शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

सातारा जिल्ह्यात १५४.३१ कोटींचे शेती कर्ज थकीत

By admin | Updated: June 12, 2017 16:43 IST

कर्जमाफीच्या निकषांकडे लक्ष : ५९ हजार १९९ थकबाकीदारांना मिळू शकतो दिलासा

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. १२ : जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर ३३ बँकांच्या माध्यमातून जिल्ह्यात मार्च २0१७ या आर्थिक वर्षाच्या अखेर पर्यंत २ हजार ६८४ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कजार्चे वाटप झाले आहे. यापैकी १५४ कोटी ३१ लाखांचे कर्ज थकि आहे. शासनाने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे थकबाकीत गेलेल्या कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. तसेच सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला गेल्यास ३ लाख २६ हजार ५९३ शेतकरी कर्जमुक्त होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जमाफीचा विषय गाजत आहे. राष्ट्रवादी-काँगे्रससह इतर विरोधी पक्षांनी राज्यभर काढलेली संघर्ष यात्रा, सत्तेत सहभागी असतानाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुणे ते मुंबई अशी काढलेली आत्मक्लेश पदयात्रा, शिवसेनेनेही सरकार पाडण्याचा दिलेला इशारा तसेच शेतकरी आत्महत्येचे सुरु असेलेले सत्र या बाबींमुळे सरकारला कर्जमाफीचा निर्णय घेणे भाग पडले आहे. दरम्यान, कर्जमाफीची मागणी चहूबाजूंनी वाढू लागल्याने शेती कर्जे थकित गेल्याचा सार्वत्रिक अनुभव जिल्हा मध्यवर्ती बँकांसह पीक कर्ज देणाऱ्या इतर बँकांना अनुभवायला मिळाला.

जिल्ह्यामध्ये ३ लाख २६ हजार ५९३ शेतकऱ्यांनी २ हजार ६८४ कोटी १३ लाख इतक्या मोठ्या रकमेची पीक कर्जे घेतली होती. त्यापैकी ५९ हजार १९९ शेतकऱ्यांनी १५४ कोटी ३१ लाखांची थकबाकी ठेवली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून प्रामुख्याने जिल्ह्यात पीक कजार्चे वाटप केले जाते. विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून बँक कर्जवाटप करते, तसेच याच यंत्रणेच्या माध्यमातून ती वसुलही केली जातात. साखर कारखान्यांकडून मिळणारे ऊसाचे पेमेंट जिल्हा बँकांमध्ये जमा होत असते. त्यामुळे साहजिकच कजार्ची वसूली करुन उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत असते. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला वसुलीची चिंता सतावत नाही. मात्र, इतर पिकांसाठी दिलेल्या कजार्ची वसुली करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. विरोधी पक्षांसह सत्तेत असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच शिवसेना या दोन्ही पक्षांनी सरकारला हादरे दिल्याने कर्जमाफीच्या निर्णयापर्यंत सरकारला पोहोचावेच लागले. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता कर्ज भरण्याऐवजी अनेकांनी ती माफ कधी होतील, याकडे डोळे लावले.

जिल्हा बँकेचे दोन महिन्यांत १५ कोटींची वसुली

कर्जमाफीची चर्चा सुरु झाल्यानंतर काही शेतकरी कर्ज माफीकडे डोळे लावून बसले. एप्रिल व मे या दोन महिन्यांत कजार्ची वसुली ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या दोन महिन्यांत केवळ १५ कोटी रुपयांचे कर्ज वसूल झाले आहे. ५९ हजार १९९ शेतकरी सभासद थकबाकीत गेले.

३७१.३४ कोटींच्या वाटपाचे काय होणार?

बँकांनी १ एप्रिल २0१७ ते ३१ मे २0१७ या कालावधीत १ लाख ५ हजार ३0९ शेतकऱ्यांना ३७१.३४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. सरकारच्या निर्णयामध्ये या कजार्चा समावेश असणर का? याबाबत चर्चा सुरु आहे.