शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : तमाशातला राजा; सकाळी डोक्यावर पेटी, साताऱ्यात राहुट्या लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 16:06 IST

तमाशा कलेचा गेल्या ५० वर्षांपासूनचा वारसा आहे. कुठे आधार नसल्यामुळेच या तमाशाचा जिवावर दिवस काढावे लागत आहेत. गावोगावच्या देवांच्या जत्रा हेच आमचं जगण्याचं साधन असून तमाशातील राजा अन् सकाळी डोक्यावर पेटी, अशी आमची स्थिती आहे, हे वास्तव मांडले ते गोविंदराव पाटणकर या तमाशा मालकाने.

ठळक मुद्देतमाशातला राजा; सकाळी डोक्यावर पेटी साताऱ्यात राहुट्या लागल्या चार महिने पोटासाठी कलाकारांची भ्रमंती

सातारा : तमाशा कलेचा गेल्या ५० वर्षांपासूनचा वारसा आहे. कुठे आधार नसल्यामुळेच या तमाशाचा जिवावर दिवस काढावे लागत आहेत. गावोगावच्या देवांच्या जत्रा हेच आमचं जगण्याचं साधन असून तमाशातील राजा अन् सकाळी डोक्यावर पेटी, अशी आमची स्थिती आहे, हे वास्तव मांडले ते गोविंदराव पाटणकर या तमाशा मालकाने.सध्या गावोगावी ग्रामदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. त्यानिमित्ताने साताऱ्यातील श्री खंडोबाळाच्या माळावर तमाशा कलावंतांच्या राहुट्या लागू लागल्या आहेत. येथेच गोविंदराव पाटणकर यांनी मनमोकळ्या गप्पा मारताना गेल्या ५० वर्षांपासूनचा इतिहास समोर मांडला. तसेच शासनाकडून होणारे दुर्लक्षही कथन केले.पाटणकर म्हणाले, वडील तमाशात कलाकार होते. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षापासून काम करण्यास सुरूवात झाली. ३० वर्षांपासून स्वत:चा तमाशाचा फड आहे तर आतापर्यंत ५० वर्षे या कलेसाठी गेली आहेत. पण, खरं सांगायचं झालं तर आम्ही कधीच मोठं झालो नाही. या तमाशाच्या फडावर काहीच भागत नाही.

चार महिन्यांचा हा खेळ असतो. त्यात ३० ते ४० सुपाऱ्या मिळतात. पण, त्यामागील खर्च पाहता हे सर्व झेपत नाही. दररोज ३० ते ३५ माणसांचा कबिला सांभाळायचा असतो. कलाकाराने घर सोडलं की सर्व आम्हालाच बघायला लागतं. त्यात एका सुपारीला ३० ते ३५ हजार रुपये मिळायचे. मग, सर्वांना पैसे देऊन जवळ काहीच राहत नाही. पण, हा व्यवसाय करण्याशिवाय समोर दुसरा पर्यायही नाही.

आम्हाला घर नाही की शेती नाही. हे चार महिने तमाशा झाला की जिवनाचाही तमाशा होतो. कारण, कुठेही मजुरी, रोजंदार, हमाली अशी कामे करतो. शासनही काही देण्यास तयार नाही. ६५ वर्षांवरील कलाकारांना मानधन मिळते. पण, हे मला तर अद्याप मिळालेले नाही. भारुडाच्या पोटी जन्माला आलेली ही कलाच कशीबशी जगविते. तर दुसरीकडे तमाशातून नाटक पुढे आले.

नाटकातून चित्रपट आले आणि ते सर्वजण अब्जाधीश झाले. पण, आम्हा तमाशा कलाकाराच्या जिवनाचा तमाशाच झाला. पोरं शिकतात, पण, नोकरी तरी त्यांना कुठे मिळते. मग काय तर तमाशातील फळ्या, पेट्या, कपडे उचलता-उचलता ते पण तमाशातीलच कलाकार होतात, अशी आमच्या जीवनाची तऱ्हा आहे.साताऱ्यात आठ दिवस झालेतरी आणखी एकही सुपारी मिळाली नाही. स्पर्धेच्या या जगाचा आम्हाला फटका बसत आहे. त्यामुळे विचार करुन-करुन आता आजारही होऊ लागले आहेत, पण, जगायचं याच ध्येयाने तमाशा जिवंत ठेवला आहे, अशी सलही पाटणकर यांनी यानिमित्ताने बोलून दाखविली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcultureसांस्कृतिक