शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

पावसाच्या माहेरात पिकांना सासुरवास!

By admin | Updated: September 4, 2015 20:25 IST

वाई तालुका : पिके वाळू लागली; धोम-बलकवडीची पाणी पातळी खालावली, शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

अनिकेत गाढवे -पसरणी  --पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर आणि त्याच्या पायथ्याला असणाऱ्या धोम धरण परिसरात दरवर्षी जोरदार पावसाची हजेरी असते; मात्र यंदा पावसाने या भागातच दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. गतवर्षी या महिन्यात धोम-बलकवडी धरण शंभर टक्के भरले होते. यंदा पावसानेच अवकृपा केल्याने दोन्ही धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे.वाई तालुक्यातील पसरणी, चिखली, बोरगाव, आकोशी, वाशिवली, आसरे अशा व आजूबाजूंच्या गावातील शेतकऱ्यांची सोयाबीन, भात, बटाटा, घेवडा, भुईमूग अशी पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. पावसाच्या आगमनाच्या महिन्यात आठ दिवस पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यावरच पेरणी झाली. सर्व खरिपाची पिके चांगली आली. मात्र, पिकांना ज्यावेळी खरंच पाण्याची गरज होती त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना कृषिपंप सुरू करून आपल्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय आहे, ते आपल्या पिकांना पाणी सोडत आहेत. मात्र, ज्यांना पाणी सोडण्याची व्यवस्था नाही, त्या शेतकऱ्यांना आपली वाळत चाललेली पिके पाहण्यावाचून काही पर्याय उरलेला नाही. एकीकडे शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकाच्या बियाण्यांचे दर खूप महाग होते. त्यात रासायनिक खते, मजुरी, मेहनत आदीचा खर्च पाहता उत्पन्न तर नाहीच; पण शेतीसाठी झालेला खर्चही निघणार नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे. धोम धरणाची पाण्याची पातळी खालावली आहे. धोम जलाशयातून अनेक उपसा सिंचन योजना प्रकल्प आहेत. मात्र, यंदा पाण्याची पातळी अजून खालीच असल्याने कृषिपंपाद्वारे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्यात अनेक अडचणी येत आहेत.सर्वच पिकांना फटका...वाई तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजे दरवर्षी पाऊस पडणारे ठिकाण. पण, यंदा या परिसरात पाऊस कमी झाला आहे. जून महिन्यात सुरूवातीला काही पाऊस झाला. त्यानंतर पावसाने हुलकावणीच दिली आहे. सध्या या परिसरात भात, सोयाबीन, घेवडा अशी पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. ही पिके चांगल्याप्रकारे उगवूनही आली आहेत. पण, पावसाने दडी मारल्याने या पिकांना पाणी कसे मिळणार या विवंचनेत येथील शेतकरी आहे. काही शेतकरी विहिरीतील पाण्यावर पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.