शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

संजय पाटील खून खटल्याची सुनावणी पूर्ण

By admin | Updated: October 10, 2014 23:02 IST

सातारा : दि. १८ रोजी निकाल लागण्याची शक्यता

सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून, शनिवार दि. १८ रोजी या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी वर्तवली आहे. बचाव पक्षाच्या वतीने शुक्रवारी अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांनी युक्तिवाद केला. अ‍ॅड. पाटील म्हणाले, ‘या खटल्यातील संशयित उदय पाटील यांनी हे कृत्य करायला कारण काय आहे का, हे समोर आले नाही. सरकार पक्षाने या खून प्रकरणाची दोन कारणे सांगितली आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे, संजय पाटीलने विलासराव पाटील-उंडाळकर यांचा फोटो असलेले घड्याळ फोडून त्यावर पाय दिला. दुसरे कारण बाजार समितीच्या निवडणुकीत पॅनेल उभे करू नये, यासाठी उदय पाटील यांनी संजय पाटीलवर दबाव आणला; मात्र खुनाच्या घटनेनंतर फिर्यादी धनंजय पाटीलचे एकूण तीन जबाब घेण्यात आले. त्यामध्ये कुठेही वरील कारण नमूद करण्यात आले नाही,’ अ‍ॅड. पाटील पुढे म्हणाले, ‘दि. २१ जानेवारी २००९ रोजी त्यावेळच्या पोलीस अधीक्षकांना फिर्यादीने निवेदन दिले होते. त्यामध्येही वरीलपैकी खुनाचे कोणतेही कारण दिले नाही. तसेच सरकार पक्षानेही ते शाबीत केले नाही. या खुनाचा जादा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तपासाच्या नावाखाली भूत उभे केले. जादा तपासासाठी अर्ज केला गेला. त्यामध्ये स्पष्ट कारणेही नाहीत. केवळ त्यांनी बोगस कहाणी पुढे आणली. खुनाच्या घटनेनंतर एकूण तीन अधिकाऱ्यांनी याचा तपास केला. त्यामध्ये उदयसिंह पाटील संशयित आरोपी आहेत. हे तिन्ही अधिकाऱ्यांच्या तपासात समोर आले नाही. कारण उदय पाटील यांच्याविरोधात कसलेही पुरावे नाहीत, आणि नव्हते. तरीही तांबे यांनी या प्रकरणामध्ये उदय पाटील यांना गोवले. कटाची निश्चित तारीख सरकार पक्षाला सांगता आली नाही. विलासराव पाटील-उंडाळकर हे गेले ३५ वर्षे आमदार आहेत. त्यांची घराणेशाहीचे नेतृत्व उदयसिंह पाटील करतील, त्याचे आत्ताच पाय छाटले तर पुढे फार काही होणार नाही. त्यामुळेच या प्रकरणामध्ये उदयसिंहला नाहक अडकविले आहे. तसेच सध्या विलासराव पाटील-उंडाळकर हे निवडणूक लढवत आहेत, याची न्यायालयाने नोंद घ्यावी.’ अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांना अ‍ॅड. ताहेर मणेर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)