शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

सातारचा बिल्डर निघाला पुण्याला!

By admin | Updated: October 31, 2014 23:17 IST

चारही बाजूने पिळवणूक : सरकारी कार्यालयात अडवणूक अन् खंडणीबहाद्दरांकडून छळवणूक

सातारा : प्रचंड फायदेशीर वाटणारा बांधकाम व्यवसाय आज विविध कारणांनी अडचणीत आला असून, अनेक बिल्डर पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत. जमीन खरेदीपासूनच या व्यवसायात विघ्नांना सुरुवात होत असून, ‘मिल बाँट के खाओ’ कार्यशैलीमुळे या कार्यालयातून त्या कार्यालयात फिरत असलेल्या फायलींना नोटांचे पंख लावावे लागत आहेत. याखेरीज खरेदीदारांची संख्या रोडावणे, रखडलेली हद्दवाढ, रेडी रेकनरपेक्षा कमी मिळणारा दर, त्याहून अधिक दराने भरावा लागणारा कर यांसह अनेक समस्यांनी बांधकाम व्यावसायिकांना पोखरले आहे.सातारा शहरातील बांधकाम व्यावसायिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांचा ‘लोकमत’ने वेध घेतला असता, जमीन खरेदीव्यवहारातच पहिली माशी शिंकते, असे लक्षात आले आहे. एक तर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव विविध हितसंबंधीयांनी रोखून धरल्यामुळे बरीच बांधकामे सध्या शहराच्या हद्दीबाहेरच सुरू आहेत. या भागातील जमीन खरेदी करणे, बिगरशेती परवाना मिळविणे आणि अंतिमत: बांधकाम परवाना मिळविणे, या प्रक्रियेतच बिल्डरांची दमछाक होत आहे. शहरात सुमारे चाळीस ते पन्नास नावाजलेले बिल्डर व्यवसाय करतात. जुने वाडे पाडून अपार्टमेन्ट बांधण्याचाच व्यवसाय बरेच दिवस सुरू राहिल्यामुळे आणि तो फायदेशीर वाटल्याने आर्किटेक्ट, डॉक्टर, वकील अशा इतर व्यवसायातील अनेक व्यक्ती बिल्डर बनल्या. शहराच्या औद्योगिक विकासाला असलेल्या मर्यादांमुळे भांडवल अडकून पडू लागले आणि सुरुवातीला फायदेशीर वाटलेल्या या व्यवसायात आर्थिक फुगा निर्माण होऊन हळूहळू तो अनेक समस्यांच्या भोवऱ्यात सापडला. शहराबाहेरची जमीन घ्यायची झाल्यास ती बिगरशेती करून घ्यावी लागते. त्यासाठी अनेक कार्यालयांचा ना-हरकत दाखला घेण्याची सक्ती आहे. इथेच ‘मिल बाँट के खाओ’ या कार्यशैलीचा पहिला अनुभव बिल्डरला येतो. परिसरातून उच्चदाब वाहिनी जात नाही ना, असा वीजवितरण कंपनीचा दाखला लागतो. शिवाय नगररचना खाते, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा अनेक कार्यालयांमधून फाईल फिरत राहते. सरतेशेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात फाईल येते. गंमत म्हणजे, जिल्हाधिकारी हे सर्वाधिकारी असतानासुद्धा त्यांच्या परवानगीनंतर पुन्हा संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी घेण्याची अट, कोणताही तार्किक आधार नसताना घालण्यात आली आहे. त्यानंतर बांधकाम परवान्यासाठी हेलपाटे सुरू होतात. अनेक ठिकाणी भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हात ओले केल्यानंतर बांधकाम परवाना मिळतो. म्हणजेच, या व्यवसायातील ‘कच्चा माल’ मानल्या गेलेल्या जमिनीतच भरपूर ‘गुंतवणूक’ केल्यानंतर प्रत्यक्ष इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होते. (प्रतिनिधी)