शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

सरपंच आरक्षण सोडत; इच्छुकांचे देव पाण्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सरपंचपदाचे आरक्षण आपल्याच पारड्यात पडावे, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तर, गावातील ‘किंगमेकर’ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सरपंचपदाचे आरक्षण आपल्याच पारड्यात पडावे, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तर, गावातील ‘किंगमेकर’ जुमल्यांच्या राजकारणात गुंतलेले आहेत.

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींमध्ये तितकेच सरपंच निवडले जाणार आहेत. जिल्हाधिकारी थोड्याच दिवसांत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करतील. त्याआधी प्रत्येक तालुक्याला आरक्षणाचा कोटा कळवला जाणार आहे.

आरक्षण सोडतीसाठी विद्यमान सदस्यांची तसेच पॅनलप्रमुखांची उपस्थिती असणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखीव असलेले आरक्षण या सोडतीत काढले जाणार आहे. तालुक्यातील तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात ही आरक्षण सोडत होणार आहे.

महिलांसाठी ५0 टक्के आरक्षण राहणार आहे. तसेच इतर प्रवर्गांसाठी शासनाने जाहीर केलेल्या आरक्षणाच्या तरतुदीनुसार ही सोडत घेतली जाणार आहे. प्रत्येक गावात आरक्षण सोडतीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. ज्या ठिकाणी काठावरचे बहुमत आहे अथवा आरक्षित जागा एकच निवडून आलेली आहे, त्याच्याशी पॅनलप्रमुख संधान साधून आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांची पळवापळवी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

सदस्यांच्या याद्यांची २९ जानेवारीला प्रसिद्धी

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींमध्ये सात हजार २६६ सदस्य निवडून आले आहेत. या सदस्यांची प्रभागनिहाय व आरक्षणनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गावातील चावडी, पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर ही लावण्यात येणार आहे. २९ जानेवारी रोजी या याद्यांची प्रसिद्ध केली जाणार आहे.

आरक्षण जाहीर करण्यासाठी पुरेसा कालावधी

निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ३0 दिवसांच्या आतमध्ये सरपंच आरक्षण घोषित करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी प्रत्येक तालुक्यासाठी आरक्षणाचा कोटा जाहीर करतील. त्यानुसार, आरक्षण काढण्याची प्रक्रिया तहसीलदारांमार्फत करण्यात येणार आहे. आरक्षण सोडत जाहीर करण्यासाठी पुरेसा कालावधी असून प्रशासन आरक्षणाचा कोटा ठरविण्याच्या कामात गुंतले आहे.

पुढच्या टप्प्यातील आरक्षणेही जाहीर होणार

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. जिल्ह्यात एकूण १४९६ ग्रामपंचायती आहेत. आता या सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंचांची आरक्षण सोडत एकाचवेळी घेतली जाणार आहे.