शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

नकुसाने कर्ज काढून बांधले चक्क स्वच्छतागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:01 IST

स्वप्नील शिंदे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मुलगी जन्माला आल्यानंतर पूर्वी आई-वडिलांना नकोशी वाटायची. त्यामुळे त्या मुलीचेही नाव नकुसा ...

स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुलगी जन्माला आल्यानंतर पूर्वी आई-वडिलांना नकोशी वाटायची. त्यामुळे त्या मुलीचेही नाव नकुसा ठेवले जायचे. परंतु आई-वडिलांना ‘नकोशा’ झालेल्या या नकुसा सध्या अनेक ठिकाणी आदर्श काम करत आहेत. अशाच नकुसाची कहाणी समाजापुढे आदर्श निर्माण करणारी आहे. वाई तालुक्यातील शेलारवाडी येथील नकुसा पवार यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, त्यांनी स्वच्छतागृह बांधण्यासाठी बचत गटातून चक्क कर्ज काढले आणि स्वच्छतागृह बांधून गाव हागणदारीमुक्तीसाठी योगदानही दिले.राज्यातील पहिला हागणदारी मुक्त जिल्हा तसेच स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान साताऱ्याने मिळविला. यासाठी हजारो लोकांनी शौचालय बांधून आपले योगदान दिले. त्यामध्ये अनेकांनी स्वत:चे दागिने गहाण ठेवून तर काहींनी शैक्षणिक फीचा वापर स्वच्छतागृह बांधण्यासाठी केला आहे. ही योजना यशस्वी करत असताना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी निधी उभारण्याचे मोठे आव्हान होते. सरस्वती बचत गटाच्या सदस्या असलेल्या नकुसा पवार यांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी पैशांची चणचण भासत होती. त्यांनी बचत गटाकडून २० हजार रुपयांचे कर्ज घेतले. घराच्या आवारात वैयक्तिक स्वच्छतागृह बांधले. त्यांच्यासारख्या हजारो महिलांनी दिलेल्या योगदानामुळे जिल्हा हागणदारीमुक्त होण्यास मदत झाली आहे. अशा या नकुसा पवार यांच्या जिद्दीला प्रशासनाने सलाम केला आहे. नावात नकोशा असलेल्या नकुसाने सगळ्यांसमोरच आदर्श निर्माण केला. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रापंचिक खर्चासाठी अनेकजण कर्ज काढतात. परंतु शौचालयाची गरज ओळखून कर्ज काढणारी नकुसा ही विरळच आपल्या समाजात पाहायला मिळेल. त्यामुळेच या नकुसाची शासनानेही दखल घेतली आहे.२८५ नकुसांचे बदलले नावनकुसा नाव असलेल्या मुलींना समाजात वेगळे स्थान निर्माण व्हावे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेने नकुसा नाव असलेल्या मुलींचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात नकुसा नाव असलेल्या मुलींचा चक्क शोध घेतल्यानंतर नकुसा नाव असलेल्या २८५ मुली असल्याचे पुढे आले. त्यानंतर जिल्हा परिषदेने तत्काळ या मुलींची नावे बदलण्याचा निर्णय घेतला. एका शानदार कार्यक्रमात या नकुसांचे नामकरण करण्यात आले. याच मुली आता वेगवेगळ्या माध्यमातून समाजापुढे आदर्श निर्माण करत आहेत.आमच्याकडे यापूर्वी स्वच्छतागृह होते. मात्र, त्याची पडझड झाली होती. मागील प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले. स्वच्छतागृह बांधण्यासाठी पैसे कमी पडल्याने कुटुंबीयांनी बचत गटातून कर्ज काढून शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला.- नकुसा पवार, शेलारवाडी, ता. वाई