शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

‘सह्याद्री’ला दोन दिवसांचा ‘अल्टीमेटम’

By admin | Updated: December 15, 2015 23:38 IST

‘स्वाभिमानी’ आक्रमक : ९९ रुपयांच्या ऊसबिलासाठी निवेदन; आंदोलनाचा इशारा

कऱ्हाड : सह्याद्री साखर कारखान्याच्या थकीत ९९ रुपयांच्या बिलांचा मुद्दा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याकडून ऊसबिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर होत नसल्याने याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ‘सह्याद्री’च्या कार्यकारी संचालकांना निवेदन देत दोन दिवसांत निर्णय घ्या अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.यावेळी स्वाभिमानीचे कऱ्हाड उत्तर तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, दक्षिणचे अध्यक्ष देवानंद पाटील यांच्यासह प्रदीप मोहिते, रामचंद्र चव्हाण, भरत चव्हाण, शैलेश चव्हाण, बाळासाहेब पिसाळ, संदीप मदने, संदीप पवार, दादासो यादव, शशिकांत शिवदास, बापूसो साळुंखे, सनी नलवडे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक सी. एन. आहिरे यांच्याशी चर्चा केली व ऊसबिलाच्या मागणीसंदर्भात निवेदन दिले. यावेळी आहिरे यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सह्याद्री साखर कारखान्यानं गळीत हंगाम सन २०१३-१४ मध्ये गाळप केलेल्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या ऊस दरासाठी २ हजार ५१९ रुपये प्रतिटन हा अंतिम दर जाहीर केला होता. या जाहीर केलेल्या ऊस दरापैकी आपल्या कारखान्याने आजपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २ हजार ४२० रुपये प्रतिटन या प्रमाणे रक्कम दिलेली आहे. आपल्या कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिटन ९९ रुपये येणे बाकी आहेत. गाळप हंगाम अद्याप ही शेतकऱ्यांना येणे बाकी असलेली प्रतिटन ९९ रुपये ही रक्कम मिळालेली नाही. सद्याची दुष्काळी परिस्थिती पाहता व उसाचे घटलेले उत्पादन पाहता ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, तरी ही ऊस दराची येणे बाकी असलेली रक्कम शेतकऱ्यांना या परिस्थितीत मिळणे गरजेचे आहे. म्हणून २०१३-१४ मधील ऊस गाळप करण्यास दिलेल्या शेतकऱ्यांना सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातील देय असलेली ९९ रुपये प्रतिटन ऊस बिल व्याजासह दोन दिवसांच्या आत देण्यात यावी. तसेच २०१५-१६ मध्ये शासनाने ठरवल्या प्रमाणे येत्या गळीत हंगामात ‘एफआरपी’ प्रमाणे होणाऱ्या रक्कमेतील ८० टक्के रक्कम ही पहिला हप्ता अ‍ॅडव्हास म्हणून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी,’ अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल. (प्रतिनिधी)