शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लोककलावंतांच्या कार्यक्रमांवर कोरानामुळे संक्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:29 IST

कुडाळ: कोरोनामुळे गावोगावच्या यात्रा, जत्रा, उत्सव यावर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून निर्बंध घालण्यात आले. यामुळे या काळात यात्रेनिमित्त होणारे तमाशाचे ...

कुडाळ: कोरोनामुळे गावोगावच्या यात्रा, जत्रा, उत्सव यावर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून निर्बंध घालण्यात आले. यामुळे या काळात यात्रेनिमित्त होणारे तमाशाचे फड तसेच देव-देवतांचे होणारे गोंधळ, जागरणाचे कार्यक्रम सर्वच बंद झाले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातून आपली कला सादर करणाऱ्या लोककलावंतांच्या कलेवर मात्र संक्रांत आली आहे. हे कलावंत आर्थिक विवंचनेत सापडले असून, रोजगाराअभवी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

महाराष्ट्र हे लोककलांचे आगर आहे. यातही याचे खरे वैभव म्हणजे तमाशा. हा लोककलेचा एक प्रकार. अठराव्या शतकात सुरू झालेला तमाशा एकोणिसाव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या मध्यकालापर्यंत बहरत गेला. शाहीर पठ्ठे बापूरावांचा काळ म्हणजे या कलेचा सुवर्णकाळ ठरला. यात्रा, जत्रांमधून मनोरंजन करत सामाजिक प्रबोधन साधण्याचा प्रयत्न यांच्याकडून होत होता. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे तमाशाचे कार्यक्रम बंद झाले. त्याचबरोबर गोंधळ, भारुड, जागरण, कीर्तन आदी सर्वच लोककला आज थांबल्या आहेत. आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी कला सादर करणारा लोककलावंत मात्र आर्थिक विवंचनेत अडकला आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात ऐन हंगामात कोरोनाच्या उद्रेकामुळे सर्वच ठप्प झाले. यात्रांचा हंगाम असल्याने याचा मोठा फटका तमाशा कलावंतांना बसला. फडमालकांच्या घेतलेल्या कामाच्या सुपाऱ्याही रद्द झाल्या. गतवर्षाची परिस्थिती आजही काहीशी तशीच आहे. अजूनही यात्रा, जत्रा, उत्सव यांना बंदीच घातलेली आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा या तमाशांचे खेळ होणार नाहीत. याचा परिणाम म्हणजे अशा परिस्थितीत फडमालक व तमाशा कलावंत हे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मुळातच आपल्या कलेच्या सादरीकरणातून मिळालेल्या बिदागीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, कोरोनाने सर्व काही हिरावून घेत त्यांचा रोजगरच नाहीसा केला. यामुळे पुन्हा कधी एकदा आपली कला प्रेक्षकांसमोर येईल आणि आपल्यालाही चांगले दिवस येतील, याचीच वाट पाहत आहेत.

(चौकट)

कार्यक्रमाला बंदी, रोजीरोटीचा प्रश्न..!

आज कोरोनाने सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशातच गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्राची लोककलाही याच्या विळख्यात सापडली आहे. यात्रा, जत्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रम बंद झाल्याने लोककलावंतांचा रोजगार नाहीसा झाला आहे. यामुळे कलावंत आर्थिक संकटात आहेत. गतवर्षी आणि यंदाही कार्यक्रमाला बंदी असल्याने त्यांच्यापुढे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या कलेचा वारसा जपणाऱ्या या कलावंतांना आज मात्र आर्थिक विवंचनेच्या छायेतच जीवन जगावे लागत आहे.