शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

सातारा-कागल सहापदरीकरणाचा मार्ग सुकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 17:08 IST

कºहाड : गेली अनेक वर्षे रखडलेल्या सातारा-कागल या सहापदरीकरण रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी या कामासाठी मंगळवारी ३ हजार कोटींचा निधी जाहीर केल्याने महामार्गावरची वाहतूक अधिक सुकर होण्यास मदत होणार आहे. २००३ साली या महामार्गाचे चार पदरीकरण करतानाच नियोजित सहापदरी मार्गासाठीची जागा अधिग्रहण करून घेतल्याने सहापदरीकरणाच्या कामात अडचणींचे विघ्न येण्याची शक्यता दिसत नाही.

ठळक मुद्देजागा अधिग्रहण झाल्याने अडचणींचे विघ्न नाही महामार्गावरील वाहतूक होणार अधिक सुलभदोन ठिकाणी वाहनतळ केले जाणारकºहाड-मलकापूर-उंब्रजला सवलत...

कºहाड : गेली अनेक वर्षे रखडलेल्या सातारा-कागल या सहापदरीकरण रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी या कामासाठी मंगळवारी ३ हजार कोटींचा निधी जाहीर केल्याने महामार्गावरची वाहतूक अधिक सुकर होण्यास मदत होणार आहे. २००३ साली या महामार्गाचे चार पदरीकरण करतानाच नियोजित सहापदरी मार्गासाठीची जागा अधिग्रहण करून घेतल्याने सहापदरीकरणाच्या कामात अडचणींचे विघ्न येण्याची शक्यता दिसत नाही.

दळणवळण सुलभ होण्यासाठी भाजप सरकारने नेहमीच रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून २००३ मध्ये सातारा-कागल रस्त्याचे चौपदरीकरण झाले. साहजीकच वाहतुकीला याचा फायदा झाला. परंतू भविष्यात या महामार्गाची रूंदी वाढवावी लागेल हे गृहीत धरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नियोजित सहापदरी रस्त्यासाठी म्हणून अगोदरच सात मीटर जागेचे अधिग्रहण करून घेतले आहे. त्याबाबत महामार्गाच्या दुतर्फा रोवलेले दगड हद्द दाखविताना दिसतात. साहजिकच महामार्गाच्या दुतर्फा झालेली नवीन बांधकामे ही नियमानुसारच झालेली दिसतात. त्यामुळे सहापदरीकरण करण्याच्या कामात काही तांत्रिक अडचणी समोर येतील असे वाटत नाही.कºहाड-मलकापूर-उंब्रजला सवलत...

या महामार्गाच्या दुतर्फा वसलेल्या कºहाड, मलकापूर व उंब्रज या तिन्ही शहरांना २००३ साली चौपदरीकरण करताना चांगलीच झळ बसली आहे. त्याचवेळी ४५ ते ४८ मीटर अशी जागा अधिग्रहण करण्यात आली आहे. पुन्हा सहापदरीकरणासाठी येथे जादा जागा अधिग्रहण होण्याची शक्यता वाटत नाही. त्याऐवजी येथे गरजेनुसार उड्डाणपुलांना प्राधान्य दिले जाईल, असे आजवर याबाबत संघर्ष करणारे येथील नागरिक आवर्जून सांगतात.वाहनतळ कुठे कुठे...

महामार्गावर अवजड वाहने अथवा इतर वाहने रस्त्यावर थांबविली जाऊ नयेत, त्यासाठी सातारा ते कागल दरम्यान दोन ठिकाणी वाहनतळ केले जाणार असल्याचे खात्रीशीर सांगितले जाते. यापैकी एक वाहनतळ सातारा ते कºहाड या दरम्यान होईल. तर दुसरे वाहनतळ कºहाड ते कागल या दरम्यान केले जाईल. असे समजते. मात्र, त्याची जागा निश्चित कोणती करण्यात आली आहे हे कोणीच सांगत नाही.