शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

सातारचा बिल्डर निघाला पुण्याला!

By admin | Updated: October 31, 2014 23:17 IST

चारही बाजूने पिळवणूक : सरकारी कार्यालयात अडवणूक अन् खंडणीबहाद्दरांकडून छळवणूक

सातारा : प्रचंड फायदेशीर वाटणारा बांधकाम व्यवसाय आज विविध कारणांनी अडचणीत आला असून, अनेक बिल्डर पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत. जमीन खरेदीपासूनच या व्यवसायात विघ्नांना सुरुवात होत असून, ‘मिल बाँट के खाओ’ कार्यशैलीमुळे या कार्यालयातून त्या कार्यालयात फिरत असलेल्या फायलींना नोटांचे पंख लावावे लागत आहेत. याखेरीज खरेदीदारांची संख्या रोडावणे, रखडलेली हद्दवाढ, रेडी रेकनरपेक्षा कमी मिळणारा दर, त्याहून अधिक दराने भरावा लागणारा कर यांसह अनेक समस्यांनी बांधकाम व्यावसायिकांना पोखरले आहे.सातारा शहरातील बांधकाम व्यावसायिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांचा ‘लोकमत’ने वेध घेतला असता, जमीन खरेदीव्यवहारातच पहिली माशी शिंकते, असे लक्षात आले आहे. एक तर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव विविध हितसंबंधीयांनी रोखून धरल्यामुळे बरीच बांधकामे सध्या शहराच्या हद्दीबाहेरच सुरू आहेत. या भागातील जमीन खरेदी करणे, बिगरशेती परवाना मिळविणे आणि अंतिमत: बांधकाम परवाना मिळविणे, या प्रक्रियेतच बिल्डरांची दमछाक होत आहे. शहरात सुमारे चाळीस ते पन्नास नावाजलेले बिल्डर व्यवसाय करतात. जुने वाडे पाडून अपार्टमेन्ट बांधण्याचाच व्यवसाय बरेच दिवस सुरू राहिल्यामुळे आणि तो फायदेशीर वाटल्याने आर्किटेक्ट, डॉक्टर, वकील अशा इतर व्यवसायातील अनेक व्यक्ती बिल्डर बनल्या. शहराच्या औद्योगिक विकासाला असलेल्या मर्यादांमुळे भांडवल अडकून पडू लागले आणि सुरुवातीला फायदेशीर वाटलेल्या या व्यवसायात आर्थिक फुगा निर्माण होऊन हळूहळू तो अनेक समस्यांच्या भोवऱ्यात सापडला. शहराबाहेरची जमीन घ्यायची झाल्यास ती बिगरशेती करून घ्यावी लागते. त्यासाठी अनेक कार्यालयांचा ना-हरकत दाखला घेण्याची सक्ती आहे. इथेच ‘मिल बाँट के खाओ’ या कार्यशैलीचा पहिला अनुभव बिल्डरला येतो. परिसरातून उच्चदाब वाहिनी जात नाही ना, असा वीजवितरण कंपनीचा दाखला लागतो. शिवाय नगररचना खाते, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा अनेक कार्यालयांमधून फाईल फिरत राहते. सरतेशेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात फाईल येते. गंमत म्हणजे, जिल्हाधिकारी हे सर्वाधिकारी असतानासुद्धा त्यांच्या परवानगीनंतर पुन्हा संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी घेण्याची अट, कोणताही तार्किक आधार नसताना घालण्यात आली आहे. त्यानंतर बांधकाम परवान्यासाठी हेलपाटे सुरू होतात. अनेक ठिकाणी भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हात ओले केल्यानंतर बांधकाम परवाना मिळतो. म्हणजेच, या व्यवसायातील ‘कच्चा माल’ मानल्या गेलेल्या जमिनीतच भरपूर ‘गुंतवणूक’ केल्यानंतर प्रत्यक्ष इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होते. (प्रतिनिधी)