शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सातारा शहराचा पारा १२ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST

पारा १२ अंशांवर सातारा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यासह सातारा शहराच्या तापमानात घसरण झाली आहे. तापमान अचानक खालावल्याने पहाटे ...

पारा १२ अंशांवर

सातारा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यासह सातारा शहराच्या तापमानात घसरण झाली आहे. तापमान अचानक खालावल्याने पहाटे व रात्रीच्या वेळी थंडीची तीव्रताही जाणवू लागली आहे. हवामान विभागाने बुधवारी साताऱ्याचे कमाल तापमान ३०.९, तर किमान तापमान १२.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरातही थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. बुधवारी येथील पारा १४ अंशांवर स्थिरावला. फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासून उन्हाच्या झळा बसत असताना अचानक थंडीत वाढ झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे.

वाहतूक कोंडीमुळे

वाहनधारक त्रस्त

सातारा : शहरातील मोती चौक, खणआळी, पाचशे एक पाटी व तहसील कार्यालय परिसरात वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे. खणआळी व पाचशे एक पाटी ही साताऱ्याची प्रमुख बाजारपेठ आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी या ठिकाणी बाजारहटासाठी नेहमीच रेलचेल सुरू असते. त्यामुळे हा परिसर गर्दीने कायम गजबजलेला असतो. खरेदीसाठी येणारे अनेक वाहनधारक आपल्या गाड्या रस्त्याकडेला लावत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे. तहसील कार्यालयातही पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने मुख्य प्रवेशद्वाराजवळही गाड्या लावल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.

भाजीपाला रस्त्यावर;

दुुर्गंधीचे साम्राज्य

सातारा : येथील बसस्थानकासमोर तसेच राधिका रस्त्यावर दररोज सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. अनेक शेतकरी रस्त्यावरच दुकाने थाटत असल्याने याचा वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. भाजी विक्री झाल्यानंतर काही शेतकरी उरलेला माल रस्त्याकडेला टाकून निघून जातात. हा कचरा कुजत असल्याने याच्या दुर्गंधीचा नागरिकांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अथवा या ठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.