शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

कडक निर्बंधांमुळे साताऱ्यात भरला बाजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:38 IST

सातारा : लॉकडाऊन असूनही जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे मंगळवारपासून कडक लॉकडाऊन असणार आहे. दुकाने, ...

सातारा : लॉकडाऊन असूनही जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे मंगळवारपासून कडक लॉकडाऊन असणार आहे. दुकाने, भाजीपाला पूर्ण बंद असणार आहे. तर पंपावरही अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. त्यामुळे रविवारी साताऱ्यात खरेदीसाठी अनेक ठिकाणी गर्दी दिसून आली. काहींनी भाज्या खरेदी केल्या तर किराणा दुकानदारांना अनेकांनी चिठ्ठी देऊन नंतर साहित्य नेले. तसेच पंपावरही अनेकांनी वाहनांच्या टाक्या फुल्ल केल्याचे दिसून आले.

सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट अधिक तीव्र होत चालली आहे. दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्याचप्रमाणात मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडाही वाढत चालला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या दीड लाखाच्या उंबरठ्यावर असून आतापर्यंत ३४२५ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दीड महिन्यापासून लॉकडाऊन आहे. सुरुवातीला काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर बाधित संख्या कमी होत नसल्याने आणखी काही निर्बंध घातले. या निर्बंधांना महिना होत आला तरी अजूनही बाधित कमी होत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २४ मेच्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लागू केले आहेत.

या नवीन निर्बंधामुळे एक जूनपर्यंत व्यापारी तसेच इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. उपाहारगृहे, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, बाजार, भाजी व फळ मार्केट, मंडई, फेरीवाले, वाईन शॉप, देशी दारू दुकाने, मांस विक्री दुकाने, कृषी बाजार समिती अंतर्गत सर्व व्यवहार, बेकरी, वाहन दुरुस्ती, रिझर्व्ह बँकेने विहित केलेल्या सेवा, वित्तीय बाजार, बांधकामे आणि राज्य परिवहन महामंडळाची जिल्हांतर्गत वाहतूक सेवाही पूर्ण बंद राहणार आहे. फक्त रुग्णालये, निदान केंद्र, औषध कंपन्या व दुकाने सुरू राहतील. तसेच दूध संकलन केंद्र सकाळी ७ ते ९ पर्यंत सुरू राहणार असून घरपोच दूध वितरणाला परवानगी आहे. तसेच पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इंधन मिळणार आहे.

जिल्ह्यात मंगळवारपासून कडक निर्बंध लागू होत असल्याने रविवारी सातारा शहरात अनेक नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. बाजार समितीत तर व्यापाऱ्यांसह स्थानिक अनेक नागरिकांनी भाजी खरेदी केली. तर सध्या किराणा दुकानदारांना घरपोच सेवा आहे. तीही बंद होणार असल्याने अनेक नागरिकांनी आडबाजूच्या दुकानात जाऊन किराणा माल खरेदी केला. तसेच अनेकांनी दुकानदारांना साहित्याची चिठ्ठी देऊन मालाचे पॅकिंग झाल्यानंतर तो नेला. शहरातील पंपावरही वाहनधारकांनी गर्दी केली होती. अनेकांनी दुचाकीसारख्या वाहनांच्या टाक्या फुल्ल केल्याचे दिसून आले.

............................