शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

फाशीचा वडची स्वच्छता करून ‘सातारा क्रांती दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताºयाच्या इतिहासात ८ सप्टेंबर हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. १८५७ च्या बंडात सहभाग असणारे साताºयाचे सतरा नरवीर आजच्या दिवशीच शहीद झाले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी गेंडामाळ येथे फाशीचा वड उभारला आहे. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी कला, वाणिज्य महाविद्यालय व जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेच्या वतीने फाशीचा ...

ठळक मुद्दे ‘जिज्ञासा ग्रुप’चा उपक्रम ; कला, वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जागविल्या क्रांतिकारकांच्या आठवणी

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताºयाच्या इतिहासात ८ सप्टेंबर हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. १८५७ च्या बंडात सहभाग असणारे साताºयाचे सतरा नरवीर आजच्या दिवशीच शहीद झाले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी गेंडामाळ येथे फाशीचा वड उभारला आहे. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी कला, वाणिज्य महाविद्यालय व जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेच्या वतीने फाशीचा वड येथे शुक्रवारी अभिवादन केले.

क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून सातारा जगभर ओळखला जातो. देशावरील प्रत्येक संकटावेळी सातारा जिल्हा धावून आला. १८५७ चा लढा स्वातंत्रसंग्रामातील महत्त्वाचा मानला जातो. यामध्येही साताºयातील सुपुत्र सहभागी झाले होते.या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांना १८५७ च्या बंडातील सातारकरांचे योगदान, रगोंबापूजी गुप्तेंनी स्वामी निष्ठेपाई सातारा ते इंग्लंडपर्यंत केलेला चित्तथरारक प्रवास व इंग्लंडमधील त्यांचे कार्य याबद्दल जिज्ञासा इतिहास संशोधन ग्रुपचे नीलेश पंडित यांनी माहिती दिली.

या कार्यक्रमासाठी जिज्ञासा संस्थेचे पदाधिकारी तसेच कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. बी. सातपुते, प्रा. डॉ. भरत जाधव, प्रा. डॉ. संदीप पाटील, प्रा. संदीप पाटील, प्रा. प्रकाश कांबळे, प्रा. युवराज जाधव, सागर गायकवाड, प्रा. गौतम काटकर उपस्थित होते.प्रशासनाचे दुर्लक्षसातारा क्रांती दिनी दरवर्षी जिज्ञासा इतिहास संशोधन क्रांती दिनी विविध उपक्रमांनी अभिवादन केले जाते. परंतु, प्रशासनाचे दरवर्षीच दुर्लक्ष होत आहे. कोणताही प्रतिनिधी तेथे येऊन अभिवादन करत नाही, अशी खंत इतिहास संशोधकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.सातारा येथील फाशीचा वड येथे शुक्रवारी जिज्ञासा इतिहास संशोधन संस्था व कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.