शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

सरपंच सहा महिन्यांच्या वैद्यकीय रजेवर!

By admin | Updated: June 9, 2015 00:11 IST

मायणी ग्रामपंचायत : अडीच वर्षांत तिसरी वेळ ; प्रभारी पद्भार स्वीकारण्यास उपसरपंचाचा नकार

मायणी : येथील सरपंच महादेव यलमर अडीच वर्षांच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा सहा महिन्यांच्या वैद्यकीय रजेवर गेले आहेत. तर उपसरपंच प्रकाश कणसे यांनी प्रभारी सरपंचपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. यामुळे सत्ताधारी गटातर्फे सरपंच निवडीच्या हालचालीला ग्रामपंचायत सदस्य हिंमत देशमुख यांनी आक्रमक होऊन विरोध दर्शविलेला आहे.याबाबत माहिती अशी की, आॅक्टोबर २०१२ मध्ये मायणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर महादेव यलमर यांनी सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारला होता; पण प्रकृतीच्या कारणावरून ते सहा महिन्यांच्या वैद्यकीय रजेवर गेले होते. रजेचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा ही रजा सहा महिन्यांसाठी वाढवून घेतली. त्यांच्या सहा-सहा महिन्यांच्या वैद्यकीय रजेचा कार्यकाळ १० मे रोजी संपला. त्यानंरही ते ग्रामपंचायत कार्यालयात हजर झाले नाहीत. त्यानंतर २९ मे पासून त्यांनी पुन्हा वैद्यकीय रजेसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यामुळे अडीच वर्षांच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा ते सहा महिन्यांच्या रजेवर गेले आहेत.दरम्यान, उपसरपंच प्रकाश कणसे यांनी एक वर्षे प्रभारी सरपंचपद स्वीकारले होते; पण मे महिन्यामध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदारी वाढल्याचे कारण सांगून त्यांनी प्रभारी सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे.सत्ताधारी गटाने बहुमताच्या जोरावर ग्रामपंचायतीमधील एका सदस्याला सरपंचपद देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पण ग्रामपंचायत मुंबई १९५८ च्या नियमानुसार सरपंच रजेच्या काळासाठी प्रभारी सरपंच निवडण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस नाही. त्यामुळे असा ठराव ग्रामपंचायतीतील सत्ताधारी मंजूर करत असतील तर तो बेकायदशीर ठरवावा, असा अर्ज विरोधी गटनेते हिंमत देशमुख यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केला आहे. यामुळे मायणी ग्रामपंचायतीतील या राजकीय घडामोडीमुळे विकासकामांना खिळ बसत असल्याचे दिसत आहे. तांत्रिक अडचण असली तरी गावाच्या विकासही महत्वाचा असल्याने प्रशासकीय यंत्रणा व ग्रामस्थांनी एकत्र बसून काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. (वार्ताहर)हार्निया व मूतखड्याचा त्रास असल्यामुळे मी वैद्यकीय रजा घेतलेली आहे. माझी प्रकृती मला साथ देत नाही. त्यामुळे मी वैद्यकीय रजेवर गेला आहे. माझ्यावर कोणाचेही दडपण नाही.- महादेव यलमरसरपंच, ग्रामपंचायत मायणीसरपंचांनी कोणाच्या दबावाखाली न येता काम करावे, त्यांनी कोणाच्या दबावातून वारंवार रजेवर जाऊ नये. त्यांना विकासकामासाठी आम्ही सदैव पाठिंबा देऊ.- हिंमत देशमुखविरोधी गटनेते, मायणी. माझ्या वडिलांचे निधन झाल्यामुळे माझ्यावर कौटुंबिक जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे मी प्रभारी सरपंचपदाची जबाबदारी पार पाडू शकत नाही. ही जबाबदारी इतर कोणाकडेही सोपविण्यास माझी हरकत नाही.- प्रकाश कणसेउपसरपंच, मायणी.