शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

सातारा : तमाशातला राजा; सकाळी डोक्यावर पेटी, साताऱ्यात राहुट्या लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 16:06 IST

तमाशा कलेचा गेल्या ५० वर्षांपासूनचा वारसा आहे. कुठे आधार नसल्यामुळेच या तमाशाचा जिवावर दिवस काढावे लागत आहेत. गावोगावच्या देवांच्या जत्रा हेच आमचं जगण्याचं साधन असून तमाशातील राजा अन् सकाळी डोक्यावर पेटी, अशी आमची स्थिती आहे, हे वास्तव मांडले ते गोविंदराव पाटणकर या तमाशा मालकाने.

ठळक मुद्देतमाशातला राजा; सकाळी डोक्यावर पेटी साताऱ्यात राहुट्या लागल्या चार महिने पोटासाठी कलाकारांची भ्रमंती

सातारा : तमाशा कलेचा गेल्या ५० वर्षांपासूनचा वारसा आहे. कुठे आधार नसल्यामुळेच या तमाशाचा जिवावर दिवस काढावे लागत आहेत. गावोगावच्या देवांच्या जत्रा हेच आमचं जगण्याचं साधन असून तमाशातील राजा अन् सकाळी डोक्यावर पेटी, अशी आमची स्थिती आहे, हे वास्तव मांडले ते गोविंदराव पाटणकर या तमाशा मालकाने.सध्या गावोगावी ग्रामदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. त्यानिमित्ताने साताऱ्यातील श्री खंडोबाळाच्या माळावर तमाशा कलावंतांच्या राहुट्या लागू लागल्या आहेत. येथेच गोविंदराव पाटणकर यांनी मनमोकळ्या गप्पा मारताना गेल्या ५० वर्षांपासूनचा इतिहास समोर मांडला. तसेच शासनाकडून होणारे दुर्लक्षही कथन केले.पाटणकर म्हणाले, वडील तमाशात कलाकार होते. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षापासून काम करण्यास सुरूवात झाली. ३० वर्षांपासून स्वत:चा तमाशाचा फड आहे तर आतापर्यंत ५० वर्षे या कलेसाठी गेली आहेत. पण, खरं सांगायचं झालं तर आम्ही कधीच मोठं झालो नाही. या तमाशाच्या फडावर काहीच भागत नाही.

चार महिन्यांचा हा खेळ असतो. त्यात ३० ते ४० सुपाऱ्या मिळतात. पण, त्यामागील खर्च पाहता हे सर्व झेपत नाही. दररोज ३० ते ३५ माणसांचा कबिला सांभाळायचा असतो. कलाकाराने घर सोडलं की सर्व आम्हालाच बघायला लागतं. त्यात एका सुपारीला ३० ते ३५ हजार रुपये मिळायचे. मग, सर्वांना पैसे देऊन जवळ काहीच राहत नाही. पण, हा व्यवसाय करण्याशिवाय समोर दुसरा पर्यायही नाही.

आम्हाला घर नाही की शेती नाही. हे चार महिने तमाशा झाला की जिवनाचाही तमाशा होतो. कारण, कुठेही मजुरी, रोजंदार, हमाली अशी कामे करतो. शासनही काही देण्यास तयार नाही. ६५ वर्षांवरील कलाकारांना मानधन मिळते. पण, हे मला तर अद्याप मिळालेले नाही. भारुडाच्या पोटी जन्माला आलेली ही कलाच कशीबशी जगविते. तर दुसरीकडे तमाशातून नाटक पुढे आले.

नाटकातून चित्रपट आले आणि ते सर्वजण अब्जाधीश झाले. पण, आम्हा तमाशा कलाकाराच्या जिवनाचा तमाशाच झाला. पोरं शिकतात, पण, नोकरी तरी त्यांना कुठे मिळते. मग काय तर तमाशातील फळ्या, पेट्या, कपडे उचलता-उचलता ते पण तमाशातीलच कलाकार होतात, अशी आमच्या जीवनाची तऱ्हा आहे.साताऱ्यात आठ दिवस झालेतरी आणखी एकही सुपारी मिळाली नाही. स्पर्धेच्या या जगाचा आम्हाला फटका बसत आहे. त्यामुळे विचार करुन-करुन आता आजारही होऊ लागले आहेत, पण, जगायचं याच ध्येयाने तमाशा जिवंत ठेवला आहे, अशी सलही पाटणकर यांनी यानिमित्ताने बोलून दाखविली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcultureसांस्कृतिक