शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 13:22 IST

चोवीस तासात तब्बल ४२२ मिलीमीटर पाऊस

आॅनलाईन लोकमत

 सातारा, दि. १९ :सातारा शहरासह जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. धरण क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू असून पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी दिवसभर व बुधवारी सकाळी ृआठ वाजेपर्यंत चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल ४२२.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तसेच जावळी खोऱ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तलावाच्या सांडव्यावरून वाहन जाणारे पाणी महाबळेश्वर-वाई मार्गावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

जिल्ह्यातील प्रमुख कोयना, उरमोडी, धोम व कण्हेर धरण क्षेत्रातही पावसाची रिपरिप सुरू आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ५५.८३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजुनही ४९.४२ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. उरमोडी धरणात ६, धोम ५.६२ तर कण्हेर धरणात ४.७८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी (मिलीमीटरमध्ये) :

सातारा ३१.५, जावळी ५९.८, पाटण ६९, कऱ्हाड ३९.८, कोरेगाव १०.४, खटाव ७.८, माण ०.३, फलटण ०.६, खंडाळा ७.१, वाई २५.१, महाबळेश्वर १७१ मिलीमीटर. जिल्ह्यात एक जून पासून आजपर्यंत ४ हजार ८९८.४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.