शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

लोककलावंतांच्या कार्यक्रमांवर कोरानामुळे संक्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:29 IST

कुडाळ: कोरोनामुळे गावोगावच्या यात्रा, जत्रा, उत्सव यावर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून निर्बंध घालण्यात आले. यामुळे या काळात यात्रेनिमित्त होणारे तमाशाचे ...

कुडाळ: कोरोनामुळे गावोगावच्या यात्रा, जत्रा, उत्सव यावर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून निर्बंध घालण्यात आले. यामुळे या काळात यात्रेनिमित्त होणारे तमाशाचे फड तसेच देव-देवतांचे होणारे गोंधळ, जागरणाचे कार्यक्रम सर्वच बंद झाले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातून आपली कला सादर करणाऱ्या लोककलावंतांच्या कलेवर मात्र संक्रांत आली आहे. हे कलावंत आर्थिक विवंचनेत सापडले असून, रोजगाराअभवी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

महाराष्ट्र हे लोककलांचे आगर आहे. यातही याचे खरे वैभव म्हणजे तमाशा. हा लोककलेचा एक प्रकार. अठराव्या शतकात सुरू झालेला तमाशा एकोणिसाव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या मध्यकालापर्यंत बहरत गेला. शाहीर पठ्ठे बापूरावांचा काळ म्हणजे या कलेचा सुवर्णकाळ ठरला. यात्रा, जत्रांमधून मनोरंजन करत सामाजिक प्रबोधन साधण्याचा प्रयत्न यांच्याकडून होत होता. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे तमाशाचे कार्यक्रम बंद झाले. त्याचबरोबर गोंधळ, भारुड, जागरण, कीर्तन आदी सर्वच लोककला आज थांबल्या आहेत. आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी कला सादर करणारा लोककलावंत मात्र आर्थिक विवंचनेत अडकला आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात ऐन हंगामात कोरोनाच्या उद्रेकामुळे सर्वच ठप्प झाले. यात्रांचा हंगाम असल्याने याचा मोठा फटका तमाशा कलावंतांना बसला. फडमालकांच्या घेतलेल्या कामाच्या सुपाऱ्याही रद्द झाल्या. गतवर्षाची परिस्थिती आजही काहीशी तशीच आहे. अजूनही यात्रा, जत्रा, उत्सव यांना बंदीच घातलेली आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा या तमाशांचे खेळ होणार नाहीत. याचा परिणाम म्हणजे अशा परिस्थितीत फडमालक व तमाशा कलावंत हे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मुळातच आपल्या कलेच्या सादरीकरणातून मिळालेल्या बिदागीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, कोरोनाने सर्व काही हिरावून घेत त्यांचा रोजगरच नाहीसा केला. यामुळे पुन्हा कधी एकदा आपली कला प्रेक्षकांसमोर येईल आणि आपल्यालाही चांगले दिवस येतील, याचीच वाट पाहत आहेत.

(चौकट)

कार्यक्रमाला बंदी, रोजीरोटीचा प्रश्न..!

आज कोरोनाने सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशातच गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्राची लोककलाही याच्या विळख्यात सापडली आहे. यात्रा, जत्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रम बंद झाल्याने लोककलावंतांचा रोजगार नाहीसा झाला आहे. यामुळे कलावंत आर्थिक संकटात आहेत. गतवर्षी आणि यंदाही कार्यक्रमाला बंदी असल्याने त्यांच्यापुढे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या कलेचा वारसा जपणाऱ्या या कलावंतांना आज मात्र आर्थिक विवंचनेच्या छायेतच जीवन जगावे लागत आहे.