शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

संतोषचा गाळा आठ वर्षांपासून बंद

By admin | Updated: August 28, 2016 00:07 IST

शटरच्या आत दडलंय काय? : कसलाही व्यवसाय करायचा नव्हता तर कशासाठी घेतला; धोम ग्रामस्थांना प्रश्न

वाई : संतोष पोळने खून केलेले सहा मृतदेह त्याचे घर किंवा फार्म हाऊसवर पुरले होते, ही धक्कादायक माहिती समोर येत असतानाच संतोष पोळच्या एका गाळ्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. धोम ग्रामपंचायतीचा गाळा त्याने ताब्यात घेतल्यापासून गेली आठ वर्षे बंद आहे. जिल्ह्याबरोबरच राज्यभर वाई हत्याकांड गाजत आहे. मंगल जेधे खून प्रकरणात संतोष पोळ व त्याची प्रेयसी ज्योती मांढरे यांना अटक केली. २००३ पासून त्यांनी केलेल्या पापांची कबुली दिली. एक-दोन नव्हे तर तब्बल सहा खुनांची कबुली त्यांनी पोलिसांसमोर दिली आहे. त्यांच्या कृत्याची सीमा एवढ्यावर मर्यादित न राहता, त्याने खून केल्यानंतर सहा मृतदेह घर, फार्म हाऊसमध्ये पुरले होते. त्याच्याही पुढे जाऊन त्याने त्यावर झाडे लावली होती. त्यामुळे संतोषबरोबर त्याची स्थावर मालमत्ताही चर्चेत आली आहे. संतोष पोळ हा २००५ ते २०१० या कालावधीत धोम ग्रामपंचायतीत बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आला. या काळात त्याने सदस्यत्वाच्या अधिकाराचा गैरवापर केला. ग्रामस्थांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण केली़ त्याने ग्रामपंचायतीद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिले जाणारे गाळ्यापैकी एक गाळा गावातील एका महिलेला मिळाला असताना संतोषने तो गाळा २००८ मध्ये ताब्यात घेतला़ धोम बसथांब्याजवळील संबंधित गाळा गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे़ कोणता व्यवसाय करायचा नव्हता तर गाळा कशासाठी ताब्यात घेतला. अन् घेतला तर तो गाळा त्याने उघडलेला ग्रामस्थांनी कधीही पाहिलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. (प्रतिनिधी) असंख्य कृत्यांना काळी किनार संतोषने ‘ओपीडी’साठी घेतलेली जागा २००६ ते २००९ या काळात त्याच्या ताब्यात होती. जागेचे मालक पोलिस पाटील महादेव पोळ यांनी परत मागितली असता त्याने त्यांच्यावर कोर्टात दावा दाखल केला़ तसेच बेकायदा कब्जा केला़ त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता ग्रामस्थांना पडलेला प्रश्न चुकीचे नाही. दरम्यान, ग्रामस्थांशी संपर्क साधला असता आम्ही ग्रामसेवकांच्या उपस्थितीत सर्व ग्रामस्थ संबंधित गाळा उघडणार असल्याचे सांगण्यात आहे, अशी माहिती धोममधील ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.लवकरच उघडणार गाळा संतोष पोळने वेगवेगळ्या कारनाम्यातून मानवतेला काळिमा फासण्याचे काम केले असून, त्याची संपूर्ण कारकीर्द संशयास्पद आहे़ तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याने २००३ पासून अनेक गंभीर गुन्हे राजरोसपणे केले़ त्याने थंड डोक्याने भयंकर हत्याकांड केल्याने संपूर्ण तालुक्यासह जिल्हा हादरून गेला़ याच काळात २००८ मध्ये पोळने हा गाळा घेतला होता. गाळा ताब्यात घेतला; पण त्यात कोणताही व्यवसाय सुरू केलेला नाही किंवा दुसऱ्यालाही भाड्याने दिला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये या गाळ्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. शंकेचे निरसन करण्यासाठी हा गाळा लवकरच उघडण्यात येणार आहे.