शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

सातारा : तमाशातला राजा; सकाळी डोक्यावर पेटी, साताऱ्यात राहुट्या लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 16:06 IST

तमाशा कलेचा गेल्या ५० वर्षांपासूनचा वारसा आहे. कुठे आधार नसल्यामुळेच या तमाशाचा जिवावर दिवस काढावे लागत आहेत. गावोगावच्या देवांच्या जत्रा हेच आमचं जगण्याचं साधन असून तमाशातील राजा अन् सकाळी डोक्यावर पेटी, अशी आमची स्थिती आहे, हे वास्तव मांडले ते गोविंदराव पाटणकर या तमाशा मालकाने.

ठळक मुद्देतमाशातला राजा; सकाळी डोक्यावर पेटी साताऱ्यात राहुट्या लागल्या चार महिने पोटासाठी कलाकारांची भ्रमंती

सातारा : तमाशा कलेचा गेल्या ५० वर्षांपासूनचा वारसा आहे. कुठे आधार नसल्यामुळेच या तमाशाचा जिवावर दिवस काढावे लागत आहेत. गावोगावच्या देवांच्या जत्रा हेच आमचं जगण्याचं साधन असून तमाशातील राजा अन् सकाळी डोक्यावर पेटी, अशी आमची स्थिती आहे, हे वास्तव मांडले ते गोविंदराव पाटणकर या तमाशा मालकाने.सध्या गावोगावी ग्रामदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. त्यानिमित्ताने साताऱ्यातील श्री खंडोबाळाच्या माळावर तमाशा कलावंतांच्या राहुट्या लागू लागल्या आहेत. येथेच गोविंदराव पाटणकर यांनी मनमोकळ्या गप्पा मारताना गेल्या ५० वर्षांपासूनचा इतिहास समोर मांडला. तसेच शासनाकडून होणारे दुर्लक्षही कथन केले.पाटणकर म्हणाले, वडील तमाशात कलाकार होते. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षापासून काम करण्यास सुरूवात झाली. ३० वर्षांपासून स्वत:चा तमाशाचा फड आहे तर आतापर्यंत ५० वर्षे या कलेसाठी गेली आहेत. पण, खरं सांगायचं झालं तर आम्ही कधीच मोठं झालो नाही. या तमाशाच्या फडावर काहीच भागत नाही.

चार महिन्यांचा हा खेळ असतो. त्यात ३० ते ४० सुपाऱ्या मिळतात. पण, त्यामागील खर्च पाहता हे सर्व झेपत नाही. दररोज ३० ते ३५ माणसांचा कबिला सांभाळायचा असतो. कलाकाराने घर सोडलं की सर्व आम्हालाच बघायला लागतं. त्यात एका सुपारीला ३० ते ३५ हजार रुपये मिळायचे. मग, सर्वांना पैसे देऊन जवळ काहीच राहत नाही. पण, हा व्यवसाय करण्याशिवाय समोर दुसरा पर्यायही नाही.

आम्हाला घर नाही की शेती नाही. हे चार महिने तमाशा झाला की जिवनाचाही तमाशा होतो. कारण, कुठेही मजुरी, रोजंदार, हमाली अशी कामे करतो. शासनही काही देण्यास तयार नाही. ६५ वर्षांवरील कलाकारांना मानधन मिळते. पण, हे मला तर अद्याप मिळालेले नाही. भारुडाच्या पोटी जन्माला आलेली ही कलाच कशीबशी जगविते. तर दुसरीकडे तमाशातून नाटक पुढे आले.

नाटकातून चित्रपट आले आणि ते सर्वजण अब्जाधीश झाले. पण, आम्हा तमाशा कलाकाराच्या जिवनाचा तमाशाच झाला. पोरं शिकतात, पण, नोकरी तरी त्यांना कुठे मिळते. मग काय तर तमाशातील फळ्या, पेट्या, कपडे उचलता-उचलता ते पण तमाशातीलच कलाकार होतात, अशी आमच्या जीवनाची तऱ्हा आहे.साताऱ्यात आठ दिवस झालेतरी आणखी एकही सुपारी मिळाली नाही. स्पर्धेच्या या जगाचा आम्हाला फटका बसत आहे. त्यामुळे विचार करुन-करुन आता आजारही होऊ लागले आहेत, पण, जगायचं याच ध्येयाने तमाशा जिवंत ठेवला आहे, अशी सलही पाटणकर यांनी यानिमित्ताने बोलून दाखविली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcultureसांस्कृतिक