शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सातारा शहराचा पारा ३० अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:24 IST

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा उघडीप दिली आहे. त्यामुळे दिवसभर कडक ऊन पडल्याने ...

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा उघडीप दिली आहे. त्यामुळे दिवसभर कडक ऊन पडल्याने तापमानातही वाढ झाली. हवामान विभागाने रविवारी सातारा शहराचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. वातावरणात सतत बदल होत असून, सायंकाळनंतर हवेत गारव्याचे प्रमाण वाढत आहे. महाबळेश्वर तालुक्यात मात्र पाऊस व थंडीची तीव्रता कायम आहे. येथील कमाल तापमान २२.६ अंश तर किमान तापमान १७.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

धोकादायक फांद्यांचा अडथळा हटवला

सातारा : वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या धोकादायक फांद्या हटविण्याची मोहीम सातारा पालिका व महावितरण कंपनीने हाती घेतली आहे. सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. शहरासह उपनगरात पाऊस व वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडून विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. तसेच काही फांद्यांमुळे वीज वाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे. अशा धोकादायक फांद्या पालिका व वीज कंपनीकडून हटवल्या जात आहेत.

केळघर घाटात तारेवरची कसरत

मेढा : मेढा - महाबळेश्वर मार्गावर असलेल्या केळघर घाटातून प्रवास करणे सध्या धोक्याचे ठरू लागले आहे. घाटात रुंदीकरणाचे काम सुरू असून, मातीमुळे ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. आधीच धोकादायक वळणे, त्याच सर्वत्र चिखल पसरल्याने वाहनचालकांना घाटातून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. घाटात दरड कोसळण्याच्या शक्यतेने आता वाहनचालकांनी रात्रीचा प्रवासही बंद केला आहे. प्रशासनाने रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे तसेच घाटात धोकादायक ठिकाणी दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

भटक्या श्वानांची नागरिकांमध्ये भीती

सातारा : शहरात भटक्या श्वानांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे श्वान पादचाऱ्यांसह नागरिकांच्या अंगावर धावून येत असल्याने नागरिकांसह महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेने भटक्या श्वानांना पकडून सोनगावजवळील कोंडवाड्यात सोडण्याचा ठराव सभेत मंजूर केला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या ठरावावर अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे भटक्या श्वानांचा विषय गंभीर होऊ लागला आहे.