शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सातारा जिल्ह्यात कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 13:22 IST

चोवीस तासात तब्बल ४२२ मिलीमीटर पाऊस

आॅनलाईन लोकमत

 सातारा, दि. १९ :सातारा शहरासह जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. धरण क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू असून पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी दिवसभर व बुधवारी सकाळी ृआठ वाजेपर्यंत चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल ४२२.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तसेच जावळी खोऱ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तलावाच्या सांडव्यावरून वाहन जाणारे पाणी महाबळेश्वर-वाई मार्गावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

जिल्ह्यातील प्रमुख कोयना, उरमोडी, धोम व कण्हेर धरण क्षेत्रातही पावसाची रिपरिप सुरू आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ५५.८३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजुनही ४९.४२ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. उरमोडी धरणात ६, धोम ५.६२ तर कण्हेर धरणात ४.७८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी (मिलीमीटरमध्ये) :

सातारा ३१.५, जावळी ५९.८, पाटण ६९, कऱ्हाड ३९.८, कोरेगाव १०.४, खटाव ७.८, माण ०.३, फलटण ०.६, खंडाळा ७.१, वाई २५.१, महाबळेश्वर १७१ मिलीमीटर. जिल्ह्यात एक जून पासून आजपर्यंत ४ हजार ८९८.४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.