शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

अंगापूर वंदन, चिंचणेर वंदनसह फडतरवाडीत सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:39 IST

अंगापूर : सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत व संवेदनशील असणाऱ्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या अंगापूर वंदन, चिंचणेर वंदन व ...

अंगापूर : सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत व संवेदनशील असणाऱ्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या अंगापूर वंदन, चिंचणेर वंदन व फडतरवाडीत सत्तांतर झाले आहे. निगडी तर्फ सातारा, तासगांव,वर्णे ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांना सत्ता कायम राखण्यात यश आले आहे.

सातारा तालुक्यातील परंतु कोरेगांव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या तासगाव मंडलातील राजकीयदृष्ट्या मोठ्या ग्रामपंचायतीवर कोणत्या गटाचे वर्चस्व राहणार या चर्चांना उधाण आले होते. या परिसरातील अंगापूर वंदन, वर्णे, तासगाव, चिंचणेर वंदन, निगडी तर्फ सातारा, फडतरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक चर्चेत राहिली होती. या भागावर खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांच्या विचाराचे प्राबल्य राहिले आहे. मात्र, सव्वा वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या घडामोडीच्या बदलांचा परिणाम या भागावर झाल्याचे दिसून आला. या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. महेश शिंदे यांच्या गटाचा उदय झाला. त्यामुळे परिसरातील या ग्रामपंचायतीवर कोणाचे वर्चस्व राहणार अशा जोरदार चर्चा तालुक्यात व कोरेगाव विधानसभा मतदार संघात रंगल्या होत्या. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या वर्चस्वासाठी आमदार महेश शिंदे व आमदार शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. प्रचाराच्या रणधुमाळीने व अनेक आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळले होते. अटीतटीच्या निवडणुकीत अंगापूर वंदन ग्रामपंचायतीवर आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणाऱ्या गटाचे माजी सभापती नारायण कणसे, हणमंतराव कणसे, संतोष कणसे, जयसिंग कणसे यांच्या नेतृत्वखाली लढलेल्या एवार्जीनाथ ग्रामविकास पॅनेलने सर्वच्या सर्व ११ जागा जिंकल्या.

वर्णेमध्ये भैरवनाथ अजिंक्य संयुक्त पॅनेलने ११ जागा जिंकून सत्ता कायम राखली आहे. निगडी तर्फ सातारा ग्रामपंचायत निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने ६ जागा जिंकत सत्ता कायम ठेवली आहे. तर विरोधी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने ३ जागा जिंकल्या आहेत. फडतरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत अजिंक्य पॅनेलने सत्ता परिवर्तन करीत सर्वच्या सर्व सात जागा जिंकून विरोधी नवसरीमाता पॅनेलला धक्का दिला आहे. या सर्व ग्रामपंचायतीवर आमदार शशिकांत शिंदे व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणाऱ्या गटाचे वर्चस्व असल्याचे समजले जाते. चिंचणेर वंदन ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून तेथे रयत विकास पॅनेलने ८ जागा जिंकत सत्तांतर केले. तर विरोधी जानाईदेवी पॅनेलला एक जागा मिळाली आहे. तासगाव ग्रामपंचायतीने आपली सत्ता कायम ठेवली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक माजी उपसभापती विजय काळे व अन्य प्रमुखाच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भैरवनाथ अजिंक्य पॅनेलने आठ जागा जिंकून सत्ता कायम ठेवली आहे. तेथे विरोधी सिध्देश्वर ग्रामविकास पॅनेलला २ जागा तर एक जागा बिनविरोध झाली होती. या दोन ग्रामपंचायतीवर खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार महेश शिंदे यांना माणणाऱ्या गटाचे वर्चस्व राहिले आहे.

चौकट

गेल्या पाच वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीत होते. तेव्हा याच विचाराच्या परंतु, गावांअतर्गत दोन गटांत ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. यातून एक गट सत्तेत तर दुसरा विरोधी अशी परस्थिती होती. मात्र, सव्वा वर्षापूर्वी राजकीय समीकरणे बदलली व त्याचा फायदा आमदार महेश शिंदे यांना झाला. मात्र, आताच्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून भविष्यातील निवडणुकीत कोणाला फायदा होईल अशी चर्चा होत आहेत.