शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
4
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
5
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
6
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
7
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
8
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
9
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
10
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
11
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
12
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
13
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
14
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
15
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
16
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
17
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
18
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
19
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
20
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."

कोरेगाव नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:40 IST

कोरेगाव : राज्य शासनाने प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायतीची स्थापना केली आहे. मात्र, पाच वर्षे उलटून गेली तरी ...

कोरेगाव : राज्य शासनाने प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायतीची स्थापना केली आहे. मात्र, पाच वर्षे उलटून गेली तरी आवश्यक ते निर्णय घेतले गेले नसल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारावर सातत्याने गंडांतर येत आहे. शासन अनुदान देत नसल्याने स्वफंडातील रकमेतून कर्मचारी पगार केले जात आहेत. पर्यायाने नगरपंचायतीवर आर्थिक ताण येत आहे. सद्य:स्थितीत सुमारे तीन कोटी रुपये मिळाल्यास नगरपंचायतीचा आर्थिक ताण कमी होऊ शकतो.

१९२२ ला कोरेगाव ग्रामपंचायतीची स्थापना झाली. राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये कोरेगावची गणना होत असे. २०१६ ला राज्य शासनाने प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायतीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे दि. ५ मार्च २०१६ रोजी कोरेगावात नगरपंचायत अस्तित्वात आली. नगरपंचायतीकडे सद्य:स्थितीत १०३ कर्मचारी आहेत, त्यापैकी ११ जण रोजंदारीवरील आहेत. राज्यातील ८९ नगरपंचायतींमध्ये सर्वाधिक कर्मचारी संख्या असून, त्यामध्ये सातारा जिल्ह्यात लोणंदखालोखाल कोरेगावचा क्रमांक लागत आहे.

एकूण १०३ कर्मचाऱ्यांपैकी राज्य संवर्गातील चारजण आहेत, तर ११ जुन्या कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समावेशन झालेले आहे. नगरपंचायतीची उद्घोषणा होण्यापूर्वी ५८ कर्मचारी कार्यरत होते. उद्घोषणेनंतर ३४ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यात आले आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर दरमहा १३ लाख ७७ हजार रुपये खर्च होत आहेत. शासन यापूर्वी दरमहा आठ लाख १५ हजार रुपये पगार अनुदान देत होते. मात्र, त्यामध्ये आता घट करण्यात आली असून, केवळ तीन लाख ५७ हजार रुपये अदा केले जात आहेत.

शासन संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पगारापोटी दोन लाख रुपये, शासन सेवेत समावेशन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी एक लाख ५० हजार रुपये खर्च होत आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासन कोणतेही अनुदान देत नाही. त्यामुळे त्यांचा पगार हा नगरपंचायतीच्या स्वफंडातून करावा लागत आहे. कोरोना काळात नगरपंचायतीचे आर्थिक उत्पन्न घटले आहे. त्यामुळे आर्थिक अरिष्टातून सध्या वाटचाल सुरू आहे.

(चौकट)

शासनाने ठोस निर्णय घ्यावा : बाळासाहेब सावंत

नगरपंचायतीचे आर्थिक नियोजन बसविण्याबरोबरच घडी बसविण्याचे काम शासनाचे आहे. अनुदानाच्या रकमेत कपात केल्याने, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न दरमहा भेडसावत आहे. शासनाने तातडीने दोन कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध करून दिल्यास नगरपंचायतीचा आर्थिक ताण कमी होणार आहे, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना दिलासादेखील मिळेल, अशी प्रतिक्रिया नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी बाळासाहेब सावंत यांनी व्यक्त केली.

(चौकट)

अत्यावश्यक सेवेत समावेश असून, हातात काहीच नाही

नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश केला असून, त्यांना कोरोना केअर सेंटरसह अन्य ठिकाणी नेमणुका देण्यात आलेल्या आहेत. काही कर्मचाऱ्यांकडे कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. त्यांना पगारासह अन्य कोणत्याही गोष्टी शासनाकडून उपलब्ध होत नाहीत. अत्यावश्यक सेवेत समावेश असूनसुद्धा हातात काहीच येत नाही, अशी परिस्थिती असल्याचे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.