शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
3
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
4
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
5
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
6
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
7
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
9
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
10
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
11
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
12
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
13
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
14
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
15
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
16
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
17
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
18
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
19
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
20
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!

संदीप सावंत मारहाणीमागे अनेक कंगोरे, चिपळुणात संमिश्र प्रतिक्रिया

By admin | Updated: April 27, 2016 00:32 IST

संदीप सावंतने केलेले आरोप बिनबुडाचे : राणे

चिपळूण : माजी खासदार नीलेश राणे आणि काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्यामध्ये जवळचे संबंध असतानाही मारहाणीचा प्रकार घडल्याने हे संबंध बिघडण्यामागे कारण काय, असा प्रश्न आता प्रकर्षाने पुढे आला आहे. संघटनेतील पद, आमदारकीची उमेदवारी अशी ज्यांच्यावर विशेष मेहेरनजर होती, त्याच सावंत यांना राणे यांनी मारहाण करण्यामागे नेमके काय कंगोरे आहेत, याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेले सात - आठ महिने संदीप सावंत यांनी घेतलेली अलिप्तपणाची भूमिका, पक्षात केली जाणारी गटबाजी आणि मराठा आरक्षण सभेला दाखवलेली अनुपस्थिती, हीच प्रमुख कारणे असल्याचा निष्कर्ष काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काढला आहे. तालुकाध्यक्ष सावंत व राणे परिवाराशी कौटुंबिक संबंध होते. ज्या ज्यावेळी राणे यांच्यावर विरोधकांनी तोफ डागली, त्या त्यावेळी संदीप सावंत ढाल बनून पुढे उभे राहिले होते. काही महिन्यांपूर्वी नीलेश राणे यांना जिल्हाध्यक्षपद द्यावे, अशी भूमिका मांडण्याचा आटापिटाही सावंत यांनी केला होता. दुसऱ्या बाजूला चिपळूण तालुक्यातील अनेक संघर्षमय स्थितीत राणे यांनी वरिष्ठ नेत्यांचा विरोध पत्करून सावंत यांची पाठराखण केली होती. त्यांना गुहागरमधून विधानसभेची उमेदवारीही दिली होती. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सावंत वडील मानत होते तर नीलेश राणे हे त्यांच्यासाठी भावासारखे होते. राणे यांच्या प्रत्येक चिपळूण दौऱ्यात संदीप सावंत हजर होते. मात्र, गेले ७ ते ८ महिने तालुकाध्यक्ष सावंत काहीसे नाराज होते. अचानक त्यांनी आपले काम कमी केले. आता तालुकाध्यक्षपदाची निवडणूक जवळ आली आहे. आपण यापुढे शांत राहणार, अशा निर्वाणीच्या गोष्टीही सावंत यांनी सुरू केल्या होत्या. त्यामुळे सावंत यांना मारहाण करण्यामागे केवळ ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, हा एकच मुद्दा पुरेसा नाही. गेले ७ ते ८ महिने कोंडलेली वाफ या घटनेने बाहेर आली आहे.राणे समर्थक पदाधिकाऱ्यांनी मात्र सावंत यांच्यावर टीका केली आहे. राणे यांची दिशाभूल करून त्यांचे राजकीयदृष्ट्या खच्चीकरण करण्याचाच सावंत यांनी प्रयत्न केला. घर बांधण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली होती. विधानसभा निवडणुकीतही काही लाख रुपये घेतले होते. हे सर्व केल्यानंतरही त्यांनी पक्षनिष्ठा पाळली नाही. ठेकेदार, कंपन्या, उद्योजक यांना धमकावण्याचे अनेक प्रकार त्यांनी केले. वाळू व्यावसायिकांबाबतही त्यांचे वर्तन गैर होते. नीलेश राणे यांना बदनाम करण्याचे हे कटकारस्थान आहे, अशा प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, शहराध्यक्ष परिमल भोसले, उपनगराध्यक्ष कबीर काद्री, मंगेश शिंदे, राजेश वाजे, वैभव वीरकर, फैसल पिलपिले आदींनी व्यक्त केल्या आहेत. (प्रतिनिधी)रत्नागिरी : मराठा आरक्षणाच्या लढ्यातील राज्यातील पहिली असलेली रत्नागिरीची सभा यशस्वी झाल्याने सेना - भाजपवाल्यांना पोटशूळ झाला आहे. त्यामुळेच त्यांनी संदीप सावंत याच्याशी हातमिळवणी करून आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले आहे. संदीप सावंत याने केलेले आरोप बिनबुडाचे असून, त्यामागे सेना - भाजप असल्याचा गंभीर आरोप कॉँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी केला आहे. संदीप सावंत याने घर बांधण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली होती. ते त्याला मिळाले नाहीत म्हणून विरोधकांच्या साथीने हा घाणेरडा डाव रचण्यात आला आहे. रत्नागिरीतील मराठा समाजाच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व पुढेही राज्यभरातील सभांना प्रतिसाद मिळेल, या भीतीमुळेच सेना - भाजपवाल्यांनी संदीप सावंतला हाताशी धरून हे राजकारण सुरू केले आहे, असे नीलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. आजवर घरचा माणूस म्हणून संदीपला सर्वतोपरी मदत केली. त्याला आमदारकीचे तिकिटही मिळवून दिले. विरोध पत्करून त्याला पक्षाचा तालुकाध्यक्ष बनवले. असे असताना सावंत याने हे घाणेरडे राजकारण केले आहे. सावंत याने केलेल्या आरोपांचे उत्तर त्याला कायदेशीररित्या दिले जाईल. संदीप सावंत दारूचा अड्डा चालवतो. तसेच कार्यकर्ते आणि कंत्राटदारांना त्याने छळण्याचे काम केले आहे, असेही राणे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)पाचजणांविरुध्द गुन्हा दाखलकाँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप शिवराम सावंत यांना मारहाण करुन अपहरण केल्याप्रकरणी माजी खासदार व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे यांच्यासह पाच जणांवर चिपळूण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यात माजी खासदार राणे, त्यांचा पीए तुषार, बॉडीगार्ड मनीष व अण्णा, कुलदीप खानविलकर यांचा समावेश आहे. ठाणे येथे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो चिपळूण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप सावंत यांच्याबाबतीत झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्याप्रमाणे गुंडगिरी व दहशत आहे, त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात गुंडगिरी व दहशत चालू देणार नाही. पोलीस नेहमीच राणे कुटुंबियांच्या आमिषाला बळी पडतात. यावेळी पोलिसांनी राणे कुटुंबावर कारवाई केली नाही, तर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वपक्षीय आंदोलन उभे करून त्याचे नेतृत्व आपण करू.- भास्कर जाधव, आमदार.