शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सरपंचांना मिळणार ओळखपत्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:44 IST

सातारा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. या परिस्थितीत ग्रामसेवकांसह सरपंचही विविध उपाययोजना राबवीत आहेत. मात्र, लॉकडाऊन ...

सातारा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. या परिस्थितीत ग्रामसेवकांसह सरपंचही विविध उपाययोजना राबवीत आहेत. मात्र, लॉकडाऊन लागू असल्याने अनेकदा अत्यावश्‍यक ठिकाणी जाताना ओळखपत्राचा पुरावा नसल्याने सरपंचांना विविध समस्यांशी सामना करावा लागतो. यासाठी जिल्ह्यातील जवळपास १४९० हून अधिक सरपंचांना ओळखपत्र देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण वाढतच चालले आहेत. या परिस्थितीत गावनिहाय विलगीकरण कक्ष, कोरोना प्रादुर्भावाची जनजागृती, माहितीपत्रके व इतर उपाययोजना राबविण्यासाठी सरपंचांना बाहेर फिरावे लागते. या प्रसंगी सरपंचांकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याने अनेकदा पोलिसांकडून कारवाईचा सामना करावा लागत आहे. यासाठी सरपंच परिषदेने प्रत्येक सरपंचांना ओळखपत्र देण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता सरपंचांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असल्याने अत्यावश्‍यक सेवा सोडून सर्व बंद ठेवण्यात आले आहे. या परिस्थितीत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असल्याने अनेकदा प्रशासकीय कामकाजासाठी जिल्हा व तालुकास्तरावर जावे लागते. याप्रसंगी कोणताही ओळखपत्राचा पुरावा नसल्याने अनेकदा पोलीस यंत्रणा वाहने जप्त व इतर दंडात्मक कारवाई करते. त्यामुळे आता प्रत्येक सरपंचांना ओळखपत्र दिले जाणार असल्याने दिलासा मिळणार आहे.

..........

कोट :

कोरोनाच्या काळात गावनिहाय उपाययोजना राबविण्यात येतात. कामासाठी जाताना सरपंचांना अडचणी येत असल्याने त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात सरपंचांना ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू होईल.

- अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग

.........................................................................