शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

पगार दीड महिन्यानंतरही वेळेवर न मिळाल्याने एस. टी. कामगारांची कडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:42 IST

सातारा : राज्य परिवहन महामंडळ जेवढे प्रवाशांमुळे सुरू आहे, तेवढाच हा डोलारा यशस्वीपणे सांभाळण्याचे इंद्रधनुष्य कामगार सांभाळत असतात. त्यामुळे ...

सातारा : राज्य परिवहन महामंडळ जेवढे प्रवाशांमुळे सुरू आहे, तेवढाच हा डोलारा यशस्वीपणे सांभाळण्याचे इंद्रधनुष्य कामगार सांभाळत असतात. त्यामुळे एस. टी.ला चांगले दिवस आले. मात्र, कोरोनाची नजर लागली अन् वाईट दिवस आले. जिल्ह्यातील हजारो कामगारांचा दीड महिन्यानंतरही पगार झालेला नाही, त्यामुळे खिशात कडकी जाणवत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही एस. टी. सहा ते सात महिने बंद होती. त्यावेळी कामगारांचा पगार दिवाळीत झाला होता. दररोजचा खर्च भागविणेही अवघड जात असल्याने एस. टी.चे अनेक कर्मचारी फळे, भाज्या विकत होते. तीच वेळ पुन्हा या कामगारांच्या कुटुंबांवर आली आहे. दरवेळी दीड महिना झाला तरी पगार होत नाही. त्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकायचा, हा प्रश्न एस. टी.च्या हजारो कामगारांना सतावत आहे.

(कोट)

उसनवारी तरी किती करायची

अनेकांचे आई-वडील, मुलं आजारी आहेत. कोणाच्या मुलांचे लग्न आहे. मात्र पगारच नसल्याने अडचण येते. कित्येकवेळा मित्र, नातेवाईकांकडून उसनवारी केली जाते; पण किती दिवस उसनवारी करायची, हे समजत नाही.

- सागर शिंदे, कर्मचारी

एक येणार आहे...

चौकट

एस. टी. बरोबरच कामगारांचे उत्पन्न कमी खर्च जास्त

- राज्य परिवहन महामंडळाच्या फेऱ्या कोरोनानंतर कमी झाल्या आहेत. रुग्णसंख्या वाढली की नागरिकांचा प्रवास थांबतो. त्यामुळे उत्पन्न म्हणावे त्या प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे एस. टी.चा गाडा चालवताना अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

- याउलट डिझेलही शंभर रुपयांच्या घरात पोहोचले आहे. दरम्यानच्या काळात मर्यादीत प्रवासी वाहतूक करण्यास सांगितले जात होते. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असल्याने आर्थिक घडी विस्कटली आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूरसह कोकणात महापूर, भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना संसार पुन्हा उभा करायचा आहे. या भागातील कामगारांना तरी पगार मिळायला हवा. एस. टी. कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हणमंत ताटे यांनी नुकतीच यासंदर्भात परिवहन मंत्र्यांची भेट घेतली आहे.

- ज्ञानेश्वर ढोमे, एस. टी. कामगार संघटना, सातारा