शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

संगमनगर धक्का पूल पाण्याखालीच

By admin | Updated: September 11, 2014 00:09 IST

धोम, कण्हेरमधून विसर्ग : ३५ गावे अजूनही संपर्कहीन

सातारा : जिल्ह्याच्या धरण पाणलोट क्षेत्रांत संततधार सुरू असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. बहुतांशी धरणे भरण्याच्या मार्गावर असून, धोम-बलकवडी, वीर, भाटघर, नीरा-देवघर ही धरणे पूर्ण भरली आहेत. कोयना धरणात बुधवारी सायंकाळी सहा वाजता १०४.८२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. धरणातील पाण्याचा येवा २४,२५९ क्युसेक इतका असून, संगमनगर धक्का पूल अजूनही पाण्याखाली आहे. कण्हेर धरणातून दुपारी पाणी सोडण्यात आले असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. कण्हेर पाणलोट क्षेत्रांत जोरदार सरी कोसळत असल्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपात्रात वाढ झाली आहेत. कण्हेर धरणाची पाणीसाठवण क्षमता १०.१० टीएमसी इतकी असून, धरणात ९.१८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी बारा वाजता धरणातून ४१५० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे. परिणामी जिल्हा प्रशासन आणि आपत्कालीन विभागाने वेण्णा नदीकाठावरील गावांना धोक्याचा इशारा दिला आहे.कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार असल्यामुळे धरणातील पाण्याचा येवा २४,२५९ क्युसेक इतका असून, संगमनगर धक्का पूल अजूनही पाण्याखाली आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ इतकी असून, आजमितीस असणारा पाणीसाठा १०४.८२ टीएमसी इतका आहे. पाणीपातळी २१६३.२ फूट इतकी असून, धरणातून १४,१३४ तर पायथा वीजगृहातून २१११ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे. दरम्यान, कोयनानगर येथे दिवसभरात २० (४६५५), नवजा ५ (५५२३) तर महाबळेश्वर येथे १६ (४४९६) मिमी पावसाची नोंद झाली आहे.वीर, भाटघर, नीरा-देवघर आणि धोम-बलकवडी ही धरणे पूर्ण भरली आहेत. या धरणातून नदीपात्रात विसर्ग होत आहे. दरम्यान, उरमोडी धरणातून ३०० क्युसेक, वीर १५३११, धोम ३२८१, धोम-बलकवडी १९५३ तर महू धरणातून १३२ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे.दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी सर्वाधिक ७६ मिमी पावसाची नोंद महाबळेवर तालुक्यात झाली असून, जिल्ह्यात बुधवारी पहाटे आणि मंगळवारी दिवसभरात ११६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आत्तापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी अशी, कंसात एकूण पाऊस : सातारा ८.८ (९५८.४), जावळी १४ (१५०२.५), कोरेगाव १.१ (४११.६), कऱ्हाड २.३ (५६५.९), पाटण ९ (१३८१.५), फलटण १.१ (२६७.७), खटाव ०.५ (४३८.७), वाई २.५ (५६०.८) मिमी, खंडाळा ०.९ (४०६.७) आणि महाबळेश्वर ७६ (५४४५.२) मिमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण सरासरी १०.६ मिमी पाऊस झाला असून, आजअखेर झालेल्या पावसाची नोंद १२२४१.६ मिमी इतकी आहे. तालुकानिहाय सरासरी १११२.९ मिमी इतकी आहे. (प्रतिनिधी)