शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सातारा शहराचा पारा १२ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST

पारा १२ अंशांवर सातारा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यासह सातारा शहराच्या तापमानात घसरण झाली आहे. तापमान अचानक खालावल्याने पहाटे ...

पारा १२ अंशांवर

सातारा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यासह सातारा शहराच्या तापमानात घसरण झाली आहे. तापमान अचानक खालावल्याने पहाटे व रात्रीच्या वेळी थंडीची तीव्रताही जाणवू लागली आहे. हवामान विभागाने बुधवारी साताऱ्याचे कमाल तापमान ३०.९, तर किमान तापमान १२.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरातही थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. बुधवारी येथील पारा १४ अंशांवर स्थिरावला. फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासून उन्हाच्या झळा बसत असताना अचानक थंडीत वाढ झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे.

वाहतूक कोंडीमुळे

वाहनधारक त्रस्त

सातारा : शहरातील मोती चौक, खणआळी, पाचशे एक पाटी व तहसील कार्यालय परिसरात वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे. खणआळी व पाचशे एक पाटी ही साताऱ्याची प्रमुख बाजारपेठ आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी या ठिकाणी बाजारहटासाठी नेहमीच रेलचेल सुरू असते. त्यामुळे हा परिसर गर्दीने कायम गजबजलेला असतो. खरेदीसाठी येणारे अनेक वाहनधारक आपल्या गाड्या रस्त्याकडेला लावत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे. तहसील कार्यालयातही पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने मुख्य प्रवेशद्वाराजवळही गाड्या लावल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.

भाजीपाला रस्त्यावर;

दुुर्गंधीचे साम्राज्य

सातारा : येथील बसस्थानकासमोर तसेच राधिका रस्त्यावर दररोज सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. अनेक शेतकरी रस्त्यावरच दुकाने थाटत असल्याने याचा वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. भाजी विक्री झाल्यानंतर काही शेतकरी उरलेला माल रस्त्याकडेला टाकून निघून जातात. हा कचरा कुजत असल्याने याच्या दुर्गंधीचा नागरिकांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अथवा या ठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.