शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

सातारा जिल्ह्यात १५४.३१ कोटींचे शेती कर्ज थकीत

By admin | Updated: June 12, 2017 16:43 IST

कर्जमाफीच्या निकषांकडे लक्ष : ५९ हजार १९९ थकबाकीदारांना मिळू शकतो दिलासा

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. १२ : जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर ३३ बँकांच्या माध्यमातून जिल्ह्यात मार्च २0१७ या आर्थिक वर्षाच्या अखेर पर्यंत २ हजार ६८४ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कजार्चे वाटप झाले आहे. यापैकी १५४ कोटी ३१ लाखांचे कर्ज थकि आहे. शासनाने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे थकबाकीत गेलेल्या कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. तसेच सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला गेल्यास ३ लाख २६ हजार ५९३ शेतकरी कर्जमुक्त होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जमाफीचा विषय गाजत आहे. राष्ट्रवादी-काँगे्रससह इतर विरोधी पक्षांनी राज्यभर काढलेली संघर्ष यात्रा, सत्तेत सहभागी असतानाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुणे ते मुंबई अशी काढलेली आत्मक्लेश पदयात्रा, शिवसेनेनेही सरकार पाडण्याचा दिलेला इशारा तसेच शेतकरी आत्महत्येचे सुरु असेलेले सत्र या बाबींमुळे सरकारला कर्जमाफीचा निर्णय घेणे भाग पडले आहे. दरम्यान, कर्जमाफीची मागणी चहूबाजूंनी वाढू लागल्याने शेती कर्जे थकित गेल्याचा सार्वत्रिक अनुभव जिल्हा मध्यवर्ती बँकांसह पीक कर्ज देणाऱ्या इतर बँकांना अनुभवायला मिळाला.

जिल्ह्यामध्ये ३ लाख २६ हजार ५९३ शेतकऱ्यांनी २ हजार ६८४ कोटी १३ लाख इतक्या मोठ्या रकमेची पीक कर्जे घेतली होती. त्यापैकी ५९ हजार १९९ शेतकऱ्यांनी १५४ कोटी ३१ लाखांची थकबाकी ठेवली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून प्रामुख्याने जिल्ह्यात पीक कजार्चे वाटप केले जाते. विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून बँक कर्जवाटप करते, तसेच याच यंत्रणेच्या माध्यमातून ती वसुलही केली जातात. साखर कारखान्यांकडून मिळणारे ऊसाचे पेमेंट जिल्हा बँकांमध्ये जमा होत असते. त्यामुळे साहजिकच कजार्ची वसूली करुन उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत असते. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला वसुलीची चिंता सतावत नाही. मात्र, इतर पिकांसाठी दिलेल्या कजार्ची वसुली करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. विरोधी पक्षांसह सत्तेत असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच शिवसेना या दोन्ही पक्षांनी सरकारला हादरे दिल्याने कर्जमाफीच्या निर्णयापर्यंत सरकारला पोहोचावेच लागले. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता कर्ज भरण्याऐवजी अनेकांनी ती माफ कधी होतील, याकडे डोळे लावले.

जिल्हा बँकेचे दोन महिन्यांत १५ कोटींची वसुली

कर्जमाफीची चर्चा सुरु झाल्यानंतर काही शेतकरी कर्ज माफीकडे डोळे लावून बसले. एप्रिल व मे या दोन महिन्यांत कजार्ची वसुली ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या दोन महिन्यांत केवळ १५ कोटी रुपयांचे कर्ज वसूल झाले आहे. ५९ हजार १९९ शेतकरी सभासद थकबाकीत गेले.

३७१.३४ कोटींच्या वाटपाचे काय होणार?

बँकांनी १ एप्रिल २0१७ ते ३१ मे २0१७ या कालावधीत १ लाख ५ हजार ३0९ शेतकऱ्यांना ३७१.३४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. सरकारच्या निर्णयामध्ये या कजार्चा समावेश असणर का? याबाबत चर्चा सुरु आहे.