शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

साताऱ्याचा ज्येष्ठ नागरिक संघ बनला २६ वर्षांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:45 IST

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ज्येष्ठांच्या समस्या सोडविणे, आनंदी जीवन जगणे व हितगुज करण्यासाठी सातारा जिल्ह्यात प्रथम स्थापन झालेला सातारा ज्येष्ठ नागरिक संघ आता २६ वर्षांचा झाला आहे. पुण्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभांमधून मिळालेल्या प्रेरणेतून हा संघ स्थापन झाला. आतापर्यंत या संघाने विविध कार्यक्रम घेऊन ज्येष्ठांच्या जीवनात आनंदाचे क्षण ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ज्येष्ठांच्या समस्या सोडविणे, आनंदी जीवन जगणे व हितगुज करण्यासाठी सातारा जिल्ह्यात प्रथम स्थापन झालेला सातारा ज्येष्ठ नागरिक संघ आता २६ वर्षांचा झाला आहे. पुण्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभांमधून मिळालेल्या प्रेरणेतून हा संघ स्थापन झाला. आतापर्यंत या संघाने विविध कार्यक्रम घेऊन ज्येष्ठांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.वयाची साठी ओलांडली म्हणजे ज्येष्ठ झाले, असे म्हटले जाते. नोकरीतील निवृत्तीचे वयही ५८, ६० असते. वर्षानुवर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्तीनंतरचे दिवस काढणे अवघड होऊन जाते. त्यामुळे कोणी व्यवसायात गुंतवून घेतो तर कोणी शेतीकडे लक्ष देतो.अनेकजण उर्वरित आयुष्य आनंदाने जगायचे म्हणून पर्यटन, सहलीवर जातात; पण या सर्व ज्येष्ठांना एकत्र आणण्याची किमया होते फक्त ज्येष्ठ नागरिक संघातच. या संघाच्या माध्यामातून महिन्याला बैठकीचे आयोजन करण्यात येते. एकमेकांशी हितगुज करून जुन्या आठवणींनाही उजाळा दिला जातो. अशाच या प्रेरणेमधून सातारचा ज्येष्ठ नागरिक संघ २ आॅक्टोबर १९९२ रोजी स्थापन झाला. हा संघ स्थापन करण्यामागे राजमाता सुमित्राराजे भोसले यांची प्रेरणाही होती.सातारा ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन होण्यामागे खूप रंजक गोष्ट आहेत. साताºयातील डॉ. बाळासाहेब माजगावकर व माधवराव धुमाळ गुरुजी १९९० पासून ज्येष्ठ नागरिक संघाचे काही कार्यकर्ते माहितीचे असल्याने पुण्याला जात होते. तेथील ज्येष्ठांच्या सभांना त्यांची हजेरी असायची. या सभांमधून ऐकलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे दोघेही आकृष्ट झाले. त्यानंतर दोघांनी साताºयात ही चळवळ सुरू करण्याचे ठरविले. १९९२ च्या सप्टेंबर महिन्यात माधवराव धुमाळ यांनी साताºयात ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्याची कल्पनाच नव्हे तर प्रस्तावच डॉ. माजगावकर यांच्यासमोर ठेवला. त्यानंतर २ आॅक्टोबर १९९२ हा गांधी जयंतीचा दिवस ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्थापनेसाठी निश्चित करण्यात आला व समर्थ सदनमध्ये पहिली सभा घेण्यात आली.या पहिल्या सभेला धुमाळ गुरुजी, डॉ. माजगावकर, मदनलाल परदेशी, केशवराव साठे, डॉ. मंगला माजगावकर, शैलजा पाठक, शामराव पानसे, सुमती आगाशे आदी उपस्थित होते. या संघाने आतापर्यंत विविध कार्यक्रम घेतले आहेत. त्यापैकी एक म्हणजे १९९५ मध्ये वैवाहिक जीवनाला ५० वर्षे पूर्ण झालेल्या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून राजमाता सुमित्राराजे भोसले उपस्थित होत्या. आबासाहेब पार्लेकर, मुकुंदराव किर्लोस्कर, शांताबाई किर्लोस्कर, आमदार अभयसिंहराजे भोसले आदी दिग्गज मंडळींची उपस्थिती होती.सध्या या संघाचे अध्यक्ष म्हणून रामभाऊ जाधव काम पाहत आहेत. उपाध्यक्ष सुधीर धुमाळ, विद्या आगाशे असून, कार्याध्यक्ष वाय. के. कुलकर्णी, सचिव वैदेही देव, सहसचिव मधुकर बाजी, सूर्यकांत जाधव, खजिनदार सुरेश कुलकर्णी आहेत. संघाचे आजही काम आदर्शवत असेच आहे.घरोघरी पायी जाऊन सभासद नोंदणी...साताºयात ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाला तेव्हा १५ रुपये वार्षिक वर्गणी होती; त्यासाठी घरोघर जाऊन सभासदांची नोंदणी करण्यात आली. मदनलाल परदेशी, शैलजा पाठक, डॉ. मंगला माजगावकर, अप्पासाहेब तारळेकर, रुस्तुम शेख, भाऊसाहेब भुरके, भाई देवी, नारायणराव कर्णिक, विनायकराव दाते, गोपाळराव केळकर, प्र. धु. इनामदार, डॉ. खुटाळे, गो. रा. डिंगरे, मालतीबाई कुलकर्णी, अण्णा नाईक आदी मंडळी कार्यकारी मंडळामध्ये होती.संघासाठी अनेकांचे योगदान लाभले...राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या प्रेरणेने आणि संस्थापक कार्याध्यक्ष दिवंगत माधवराव धुमाळ तसेच डॉ. बाळासाहेब माजगावकर,अप्पासाहेब तारळेकर, ज्येष्ठ पत्रकार पा. वि. खांडेकर, रुस्तम शेख, राजाभाऊ शहाणे, भाऊसाहेब भुरके, चंद्रकांत गिते, भाई देवी, वि. सा. भोईटे गुरुजी, शैलजा पाठक, मदनलाल परदेशी, माधवी लिमये आदींच्याप्रयत्नातून या संघाची स्थापना झाली आहे. यामधील अनेकांचे निधनझाले आहे.