शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा शहराचा पारा ३० अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:24 IST

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा उघडीप दिली आहे. त्यामुळे दिवसभर कडक ऊन पडल्याने ...

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा उघडीप दिली आहे. त्यामुळे दिवसभर कडक ऊन पडल्याने तापमानातही वाढ झाली. हवामान विभागाने रविवारी सातारा शहराचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. वातावरणात सतत बदल होत असून, सायंकाळनंतर हवेत गारव्याचे प्रमाण वाढत आहे. महाबळेश्वर तालुक्यात मात्र पाऊस व थंडीची तीव्रता कायम आहे. येथील कमाल तापमान २२.६ अंश तर किमान तापमान १७.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

धोकादायक फांद्यांचा अडथळा हटवला

सातारा : वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या धोकादायक फांद्या हटविण्याची मोहीम सातारा पालिका व महावितरण कंपनीने हाती घेतली आहे. सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. शहरासह उपनगरात पाऊस व वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडून विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. तसेच काही फांद्यांमुळे वीज वाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे. अशा धोकादायक फांद्या पालिका व वीज कंपनीकडून हटवल्या जात आहेत.

केळघर घाटात तारेवरची कसरत

मेढा : मेढा - महाबळेश्वर मार्गावर असलेल्या केळघर घाटातून प्रवास करणे सध्या धोक्याचे ठरू लागले आहे. घाटात रुंदीकरणाचे काम सुरू असून, मातीमुळे ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. आधीच धोकादायक वळणे, त्याच सर्वत्र चिखल पसरल्याने वाहनचालकांना घाटातून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. घाटात दरड कोसळण्याच्या शक्यतेने आता वाहनचालकांनी रात्रीचा प्रवासही बंद केला आहे. प्रशासनाने रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे तसेच घाटात धोकादायक ठिकाणी दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

भटक्या श्वानांची नागरिकांमध्ये भीती

सातारा : शहरात भटक्या श्वानांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे श्वान पादचाऱ्यांसह नागरिकांच्या अंगावर धावून येत असल्याने नागरिकांसह महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेने भटक्या श्वानांना पकडून सोनगावजवळील कोंडवाड्यात सोडण्याचा ठराव सभेत मंजूर केला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या ठरावावर अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे भटक्या श्वानांचा विषय गंभीर होऊ लागला आहे.