शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संतोषचा गाळा आठ वर्षांपासून बंद

By admin | Updated: August 28, 2016 00:07 IST

शटरच्या आत दडलंय काय? : कसलाही व्यवसाय करायचा नव्हता तर कशासाठी घेतला; धोम ग्रामस्थांना प्रश्न

वाई : संतोष पोळने खून केलेले सहा मृतदेह त्याचे घर किंवा फार्म हाऊसवर पुरले होते, ही धक्कादायक माहिती समोर येत असतानाच संतोष पोळच्या एका गाळ्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. धोम ग्रामपंचायतीचा गाळा त्याने ताब्यात घेतल्यापासून गेली आठ वर्षे बंद आहे. जिल्ह्याबरोबरच राज्यभर वाई हत्याकांड गाजत आहे. मंगल जेधे खून प्रकरणात संतोष पोळ व त्याची प्रेयसी ज्योती मांढरे यांना अटक केली. २००३ पासून त्यांनी केलेल्या पापांची कबुली दिली. एक-दोन नव्हे तर तब्बल सहा खुनांची कबुली त्यांनी पोलिसांसमोर दिली आहे. त्यांच्या कृत्याची सीमा एवढ्यावर मर्यादित न राहता, त्याने खून केल्यानंतर सहा मृतदेह घर, फार्म हाऊसमध्ये पुरले होते. त्याच्याही पुढे जाऊन त्याने त्यावर झाडे लावली होती. त्यामुळे संतोषबरोबर त्याची स्थावर मालमत्ताही चर्चेत आली आहे. संतोष पोळ हा २००५ ते २०१० या कालावधीत धोम ग्रामपंचायतीत बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आला. या काळात त्याने सदस्यत्वाच्या अधिकाराचा गैरवापर केला. ग्रामस्थांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण केली़ त्याने ग्रामपंचायतीद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिले जाणारे गाळ्यापैकी एक गाळा गावातील एका महिलेला मिळाला असताना संतोषने तो गाळा २००८ मध्ये ताब्यात घेतला़ धोम बसथांब्याजवळील संबंधित गाळा गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे़ कोणता व्यवसाय करायचा नव्हता तर गाळा कशासाठी ताब्यात घेतला. अन् घेतला तर तो गाळा त्याने उघडलेला ग्रामस्थांनी कधीही पाहिलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. (प्रतिनिधी) असंख्य कृत्यांना काळी किनार संतोषने ‘ओपीडी’साठी घेतलेली जागा २००६ ते २००९ या काळात त्याच्या ताब्यात होती. जागेचे मालक पोलिस पाटील महादेव पोळ यांनी परत मागितली असता त्याने त्यांच्यावर कोर्टात दावा दाखल केला़ तसेच बेकायदा कब्जा केला़ त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता ग्रामस्थांना पडलेला प्रश्न चुकीचे नाही. दरम्यान, ग्रामस्थांशी संपर्क साधला असता आम्ही ग्रामसेवकांच्या उपस्थितीत सर्व ग्रामस्थ संबंधित गाळा उघडणार असल्याचे सांगण्यात आहे, अशी माहिती धोममधील ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.लवकरच उघडणार गाळा संतोष पोळने वेगवेगळ्या कारनाम्यातून मानवतेला काळिमा फासण्याचे काम केले असून, त्याची संपूर्ण कारकीर्द संशयास्पद आहे़ तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याने २००३ पासून अनेक गंभीर गुन्हे राजरोसपणे केले़ त्याने थंड डोक्याने भयंकर हत्याकांड केल्याने संपूर्ण तालुक्यासह जिल्हा हादरून गेला़ याच काळात २००८ मध्ये पोळने हा गाळा घेतला होता. गाळा ताब्यात घेतला; पण त्यात कोणताही व्यवसाय सुरू केलेला नाही किंवा दुसऱ्यालाही भाड्याने दिला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये या गाळ्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. शंकेचे निरसन करण्यासाठी हा गाळा लवकरच उघडण्यात येणार आहे.