शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

‘सातारा घनसाळ’ तांदळाचा ब्रँड विकसित

By admin | Updated: January 10, 2015 00:13 IST

शेतीतला प्रयोग : करंजे तर्फ परळी परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश

परळी : ग्राहकांची मागणी असूनही घनसाळ तांदूळ उपलब्ध होत नाही. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यातील करंजे तर्फ परळीसह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी कृषिक्रांती शेतकरी स्वयंसहाय्यता शेतकरी गटाच्या साह्याने भाताच्या घनसाळ जातीची लागवड केली. या शेतकारी गटाने विक्रीसाठी ‘सातारा घनसाळ’ हा तांदळाचा ब्रँड विकसित केला आहे.शहरापासून १७ किलोमीटरवर उरमोडी धरणाच्या कुशीत वसलेले करंजे तर्फ परळी हे निसर्गरम्य गाव. येथील शेतकरी खरिपात भाताच्या पारंपरिक जातींची लागवड करतात. त्यामुळे हाती येणारे भाताचे जेमतेम उत्पादन काळाची गरज ओळखून या गावातील शेतकऱ्यांनी परिस्थिती बदलण्याचे ठरविले. अन् येथील शेतात घनसाळचा सुवास दरवळू लागला. घनसाळ भाताचे दर्जेदार उत्पादन आणि चांगल्या दरामुळे भात शेतीतून शेतकऱ्यांचा आर्थिक नफा वाढला.कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील शेतकरी प्रामुख्याने भाताच्या घनसाळ या जातीची लागवड करतात. सुंदर सुवास आणि अप्रतिम चव यामुळे या तांदळाला चांगली मागणी असते. मात्र, बाजारात ग्राहकांची मागणी असूनही घनसाळ तांदूळ उपलब्ध होत नाही. ही मागणी लक्षात घेऊन करंजेसह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी ‘कृषिक्रांती’ गटाच्या मदतीने भाताच्या घनसाळ जातीची लागवड करून ‘सातारा घनसाळ’ हा नवा ब्रँड विकसित केला.या गावाच्या परिसरातील शेतकरी भाताच्या इंद्रायणी, बासमती, सह्याद्री, रत्नागिरी - २४ त्याचबरोबर काळी कुसळी या पारंपरिक जातीची लागवड करतात. मात्र, तांदळाची विक्री करताना अडचणी या शेतकऱ्यांपुढे होत्या. ‘आत्मा’चे संचालक गणेश घोरपडे यांना कृषिक्रांतीचे अध्यक्ष मोहन लाड यांनी भाताच्या जाती, उत्पादन व विक्री संदर्भातील अडचणी सांगितल्या. (वार्ताहर)साताऱ्यात ‘तांदूळ महोत्सव’ सुरू करणारसातारा जिल्हा ‘पॅटर्न जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्याच्या हक्काच्या तांदूळ उत्पादनाला चांगला दर मिळावा म्हणून कृती विभागाने ‘तांदूळ महोत्सव’ सुरू केला होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हा तांदूळ महोत्सव बंद झाला आहे. महोत्सव पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.