७ ते ९ पर्यंत सुरू राहणार असून घरपोच दूध वितरणाला परवानगी आहे. तसेच पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इंधन मिळणार आहे.

जिल्ह्यात मंगळवारपासून कडक निर्बंध लागू होत असल्याने रविवारी सातारा शहरात अनेक नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. बाजार समितीत तर व्यापाऱ्यांसह स्थानिक अनेक नागरिकांनी भाजी खरेदी केली. तर सध्या किराणा दुकानदारांना घरपोच सेवा आहे. तीही बंद होणार असल्याने अनेक नागरिकांनी आडबाजूच्या दुकानात जाऊन किराणा माल खरेदी केला. तसेच अनेकांनी दुकानदारांना साहित्याची चिठ्ठी देऊन मालाचे पॅकिंग झाल्यानंतर तो नेला. शहरातील पंपावरही वाहनधारकांनी गर्दी केली होती. अनेकांनी दुचाकीसारख्या वाहनांच्या टाक्या फुल्ल केल्याचे दिसून आले.

............................